Maharashtra Political New Updates, 11November 2025 : दिल्लीत झालेल्या स्फोटांवरुन नाना पटोले यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे. केंद्र सरकारच्या गुप्तचर यंत्रणांचं हे अपयश असल्याचं नाना पटोले यांनी म्हटलं आहे. दरम्यान पार्थ पवार यांच्या प्रकरणाबाबत आणखी काही नवे अपडेट्स समोर येतात का? ते पाहणंही महत्वाचं असणार आहे. तर २ तारखेला निवडणूक होणार आहे त्याची तयारी सगळ्याच पक्षांनी तयारी सुरु केली आहे. दरम्यान काहीही झालं तरीही मनसेसह जायचं नाही असं बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं आहे. तर काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनीही महापालिका आणि इतर निवडणुका स्वबळावर लढण्याचा नारा दिला आहे. या बातमीसह महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा आपण घेणार आहोत लाइव्ह ब्लॉगच्या माध्यमातून.
Mumbai Maharashtra Breaking News Live Updates Today : दिल्लीत झालेला कारचा स्फोट हे केंद्र सरकारचं अपयश, नाना पटोलेंची टीका आणि इतर महत्त्वाच्या घडामोडी
Gold-Silver Price : अबब ! सोने-चांदीचे दर पुन्हा गगनाला भिडले… जळगावमध्ये आता काय स्थिती ?
नाशिक परिक्रमा महामार्ग एमएसआरडीसीकडून एमएसआयडीसीकडे…
नायगाव बीडीडीतील ८६४ घरांचे चावी वाटप लांबणीवर, मुख्यमंत्र्यांनी उद्याचा कार्यक्रम पुढे ढकलला
नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातील माजी विद्यार्थ्यांना पुण्याचे वेध…कारण काय ?
मुंबई: नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गाकरीता (ओबीसी)६१ जागा राखीव
PCMC Election : पिंपरी-चिंचवड महापालिका सार्वत्रिक निवडणूक आरक्षण सोडत प्रक्रिया संपन्न
कोल्हापुरात बिबट्याची दहशत, एका कर्मचाऱ्यावर हल्ला
कोल्हापूर शहरात बिबट्याची दहशत निर्माण झाली आहे. कारण महावितरण कार्यालयाच्या परिसरात बिबट्या अडकला आहे. वन विभागाच्या एका कर्मचाऱ्यावर बिबट्याने हल्ला केला. बिबट्याला जेरबंद करण्याचे प्रयत्न वनविभागाकडून सुरु आहेत. परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.
Delhi blast : दिल्ली स्फोटानंतर ठाणे पोलीस सतर्क; बाँब शोधक पथके तैनात, हाॅटेल, गर्दीच्या ठिकाणांची तपासणी, नाकाबंदीला सुरुवात
TET Exam 2025 : बायोमेट्रिक हजेरी, एआय, टीईटी परीक्षेसाठी काय काय…शिक्षकांनो ‘हे’ ध्यानात ठेवा
धुळ्याच्या गुहेगारी वर्तुळात खळबळ; दहशत निर्माण करणारी टोळी जिल्ह्यातून तडीपार….
मुंबई विमानतळावर १४ कोटींचा हायड्रो गांजा जप्त… तीन दिवसात पाच वेगवेगळ्या कारवाया
Nashik Local Body Elections : छगन भुजबळ यांना डाॅक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला; समीर भुजबळ किल्ला लढविण्यासाठी तळ ठोकून
कूपर रुग्णालयात लवकरच महाराष्ट्र सुरक्षा बलाचे सुरक्षा रक्षक होणार तैनात, नियुक्तीपर्यंत प्रत्येक पाळीमध्ये पालिकेच्या आठ सुरक्षा रक्षकांची नियुक्ती
वारकऱ्यांच्या दिंडीत भरधाव कंटेनर शिरला; महिला वारकऱ्याचा मृत्यू, ८ जण जखमी
पुणे महापालिकेतील उपायुक्तांच्या पदभारात झाले बदल, आयुक्तांनी काढले आदेश !
मनोज जरांगे-पाटील चौकशीला गैरहजर… वकिलांनी मांडली बाजू
कोल्हापूरमध्ये ठाकरे गटाची भिस्त काँग्रेसवर
उच्च शिक्षण विभागांतर्गत मुंबईतील कार्यालये एकाच ठिकाणी, चेंबूरस्थित इमारत बांधकामास गती देण्याचे चंद्रकांत पाटील यांचे आदेश
मुंबई विद्यापीठात अत्याधुनिक पॉलिमर केमिस्ट्री संशोधन प्रयोगशाळा, युरोफिन्सच्या सीएसआर निधीतून अत्याधुनिक सुविधा कार्यान्वित
‘इंद्रधनुष्य’ युवा महोत्सवात मुंबई विद्यापीठाची विजयी पताका, तब्बल २० वेळा विजेते होण्याचा मान
अलिबागचे राजकारण पुन्हा एकदा ‘नाईक’ कुटूंबा भोवती….
Air Pollution Maharashtra : राज्यात वायू प्रदूषणाचे संकट
Air Pollution Maharashtra : राज्यात वायू प्रदूषणाचे संकट
छत्रपती संभाजीनगर : पैठण गेटवरील व्यापारी पेठेत एकाचा खून; जमावाकडून तोडफोड….
केईएम रुग्णालयाच्या ढिसाळ कारभार, मंगलप्रभात लोढा यांनी अधिष्ठातांना धरले धारेवर
Delhi Car Blast : “दिल्ली हल्ल्यामुळे पंतप्रधान मोदींच्या आश्वासनांची पोलखोल”, नाना पटोलेंची टीका; गृहमंत्री शहांवरही..
गळ्यात अडकलेला माशाचा काटा काढण्यास डॉक्टरांचा नकार, कूपरमध्ये मारहाण केल्याप्रकरणी डॉक्टरांमध्ये दहशतीचे वातावरण
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील पर्यटन आकर्षण वाढणार; सिंह सफारी नोव्हेंबर, तर मिनी ट्रेन डिसेंबरपर्यंत सुरू होणार
दिल्ली स्फोटांच्या पार्श्वभूमीवर धार्मिक स्थळांच्या सुरक्षेत वाढ
दिल्लीमध्ये झालेल्या स्फोटानंतर देशभरात अलर्ट जारी करण्यात आले आहेत. त्यामुळे राज्यातील गर्दीच्या ठिकाण असलेल्या अनेक देवस्थानांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. बुलढाणा जिल्ह्यातील विदर्भाची पंढरी म्हणून ओळख असलेल्या गजानन महाराजांच्या शेगाव मंदिर परिसरातही सुरक्षा वाढवण्यात आली आहे. रात्रीपासूनच कुठलाच गैरप्रकार घडू नये यासाठी पोलीस यंत्रणेसह शेगाव मंदिर सुरक्षा रक्षक अलर्ट मोडवर आले आहेत. प्रत्येक येणाऱ्या भाविकांची या ठिकाणी कसून चौकशी केली जात आहे. त्यांच्या बॅगा तपासल्या जात आहेत. त्या अनुषंगाने सुरक्षा यंत्रणा खबरदारी घेत असल्याचे पाहायला मिळत आहे.
दिल्लीत झालेल्या स्फोटांवरुन नाना पटोले यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे. केंद्र सरकारच्या गुप्तचर यंत्रणांचं हे अपयश असल्याचं नाना पटोले यांनी म्हटलं आहे. दरम्यान पार्थ पवार यांच्या प्रकरणाबाबत आणखी काही नवे अपडेट्स समोर येतात का? ते पाहणंही महत्वाचं असणार आहे. तर २ तारखेला निवडणूक होणार आहे त्याची तयारी सगळ्याच पक्षांनी तयारी सुरु केली आहे.
