बॉलीवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि आम आदमी पक्षाचे खासदार राघव चड्ढा आज लग्नबंधनात अडकणार आहेत. उदयपूरच्या द लीला पॅलेसमध्ये आज हा शाही लग्नसोहळा पार पडणार आहे. लग्नापूर्वीच्या कार्यक्रमाचे व्हिडीओ आणि फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. पण परिणीती आणि राघव यांनी लग्नासाठी उदयपूरचीच का निवड केली? घ्या जाणून
हेही वाचा- Video: परिणीती चोप्रा-राघव चड्ढा कुटुंबियांसह पोहोचले उदयपूरला, विमानतळावर झालं खास स्वागत
लग्न कुठे करायचं यासाठी परिणीती आणि राघव यांनी अनेकाशी चर्चा केली. आम आदमी पक्षाचे नेते विक्रमजीत सिंह साहनी यांनी परिणीती आणि राघव यांना लग्नासाठी उदयपूरचे नाव सुचवले होते. लग्नानंतर विक्रमजीत हनीमूनसाठी उदयपूरला आले होते. त्याना हे शहर खूप आवडलं होतं. त्यामुळे त्यांनी परिणीती आणि राघव यांना या शहरात लग्न करण्याचा सल्ला दिला. त्यांचा सल्ला मानत दोघांनी उदयपूरमध्येच लग्न करण्याचा निर्णय घेतला.
दरम्यान परिणीती आणि राघव यांच्या लग्नसाठी राजकीय मंडळी तसेच बॉलीवूडमधील अनेक कलाकार सहभागी झाले आहेत. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल
दरम्यान, १३ मे २०२३ला परिणीती आणि राघव यांनी साखरपुडा करत सगळ्यांनाच सुखद धक्का दिला होता. दिल्लीतील कपूरथला हाऊस या ठिकाणी परिणीती व राघव यांचा थाटामाटात साखरपुडा पार पडला होता. तेव्हापासून दोघांच्या लग्नाची चर्चा सुरू होती. दोघांच्या लग्नाच्या तारेखबाबत अनेक तर्क-वितर्क लावले जात होते.
मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Why did parineeti chopra and raghav chadha choose udaipur for their wedding dpj