Operation Sindoor India All Party Meeting Live Updates : २२ एप्रिलला पहलगाम या ठिकाणी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ पर्यटकांना प्राण गमवावे लागले. या घटनेचा निषेध देशभरात नोंदवण्यात आला. या हल्ल्यामागे पाकिस्तान असल्याची बाबही समोर आली. त्यानंतर भारताकडून पाकिस्तानला काय उत्तर दिलं जातं? याकडे सगळ्या देशाचं लक्ष लागलं होतं. भारताने ६ मेच्या रात्री ऑपरेशन सिंदूर राबवत पाकिस्तान आणि पाकव्याप्त जम्मू काश्मीरमध्ये एअर स्ट्राईक करत जोरदार प्रत्युत्तर दिलं. यानंतर पाकिस्तानचे धाबे दणाणले आहेत. या हल्ल्यानंतर बिथरलेल्या पाकिस्तानने ७ मे च्या रात्री पाकिस्तानी लष्कराच्या नियंत्रण रेषेपलीकडे जम्मू-काश्मीरमधील कुपवाडा, बारामुल्ला, उरी आणि अखनूर भागासमोरील भागात लहान शस्त्रे आणि तोफगोळ्यांचा वापर करून विनाकारण गोळीबार केला. पाकिस्तानच्या हल्ल्याला भारतीय लष्कराने चोख प्रत्युत्तर दिलं. या आणि अशा सगळ्या घडामोडींवर आपली नजर लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून असणार आहे.
Operation Sindoor India Airstrike Highlights 8th may : ऑपरेशन सिंदूरनंतर बिथरलेल्या पाकिस्तानचा LOC जवळ विनाकारण गोळीबार, भारताने दिलं उत्तर
India Pakistan War: एक्सवरील ८००० खाती बंद; भारत सरकारच्या आदेशानंतर कारवाई
भारत-पाकिस्तानमधील तणाव वाढल्यानंतर चुकीची माहिती सोशल मीडियावर पसरू नये, यासाठी भारत सरकारकडून काळजी घेण्यात येत आहे. यासाठी भारत सरकारच्या आदेशानंतर आता एक्सने ८००० खाती बंद केली आहेत.
STORY | Blocked 8,000 accounts in India after govt's executive orders, says X
— Press Trust of India (@PTI_News) May 8, 2025
READ: https://t.co/d62rAE1OUm pic.twitter.com/Nj1m5VLKPd
India Pakistan War: एअर इंडियाच्या प्रवाशांसाठी महत्त्वाच्या सूचना; तीन तास आधी विमानतळावर पोहचा
भारत-पाकिस्तान दरम्यान सायंकाळ नंतर ड्रोन हल्ले सुरू झाल्यानंतर एअर इंडियाने प्रवाशांसाठी नव्या सूचना जाहीर केल्या आहेत. विमान उड्डाणाच्या वेळेआधी किमान तीन तास लवकर विमानतळावर पोहोचावे, असे एअर इंडियाने प्रवाशांना सांगितले आहे. उड्डाण घेण्याच्या ७५ मिनिटं आधी आता चेक-इन काऊंटर बंद करण्यात येणार आहे.
#TravelAdvisory
— Air India (@airindia) May 8, 2025
In view of an order by the Bureau of Civil Aviation Security on enhanced measures at airports, passengers across India are advised to arrive at their respective airports at least three hours prior to scheduled departure to ensure smooth check-in and boarding.…
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानच्या हल्ल्याला भारताचे चोख प्रत्युत्तर, क्षेपणास्त्र, ड्रोन हाणून पाडले; जम्मू, पंजाब, राजस्थानच्या अनेक भागात ब्लॅकआऊट
पाकिस्तानने जम्मू, पठानकोट आणि उधमपूर येथे ड्रोन आणि क्षेपणास्त्राने हल्ला केला. भारतीय लष्करानेही जोरदार प्रत्युत्तर दिले असून असंख्य ड्रोन आणि क्षेपणास्त्र हाणून पाडले. तसेच जम्मू-काश्मीर, पंजाब आणि राजस्थानच्या सीमाभागात ब्लॅकआऊट घोषित करण्यात आला आहे.
जम्मूमधील हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर मेहबूबा मुफ्ती यांची सोशल मीडियावर भावनिक पोस्ट, म्हणाल्या….
“जम्मूमधून अतिशय अस्वस्थ करणारी बातमी मिळत आहे, जिथे काही भागात हवाई हल्ले झाल्याचे वृत्त आहे. जम्मूमधील लोकांबद्दल, विशेषतः सीमेवर राहणाऱ्या लोकांबद्दल मला वाईट वाटते, ते पुन्हा एकदा संघर्षाच्या भयानक अनिश्चिततेमध्ये सापडले आहेत. या महत्त्वाच्या क्षणी, त्यांच्या सुरक्षिततेसाठी आणि त्यांना बळ मिळावे याकरिता मी प्रार्थना करते. मी सर्व बाजूंनी संयम बाळगावा आणि त्वरित तणाव कमी करण्याचे आवाहन करते. आधीच खूप लोकांनी जीव गमावले आहेत, शांतता आणखी दूर जाऊ देता कामा नये,” अशी पोस्ट मेहबूबा मुफ्ती यांनी सोशल मीडियावर केली आहे.
Deeply disturbing reports are emerging from Jammu, where air strikes have reportedly hit certain areas. My heart goes out to the people of Jammu especially those living along the borders who are once again caught in the terrifying uncertainty of conflict.
— Mehbooba Mufti (@MehboobaMufti) May 8, 2025
In this critical…
पाकिस्तानकडून जम्मू विमातळाला लक्ष्य करण्याच प्रयत्न; जम्मू शहर आणि लगतच्या भागात वीजपुरवठा पूर्णपणे खंडित
पाकिस्तानकडून जम्मू विमानतळाला लक्ष्य करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा प्रकार समोर आळा आहे. या हल्ल्याला प्रत्युत्तर देत उपाययोजना करण्यात आल्या आहेत. यादरम्यान जम्मू शहर आणि लगतच्या भागात वीजपुरवठा पूर्णपणे खंडित करण्यात आला आहे.
Pakistan makes an attempt to target Jammu airport, counter-measures initiated; total blackout in Jammu city, adjoining areas. pic.twitter.com/mFmafMpixk
— Press Trust of India (@PTI_News) May 8, 2025
ऑपरेशन सिंदूरनंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल, सीडीएस अनिल चौहान, लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी, एअर चीफ मार्शल अमरप्रीत सिंग आणि नौदल प्रमुख अॅडमिरल आर हरी कुमार यांच्याबरोबर उच्चस्तरीय बैठक घेत आहेत.
परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले की, पाकिस्तानने पहलगाममध्ये मूळ तणावाला सुरूवात केली, ज्याला भारत फक्त प्रत्युत्तर देत आहे.
पाकिस्तानमधील नीलम-झेलम धरणाला लक्ष्य केल्याचे दावा खोटा- मिस्त्री
पाकिस्तानमधील नीलम-झेलम धरणाला लक्ष्य केल्याचे दावे खोटे आहेत, अशी माहिती परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी दिली आहे. तसचे जर पाकिस्तानने याचा वापर करत भारतावर हल्ला केला तर त्यानंतरच्या परिणामांसाठी इस्लामाबाद पूर्णपणे जबाबदार असेल असेही मिस्त्री म्हणाले आहेत.
पाकिस्तान दावा करत आहे त्याच्या विरुद्ध, काल पाकिस्तानने जम्मू आणि काश्मीरमधील शीख समुदायावर लक्ष्य करत हल्ला केला, पूंछमधील गुरुद्वारा आणि शीख समुदायाच्या नागरिकांच्या घरांवर हल्ला केला आणि या हल्ल्यात किमान तीन जण ठार झाले… काल सकाळपासून, पाकिस्तानने केलेल्या हल्ल्यांमध्ये एकूण १६ नागरिक ठार झाले आहेत आणि ५९ जण जखमी झाले आहेत, अशी माहिती परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी दिली आहे.
VIDEO | MEA Press Briefing on Operation Sindoor: Foreign Secretary Vikram Misri (@VikramMisri) says, "In fact contrary to what Pakistan is claiming, yesterday Pakistan launched a targeted attack on the Sikh community in Jammu and Kashmir, hitting gurudwara in Poonch and homes of… pic.twitter.com/xbyieCgdM0
— Press Trust of India (@PTI_News) May 8, 2025
Operation Sindoor : ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पाकिस्तानने अमृतसरमधील लष्करी तळावर हल्ला केल्याचा दावा खोटा; Fact Checkमध्ये समोर आलं सत्य
Operation Sindoor Update: भारतानं बुधवारी रात्री डागलं ‘S 400 सुदर्शन’, पाकिस्तानचा हवाई हल्ला अवघ्या काही वेळात लावला परतवून!
राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित घडामोडींच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय तयारी आणि विविध खात्यांमधील समन्वयाचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधानांनी आज भारत सरकारच्या विविध मंत्रालये आणि विभागांच्या सचिवांसमवेत उच्चस्तरीय बैठक घेतली. सातत्य आणि संस्थात्मक लवचिकता कायम ठेवण्यासाठी मंत्रालये आणि एजन्सींमध्ये अखंड समन्वयाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी चर्चा केली. तसंच सगळ्यांच्या नियोजनाचा आणि तयारीचा आढावा घेतला. पंतप्रधान कार्यालयाने ही माहिती दिली आहे.
The Prime Minister today chaired a high-level meeting with Secretaries of various Ministries and Departments of the Government of India to review national preparedness and inter-ministerial coordination in light of recent developments concerning national security. PM Modi… pic.twitter.com/T39Kh0fyiZ
— ANI (@ANI) May 8, 2025
Operation Sindoor: भारतीय लष्कराची मोठी कारवाई; लाहोरमधील पाकिस्तानची एअर डिफेन्स सिस्टीम उद्ध्वस्त!
पाकिस्तानवर एअर स्टाईक , डोंबिवलीत महिलांचा जल्लोष
भारताने पाकिस्तानवर एअर स्टाईक केल्यानंतर सर्वत्र उत्सवाचे वातावरण पाहायला मिळत आहे. डोंबिवलीत भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला. यावेळी मोठ्या प्रमाणात भाजप कार्यकर्ते उपस्थित होते.
India Air Strike: ऑपरेशन सिंदूर आणि मनोवैज्ञानिक रणनीती; भारतीयांनी काय करणं अपेक्षित आहे?
सर्वपक्षीय बैठकीसाठी सुप्रिया सुळे आणि संजय राऊत उपस्थित
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे आणि शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत सर्वपक्षीय बैठकीसाठी उपस्थित झाले आहेत. आज त्यांना काय सांगण्यात येतं? तसंच या बैठकीत काय घडतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.
VIDEO | NCP (SP) leader Supriya Sule (@supriya_sule),
— Press Trust of India (@PTI_News) May 8, 2025
Shiv Sena (UBT) leader Sanjay Raut (@rautsanjay61), Samajwadi Party leader Ramgopal Yadav (@proframgopalya1), Trinamool Congress leader Sudip Bandyopadhyay arrive to attend the all-party meeting.#OperationSindoor
(Full… pic.twitter.com/ZOiKC0gMH4
Operation Sindoor: आधी ३, मग ६० आणि आता १५० किमी… पाकिस्तानात किती आतपर्यंत घुसली भारतीय सेना?
शिवसेना आज सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित राहणार-संजय राऊत
पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाला आणि २६ भगिनींचं कूंकू पुसलं गेलं. त्यानंतर एक सर्वपक्षीय बैठक सरकारने घेतली. त्यावेळी शिवसेना उपस्थित नव्हती. आमची भूमिका होती की आधी कारवाई करा त्यानंतर आपण चर्चा करु. देशात तेव्हा आक्रोश होता, अशांतता होती. आता भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूर राबवून कारवाई केली आहे. यामुळे भारताची ताकद सगळ्या जगाला दिसली. भारतीय सैन्य कशाप्रकारे कसा बदला घेऊ शकतं हे जगाला दिसलं. सरकारने कशाप्रकारे बदला घ्यायचा, उत्तर द्यायचं हे भारतीय सैन्यावर सोपवलं होतं आणि भारतीय सैन्याने ते करुन दाखवलं. त्यामुळे आजची सर्वपक्षीय बैठक महत्त्वाची आहे. या बैठकीला आम्ही उपस्थित राहणार आहोत.
अमृतसर या ठिकाणी पाकिस्तानची दोन विमानं भारताने पाडली
पाकिस्तानकडून रणगाडे आणि युद्ध सामुग्री तैनात करण्यात आली आहेत. लाहोरकडे जाणारी विमानं रद्द करण्यात आली आहे. पाकिस्तान हल्ल्याच्या तयारीत आहेत का असा प्रश्न या सगळ्यामुळे पडला आहे. ऑपरेशन सिंदूर राबवल्यानंतर पाकिस्तान बिथरला आहे. अमृतसर या ठिकाणी पाकिस्तानची दोन विमानं पाडण्यात आली. दोन विमानांचा हल्ला भारताने परतवून लावला आहे.
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने दादर भागात लावले पंतप्रधान नरेंद्र मोदींचे अभिनंदन करणारे बॅनर
ऑपरेशन सिंदूर राबवल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं पोस्टर दादर या ठिकाणी लावत एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने त्यांचं अभिनंदन केलं आहे. भारताने एअर स्ट्राईक करुन पाकिस्तानला भ्याड हल्ल्याचं उत्तर दिलं. त्याबद्दल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचं अभिनंदन केलं आहे.
Maharashtra: After Operation Sindoor, Shiv Sena put up posters in several areas of Mumbai, particularly in Dadar, praising the Indian Army and Prime Minister Modi for their efforts in the operation pic.twitter.com/py6HDoeGyc
— IANS (@ians_india) May 8, 2025
पाकिस्तानकडून गोळीबार, भारतीय लष्कराने दिलं चोख प्रत्युत्तर
भारताने ६ मेच्या रात्री ऑपरेशन सिंदूर राबवत पाकिस्तान आणि पाकव्याप्त जम्मू काश्मीरमध्ये एअर स्ट्राईक करत जोरदार प्रत्युत्तर दिलं. यानंतर पाकिस्तानचे धाबे दणाणले आहेत. या हल्ल्यानंतर बिथरलेल्या पाकिस्तानने ७ मे च्या रात्री पाकिस्तानी लष्कराच्या नियंत्रण रेषेपलीकडे जम्मू-काश्मीरमधील कुपवाडा, बारामुल्ला, उरी आणि अखनूर भागासमोरील भागात लहान शस्त्रे आणि तोफगोळ्यांचा वापर करून विनाकारण गोळीबार केला. पाकिस्तानच्या हल्ल्याला भारतीय लष्कराने चोख प्रत्युत्तर दिलं.
During the night of May 7-8, Pakistan Army posts resorted to unprovoked fire using small arms and artillery guns across the LoC in areas opposite Kupwara, Baramulla, Uri and Akhnoor areas in J&K. Indian Army responded proportionately: Indian Army pic.twitter.com/CAM2YXDXui
— ANI (@ANI) May 8, 2025
भारताने ऑपरेशन सिंदूर राबवत पाकिस्तानला जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. (फोटो-ANI)
भारताने ६ मेच्या रात्री ऑपरेशन सिंदूर राबवत पाकिस्तान आणि पाकव्याप्त जम्मू काश्मीरमध्ये एअर स्ट्राईक करत जोरदार प्रत्युत्तर दिलं. यानंतर पाकिस्तानचे धाबे दणाणले आहेत. या हल्ल्यानंतर बिथरलेल्या पाकिस्तानने ७ मे च्या रात्री पाकिस्तानी लष्कराच्या नियंत्रण रेषेपलीकडे जम्मू-काश्मीरमधील कुपवाडा, बारामुल्ला, उरी आणि अखनूर भागासमोरील भागात लहान शस्त्रे आणि तोफगोळ्यांचा वापर करून विनाकारण गोळीबार केला. पाकिस्तानच्या हल्ल्याला भारतीय लष्कराने चोख प्रत्युत्तर दिलं.