Manoj Jarange Patil Mumbai Today : मनोज जरांगे पाटील हे कुणबी जातप्रमाणपत्रांसह मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्यावं ही मागणी घेऊन मुंबईतील आझाद मैदानात उपोषणाला बसले आहेत. आज (२ सप्टेंबर) त्यांच्या उपोषणाचा पाचवा दिवस आहे. हा दिवस अनेक घडामोडींनी भरलेला होता. या आंदोलनाविरोधातील याचिकेवर दुपारी मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी झाली. पाठोपाठ राज्य सरकारने मराठा आरक्षणाविषयी महत्त्वाचे निर्णय घेतले.
उच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीवेळी न्यायमूर्तींनी मनोज जरांगे आणि राज्य सरकारला खडे बोल सुनावले. “तुम्हाला आझाद मैदानात केवळ २४ तास उपोषणाला बसण्याची परवानगी दिली होती. तरी तुम्ही कोणत्या अधिकाराने गेल्या चार दिवसांपासून तिथे बसला आहात?” असा प्रश्न उच्च न्यायालयाने जरांगेंच्या वकिलांसमोर उपस्थित केला. त्यावर जरांगे यांच्या वकिलांनी न्यायालयाकडे उद्या सकाळपर्यंतची मुदत मागितली होती. ही विनंती मान्य करत उच्च न्यायालयाने सदर सुनावणी बुधवारी (३ सप्टेंबर) सकाळी ११ वाजेपर्यंत तहकूब केली आहे.
दुसऱ्या बाजूला, राज्य सरकारने मराठा आरक्षणाचा तिढा सोडवण्यासाठी नेमलेल्या उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील व उपसमितीतील इतर सदस्यांनी आझाद मैदानात उपोषणस्थळी जाऊन मनोज जरांगे यांची भेट घेतली. यावेळी मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारने काढलेला आदेश जरांगे यांनी सर्व आंदोलकांसमोर वाचून दाखवला.
हैदराबाद गॅझेटच्या अंमलबजावणीस राज्य सरकारची मान्यता
हैदराबाद गॅझेटच्या अंमलबजावणीस महायुती सरकारने मान्यता दिली असल्याचं जरांगे यांनी जाहीर केलं. यावर विखे पाटील म्हणाले, “सरकारचा प्रस्ताव आंदोलकांना मान्य झाला की आम्ही त्याची शासकीय अधिसूचना काढू.” यावर जरांगे पाटील म्हणाले, “तुम्ही अधिसूचना काढा आम्ही रात्री नऊ वाजेपर्यंत मुंबई रिकामी करतो. त्यानंतर तुम्ही आम्हाला मुंबईत थांबा म्हणालात तरी आम्ही थांबणार नाही. आम्ही गुलाल उधळून निघून जाणार.”
Manoj Jarange Patil Azad Maidan Maratha Aarkshan Andolan Live Updates : मराठा आरक्षणासाठी मुंबईत चालू असलेल्या आंदोलनाविषयीचे सर्व अपडेट्स वाचा एकाच क्लिकवर.
लाभक्षेत्रात नसतानाही हस्तांतरण बंदीचे शिक्के; मराठवाडी प्रकल्पप्रश्नी वाझोलीकरांचे पालकमंत्र्यांना साकडे
तुम्ही कोणत्या अधिकाराने आझाद मैदानात बसला आहात? उच्च न्यायालयाचा मनोज जरांगेंना सवाल
दुपारी उच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीवेळी मनोज जरांगे यांचे वकील सतीश मानेशिंदे म्हणाले, “९० टक्के आंदोलकांनी मुंबई सोडली आहे. त्यांची वाहनं देखील मुंबईच्या दिशेने रवाना झाली आहे.” यावर उच्च न्यायालयाने प्रश्न उपस्थित केला की “पण तुम्ही अजूनही तिथे का बसला आहात? तुम्ही तिथेच ठाण मांडून बसू शकता का? तुम्हाला केवळ २४ तास तिथे उपोषण करण्याची परवानी दिली होती. पण तुम्ही अजूनही तिथे बसला आहात. तुम्ही दुसऱ्या ठिकाणी का जाऊ शकत नाही?ठ यावर मानेशिंदे म्हणाले, “आम्ही आता आंदोलनाची जागा बदलू शकत नाही. आता त्या पाच हजार लोकांनी एकत्र घेऊन दुसरीकडे जाणं शक्य होणार नाही.”
Video : Maratha Reservation : मराठा आंदोलकांसाठी सिडको भवनाबाहेर चपाती, भाकऱ्यांचा ढीग, अन्न जातय वाया….
दुपारी ३ वाजेपर्यंत आझाद मैदान व आसपासचा परिसर रिक्त करा असे आदेश उच्च न्यायालयाने दिला आहे. मात्र, मागण्या मान्य होईपर्यंत आम्ही आझाद मैदान सोडणार नाही अशी भूमिका मराठा आंदोलकांनी घेतली आहे. तसेच आम्ही वाहतुकीत अडथळा आणणार नाही. तर, पोलीस संयमाने वागत आहेत. त्यांनी अद्याप बळाचा वापर केलेला नाही. ते केवळ न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न करत आहेत. मुंबईतील रस्ते व आझाद मैदान परिसर मोकळा करण्यास सांगितलं आहे. परंतु, मराठा कार्यकर्ते ऐकायला तयार नाहीत. आम्ही सामान्य जनता म्हणून कुठेही फिरू शकतोच, असं त्यांचं म्हणणं आहे.
आंदोलकांचं म्हणणं आहे की आम्ही मिळेल्या त्या वाहनांनी वाशी व खारघऱला जातो. परंतु, आम्हला जेवणाच्या गाड्या लावण्याची परवानगी द्या. इथे नीट व्यवस्था करून द्या.
“आयो लाल… सभी चओ झूलेलाल” च्या जयघोषाने उल्हासनगर दुमदुमले
पाणी प्रश्नावर नगरसेवकांना पुढे न करता सतेज पाटलांनी चर्चेला यावे; प्रा. जयंत पाटील यांचे आव्हान
Manoj Jarange Patil Azad Maidan : उल्हासनगरकरांचा मराठा बांधवांसाठी ऐक्याचा संदेश; ६०० बांधवांसाठी भोजनाची व्यवस्था, जरांगेच्या आंदोलनाला पाठिंबा
Maratha Reservation : मानखुर्द जकात नाक्यावर पोलिसांकडून नाकाबंदी…परिणामी सायन -पनवेल मर्गावर वाहतूक कोंडी
भटक्या विमुक्तांचे स्वातंत्र्य चळवळीतील योगदान महत्त्वाचे- जयकुमार गोरे
“जरांगे, शब्द जपून वापरा”, निलेश राणेंचा इशारा; म्हणाले, “आमच्या कुटुंबातील सदस्यावर हात टाकायचा…”
पाटणकर गटाचे १० गावांतील शेकडो कार्यकर्ते शिवसेनेत दाखल
Ganeshotsav 2025 : गणपतीनिमित्त टोकाच्या विरोधानंतर डोंबिवलीत रवींद्र चव्हाण-दीपेश म्हात्रे एका सोफ्यावर
जरांगेंकडून न्यायालयाची माफी; ३ पर्यंत आंदोलन सोडा – उच्च न्यायालयाने जरांगे यांना बजावले, राज्य सरकारच्या भूमिकेबाबतही नाराजी
जामखेडमधील हल्ल्याच्या निषेधार्थ आठवले गटाचा मोर्चा; आरोपींवर ‘मोक्का’अंतर्गत कारवाईची मागणी
“पोलिसांनी मनोज जरांगेंवर बळजबरी केली तर मुस्लीम समाज…”, इम्तियाज जलील मैदानात
एआयएमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील यांनी काही वेळापूर्वी मुंबईतील आझाद मैदानात जाऊन मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. या भेटीनंतर जलील म्हणाले, “मुंबई पोलिसांनी सरकारच्या सांगण्यावरून मनोज जरांगेंवर बळजबरी केली, त्यांचं आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला तर मुस्लीम समाज छातीचा कोट करून पुढे उभा राहील.”
संगमेश्वर भागात मोठी वाहतुक कोंडी; बंदी काळात अवजड वाहतुक सुरुच असल्याने मुंबई गोवा महामार्गावरील वाहतुक संथगतीने
“पोलिसांनी मनोज जरांगेंवर बळजबरी केली तर मुस्लीम समाज…”, इम्तियाज जलील मैदानात
एआयएमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील यांनी काही वेळापूर्वी मुंबईतील आझाद मैदानात जाऊन मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. या भेटीनंतर जलील म्हणाले, “मुंबई पोलिसांनी सरकारच्या सांगण्यावरून मनोज जरांगेंवर बळजबरी केली, त्यांचं आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला तर मुस्लीम समाज छातीचा कोट करून पुढे उभा राहील.”
पावसाळ्याच्या तीन महिन्यांत भंडारदऱ्यात २० तर निळवंडेत २१ टीएमसी पाण्याची आवक
सायबर भामट्यांकडून वैद्यकीय व्यावसायिकांना फसवण्याचे प्रयत्न
मुंबईसह मोठ्या शहरात लहान मुलांमध्ये श्वसनसंस्थेच्या संसर्गांमध्ये वाढ!
“मनोज जरांगे, नामुष्की टाळायची असेल तर…”, भाजपाचं आवाहन; म्हणाले, “ओबीसीतून आरक्षण देण्याबाबत आमची भूमिका…”
भाजपाचे प्रवक्ते केशव उपाध्ये म्हणाले, “ज्या समाजाने लाखोंचे यशस्वी मूक मोर्चे शांततेत काढले, तो हाच का मराठा समाज? अशी शंका यावी असे चित्र गेले ४/५ दिवस मुंबईत पाहायला मिळथ आहे. छत्रपतींचा मावळा ही आपली ओळख पण आंदोलनातील हौशे गवश्यांनी जे केले ते प्रतिमेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे आहे. ‘ते आमचे नव्हेत’ असे म्हणून जबाबदारी झटकता येईल पण वस्तुस्थिती बदलणार नाही. प्रत्येक आंदोलन यशस्वी होण्यासाठी थोडे मागेपुढे करावे लागते. काही वेळा थांबावे लागते. महात्मा गांधीनी सुध्दा काही वेळा आंदोलन स्थगित केले. मराठा समाजाच्या वेदना आपण सगळ्यांसमोर आणल्यावर मराठा समाजाला आता १० टक्के आरक्षण सध्या लागू झाले आहे.”
“आता वेळ आहे थांबण्याची!. आपल्या बहुतांशी मागण्या महायुती सरकारने पूर्ण केल्या आहेत. राहिला प्रश्न, ओबीसी कोट्यातून आरक्षण घेण्याचा. भाजपाची भूमिका तर स्पष्ट आहे, ओबीसी आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे. पण यावर आपल्यासोबत असण्याचा दावा करणारे मविआतील घटक पक्ष, शरद पवार, व कॅाग्रेसची यावर काय भूमिका आहे ते स्पष्ट विचारा. उद्धव ठाकरेंना या प्रश्नातले फारसे ज्ञान नसल्याने ते मूग गिळून बसतील, पण मविआतील ही मंडळी केवळ गोल गोल करत आहेत. मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडविण्यापेक्षा, दोन समाजसमूहांना झुंजत ठेवून मविआतील तीन पक्षांना राजकारण करायचे आहे, हे लक्षात घ्या, आणि आपल्या आंदोलनात आपल्या खांद्यावरून कुणी मतांची बेजमी करण्याच स्वप्न पहातेय ही नामुष्की टाळण्यासाठी आंदोलन संपवून सरकारला सहकार्य करा!”
“पोलिसांकरवी आमच्यावर लाठीहल्ला केला तर…”, मनोज जरांगेंचा फडणवीसांना इशारा; “आम्ही तुमच्या शहरांत…”
“आम्हाला आझाद मैदानातून हाकललं तर…”, मनोज जरांगेंचा फडणवीसांना इशारा
मनोज जरांगे पाटील म्हणाले, “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी काहीतरी कारण पुढे करून मराठ्यांना आझाद मैदानावरुन हुसकावून लावण्याचा प्रयत्न करू नये. तुम्ही मुंबई पोलिसांना सांगून आम्हाला अटक करायला लावली तर ते तुमच्यासाठी घातक असेल. मराठा आंदोलकांवर लाठीमार केला तर ते अतिघातक ठरेल. तुम्ही गरीब मराठ्यांचा अपमान केला तर त्यांच्या डोक्यात बदला घेण्याची चीड निर्माण होईल.”
पोलिसांची आझाद मैदान रिकामं करण्याची नोटीस, मनोज जरांगेंनी सांगितलं पुढचं नियोजन
सीएसटी, बृहन्मुंबई महापालिका चौकातील चित्र बदलले
मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या आवाहनाला आंदोलकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. जरांगे पाटील यांच्या आवाहनानंतर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि बृहन्मुंबई महापालिका चौकातील गर्दी वेगाने कमी होत आहे. चौकातील वाहने निघून जाण्यास सुरुवात झाली आहे. जरांगे यांच्या आवाहनाला आंदोलकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याचे दिसून येत आहे.
Maratha Reservation Protest Mumbai Police Notice : आझाद मैदान रिकामे करा… मराठा कोअर कमिटीला मुंबई पोलिसांची नोटीस
मनोज जरांगेंना आझाद मैदान रिकामं करावं लागणार, मुंबई पोलिसांची नोटीस
मुंबईत पोलिसांनी मनोज जरांगे यांना एक नोटीस बजावली आहे. या नोटिशीत पोलिसांनी जरांगे यांना म्हटलं आहे की आपणास यापूर्वी आंदोलन करण्यासाठी देण्यात आलेल्या परवानगीतील अटी व शर्तीचे तुम्ही उल्लंघन केल्यामुळे तसेच मुंबई उच्च न्यायालयाने २६ ऑगस्ट रोजीच्या अंतरिम आदेशात दिलेल्या निर्देशांचे तुम्ही उल्लंघन केल्यामुळे १ सप्टेंबर २०२५ रोजी तुम्ही सादर केलेल्या विनंती अर्जानुसार तुम्ही मागितलेली आंदोलनाची परवानगी नाकारण्यात येत आहे. त्यानुसार आपण आझाद मैदान परिसर लवकरात लवकर रिक्त करावा.
नितेश राणे एखाद्या विषयावर बोल्यानंतर त्यावर तुम्ही टीका करा पण वैयक्तिक टीका नको. नितेश काही टोकाचं बोलला नाही किंवा वैयक्तिक बोलला नाही. कुठल्याही धमकीला राणे परिवार कधीच घाबरत नाही, तुम्ही जसे मरायला तयार असता तसेच आम्ही राणे पण असतो. आमच्या परिवाराच्या सदस्यावर कोण हात टाकायच्या वार्ता करत असेल तर ते आम्ही कधीही सहन करणार नाही, म्हणून भाषा जपून वापरली पाहिजे. कारण आम्ही तुम्ही काही परके नाही. विषय सोडवताना नातं तुटता कामा नाही याची काळजी घेतली पाहिजे. मनोज जरांगे पाटील तुमचे आणि माझे संबंध नेहमी आपुलकीचे राहिले आहेत, कौटुंबिक राहिले आहेत, ते तसेच राहिले पाहिजेत. मी आज पर्यंत नातं जपलं, पुढे ही जपेन… आपल्या कडून पण तीच अपेक्षा आहे.