Maharashtra News Updates, 30 September 2025 : गेल्या काही दिवसांपासून चालू असलेल्या पावसाचा जोर आता राज्यातील काही भागांमध्ये ओसरेल असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. मात्र, काही जिल्ह्यांमध्ये आणखी दोन दिवस पावसाचा मुक्काम असेल. पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, नाशिक, पुणे व साताऱ्याला यलो अलर्ट देण्यात आला आहे. या जिल्ह्यांमधील काही भागात मुसळधार पाऊस पडू शकतो, असंही हवामान विभागाने म्हटलं आहे. तर, उर्वरित भागांमध्ये पावसाचा जोर ओसरल्याचं पाहायला मिळेल.
दरम्यान, आज (३० सप्टेंबर) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे. राज्यातील अतिवृष्टी व पूरग्रस्तांना सरकारकडून काय मदत मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. दुसऱ्या बाजूला, सरकार जी काही मदत जाहीर करेल ती दिवाळीपूर्वी मिळावी अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.
निवडणुका असत्या तर महाराष्ट्रात पैशाचा पूर आला असता : ठाकरे गट
शेतकऱ्यांच्या व नागरिकांच्या नुकसानभरपाईवरून शिवसेनेने (ठाकरे) राज्य सरकारला टोला लगावला आहे. “महाराष्ट्रात आत्ता निवडणुका असत्या तर मदतीसाठी केंद्राकडून व राज्य सरकारकडून पैशांचा पूर आला असता”, अशा शब्दांत आमदार आदित्य ठाकरे यांनी सरकारवर टीका केली आहे. तर, “महाराष्ट्रावर आभाळ फाटलं आहे, राज्य सरकारने खजिन्याची खिडकी उघडावी”, अशी मागणी ठाकरे गटाने दैनिक सामना या त्यांच्या मुखपत्राद्वारे केली आहे.
Marathi News Live Today : राज्याच्या कानाकोपऱ्यातील बातम्या वाचा एकाच क्लिकवर.
मराठवाड्यात अतिवृष्टीने प्रचंड नुकसान झालं आहे. लोकांच्या घरांचं, पिकांचं नुकसान पाहून शेतकऱ्यांसमोर आता जगायचं कसं? असा प्रश्न उभा राहिला आहे. हजारो शेतकऱ्यांच्या जमिनी खरडून गेल्या आहेत. अशा स्थितीत शेतकरी व विरोधक राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी सातत्याने करत आहेत. अशातच मुसळधार पावसामुळे व पुरामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना कशी मदत करता येईल यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक पार पडली. या बैठकीत सरकार शेतकऱ्यांसाठी व नुकसानग्रस्तांसाठी काय निर्णय घेतंय याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. सरकार ओला दुष्काळ जाहीर करतंय का याकडेही सर्वांचं लक्ष होतं. दरम्यान, राज्य सरकारने राज्यात ओला दुष्काळ जाहीर केला नाही. मात्र, दुष्काळ पडल्यानंतर जशा सवलती दिल्या जातात तशाच सवलती देणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
२२१५ कोटी रुपयांची मदत जाहीर करण्यात आली असून ती मदत वितरीत केली जात असल्याचं फडणवीस यांनी जाहीर केलं आहे.
‘रामसेतू’ पाडणार…आता पादचाऱ्यांसाठीही बंद होणार…नवीन पूल कुठे उभारणार ?
तापट स्वभावामुळे डोंबिवलीतील तरूणाची इमारतीवरून उडी मारून आत्महत्या
आनंदवार्ता! उत्तीर्ण विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क परत मिळणार; विद्यार्थ्यांनो, जाणून घ्या नेमकी योजना काय?
bribery case: गट क्रमांकाच्या दुरुस्तीसाठी हवे लाख; शेती खरेदी केल्यानंतर….
सप्टेंबरमध्ये पावसाने झोडपलं, आता ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा, या जिल्ह्यांना अलर्ट
बंगालच्या उपसागराच्या पश्चिम भागात कमी दाबाचा पट्टा सक्रिय असून पुढचे चार दिवस महाराष्ट्रात काही भागांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला ाहे. ३ ऑक्टोबरपर्यंत पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. प्रामुख्याने विदर्भ व मराठवाड्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे. आज केवळ नांदेड जिल्ह्याला अलर्ट देण्यात आला आहे. तर उद्यापासून कोकण-गोवा व मध्य महाराष्ट्रात मुसळधार पाऊस होऊ शकतो. तसेच १, २ व ३ ऑक्टोबर रोजी रत्नागिरी व साताऱ्यासह विदर्भ आणि मराठवाड्याला यलो अलर्ट देण्यात आला आहे.
जळगाव ते कॅनडा आंतरराष्ट्रीय रॅकेट चालविणारे ललित कोल्हे आहेत तरी कोण ?
फडके रोडवरील कोंडी सोडविण्यासाठी चिमणी गल्लीच्या प्रवेशव्दारावर बस उभ्या करण्यास प्रतिबंध…
Uday Samant : दादागिरी करून माझ्या खात्यात हस्तक्षेप केला तर खपवून घेणार नाही… संतप्त उदय सामंत यांनी कोणाला इशारा दिला?
लोकलमधून भिरकावल्या जाणाऱ्या निर्माल्याचा धोका ! तरुणाच्या मृत्यूनंतर नागरिकांमधून संताप
राज्यातील तंत्रनिकेतन, अभियांत्रिकी महाविद्यालयांना कोट्यवधींचा निधी… काय आहे योजना?
अनैतिक मानवी वाहतूक शाखा बरखास्त, महिला अत्याचार प्रतिबंधक कक्षाची स्थापना
MSCEP Online Exam: राज्यात २ हजार ४१० पदांसाठी डिसेंबरमध्ये ऑनलाइन परीक्षा… अर्ज भरण्याची मुदत काय, कोणाला संधी?
चिमण्याच्या मिरवणुकीत कोण, कोण…नाशिक पोलिसांकडून वरात…
अतिवृष्टीग्रस्तांच्या मदतीसाठी हिंदू मंदिरं पुढे, मग दर्गे-मशिदी मागे का? भाजपचा सवाल
भाजपा प्रवक्ते केशव उपाध्ये म्हणाले, ” अतिवृष्टी आणि महापूराच्या वेढ्यात सापडलेल्या महाराष्ट्रात लाखो कुटुंबे संकटात सापडली, शेकडो कुटुंबे उद्ध्वस्त झाली. अशा कठीण प्रसंगी तुळजाभवानी मंदिर, शेगाव गजानन महाराज संस्थान, सिद्धिविनायक मंदिर यांसारख्या हिंदू मंदिरांनी कोट्यवधी रुपयांची पारदर्शक मदत सरकारकडे पाठवली. कितीतरी मंदिरे, ट्रस्ट, सार्वजनिक मंडळांनी आपापल्या परीने अन्न, निधी आणि जीवनावश्यक वस्तू संकटग्रस्तांपर्यंत पोहोचवून माणुसकीचे दर्शन घडविले. पण राज्यातील अन्य धर्मीयांची प्रार्थनास्थळे दर्गा-मशिदी मागे का आहेत? त्यांच्या व्यवस्थापनाकडे कोट्यवधींचा निधी असतानाही, एकही ठोस मदतीची जाहीर घोषणा, निधीची उघड माहिती किंवा पूरग्रस्तांसाठी दिलासा का नाही?”
उपाध्ये म्हणाले, “कधी बोगस हिंदुत्वाचे बेगडी मुखवटे चढवून तर कधी गंगाजमनी तहजीबचे प्रेम दाखवत मंदिरांची टिंगल आणि हिंदूंवर टीका करणाऱ्या लांगूलचालनवादी नेत्यांनी व विचारवंतांनी हे प्रश्न आज स्वत:ला विचारायला हवेत. प्रश्न हिंदू-मुस्लिमचा नाही प्रश्न संवेदनशीलतेचा आहे.”
Maharashtra Weather : मुंबईसह राज्यात आजपासून पावसाचा जोर ओसरणार; मात्र ‘या’ दिवशी पुन्हा पाऊस पडणार
RSS Prayer: ‘नमस्ते सदा’ नव्हे, ‘ही ‘ होती संघाची प्रार्थना; १४ वर्ष चालली, बदलण्याचे कारण…
उद्धव ठाकरे, संजय राऊत यांची भाषा… गिरीश महाजन काय म्हणाले ?
अतिवृष्टीतील नुकसानीचे पंचनामे तत्काळ करावेत; विभागीय आयुक्तांची जिल्हाधिकाऱ्यांना सूचना
ठाणे ते तळकोकणात आठ महिन्यात ६८ लाचखोरीची प्रकरणे; सर्वाधिक प्रकरणे ठाणे परिक्षेत्रातील
घातक गोगलगायीचा अंबरनाथमध्ये प्रादुर्भाव; अंबरनाथ पूर्वेतील अटल उद्यानात शेकडो गोगलगायी, वनसंपदेलाही धोका
ठाणे : पुन्हा पाऊस, पुन्हा खड्डे, पुन्हा कोंडी
दिव्यांगांना शासकीय योजना, मार्गदर्शन, सेवा आता एका छताखाली; ठाण्यात ‘वन स्टॉप’ सक्षमीकरण केंद्र सुरु
ठाण्यात विसर्जनासाठी कृत्रिम तलावाऐवजी लोखंडी टाक्या उभारल्या; मनसेने केली चौकशीची मागणी
नवी मुंबईतील नाॅलेज पार्कची इतक्या कोटींना विक्री… पार्कची मालकी पंचशील रिअल्टीकडे
पेट्रोलमध्ये २० टक्के इथेनॉल मिसळण्यावरून केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्यावर टीका होऊ लागली आहे. यावर गडकरी म्हणाले, माझ्या निर्णयामुळे नाराज झालेली शक्तिशाली आयात ‘लॉबी’ माझी बदनामी करण्याचा प्रयत्न करत आहे. जीवाश्म इंधनाच्या आयातीवर जवळपास २२ लाख कोटी रुपये देशाबाहेर जात होते. माझ्या निर्णयामुळे काही लोकांच्या व्यवसायांना फटका बसला आणि ते रागाने माझी बदनामी करू लागते आहेत.