नागपूर : काँग्रेस पक्ष खूपच कमकुवत झाला आहे. तो सत्ताधारी भाजपाला हरवूच शकत नाही. परंतु खोटे बाेलून मुस्लिमांचे मते घेतो. काँग्रेसमुळेच भाजपा आज सत्तेत आहे, अशी टीका ऑल इंडिया मजलिस-ए- इत्तेहादुल मुस्लिमीनचे (एआयएमआयएम) प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी केली.
ताजाबाद येथे शनिवारी आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. याप्रसंगी मंचावर जावेद पाशा आणि पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. ओवैसी पुढे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या काळात मुस्लिमांना सर्वाधिक दुर्लक्षित केले गेले. लोकसभेतील भाजपाच्या ३०० खासदारांत एकही मुस्लीम नाही. भाजपा केवळ काँग्रेसमुळे जिंकत आहे. काँग्रेसमध्ये मोदीला थांबवण्याची ताकद उरली नाही. काँग्रेस
हेही वाचा – वर्धा : नागरी बँकेवर सायबर दरोडा; हॅकिंग करीत सव्वा कोटी केले लंपास
नागपुरात मुस्लिमांसोबत भेदभाव
नागपूर शहरात बऱ्याच झोपडपट्टी भागात सरकारने पट्टेवाटप केले. परंतु मुस्लीम लोकसंख्या असलेल्या वस्तांमध्ये ही योजना अंमलात आणली नाही. सावित्रीबाई फुले, सोनिया गांधी यांच्या नावाने असलेल्या झोपडपट्या अधिकृत होतात. परंतु ताजाबाग, डोबीनगरसह मुस्लिमांंची संख्या अधिक असलेल्या भागात पट्टे वाटप केले जात नाही. हा भेदभाव का, असा प्रश्नही ओवैसी यांनी उपस्थित केला.
राज्यात दंगली वाढल्या
मालेगाव, नांदेड, नगर, जळगाव, औरंगाबाद,
हेही वाचा – वाघांच्या संवर्धनामुळे कार्बन उत्सर्जनात घट, ‘नेचर इकॉलॉजी अँड इव्होल्युशन’चा अभ्यास
जनआक्रोश मोर्चा मुस्लिमांच्या बदनामीसाठी
महाराष्ट्रात भाजपा-संघप्रणित संघटनांकडून हिंदू जनआक्रोश मोर्चे काढण्यात आले. त्यात अल्पसंख्यांक समाजाच्या विरोधात विष पेरले गेले. मुस्लिमांना शिविगाळ केली गेली. प्रत्यक्षात येथे शिंदे-फडणवीस सरकार हिंदुत्वाच्या नावावर आले. केंद्रात ९ वर्षांपासून मोदी सरकारही हिंदुत्वाची गोष्ट करते. मग जनआक्रोश मोर्चे काढण्याची गरज का, असा सवालही ओवैसींनी या सभेत विचारला.
Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: It is because of congress that bjp is in power today asaduddin owaisi criticism in nagpur mnb 82 ssb