Maharashtra Politics : तुळजापूरच्या तुळजाभवानी मंदिरातील गाभाऱ्याला हात लावू देणार नाही असा इशारा जितेंद्र आव्हाड यांनी सरकारला दिला आहे. मंदिराच्या सुशोभीकरणाच्या नावाखाली इथले पुरातन आणि ऐतिहासिक महत्त्व नष्ट होणार असेल तर आम्ही त्याचा निषेध करु असंही आव्हाड म्हणाले आहेत. आता या आरोपांना सरकार काही उत्तर देणार का? हे पाहणं महत्त्वाचं असेल. मनोज जरांगेंनी २७ ऑगस्टला गणपती घेऊनच मुंबईत येणार आणि मराठ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी संघर्ष करणार असं म्हणत आंदोलनाची हाक दिली आहे. २७ ऑगस्टला आम्ही गाडीवर गणपती बसवणार. मुंबई आमचीही आहे आम्ही विसर्जनासाठी मुंबईतल्या अरबी समुद्रावर येणार असंही जरांगे म्हणाले आहेत. तसंच मी ठरवून आणि मॅनेज आंदोलन करत नाही असंही जरांगेंनी म्हटलं आहे. दादर येथील कबुतरखान्याबाहेर मराठी एकीकरण समितीने आंदोलनाची हाक दिली आहे. जैन मुनींनी दिलेल्या धमकीला मराठी एकीकरण समितीच्यावतीनं उत्तर देण्यात येणार आहे. यानंतर जैन मंदिराचं दार बंद करण्यात आलं आहे. यासह महत्त्वाच्या बातम्या आपण लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून पाहणार आहोत.
Mumbai Maharashtra दादर कबुतरखान्याबाहेर मराठी एकीकरण समितीची आंदोलनाची हाक, यासह महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेटवीर सुनील गावसकर यांना व्दिशतकापेक्षा मोठा आनंद कशात वाटतो…
गणेशोत्सवासाठी नवी मुंबई पालिका सज्ज; आयुक्तांकडून सुव्यवस्थेचे निर्देश
मांस विक्रीवरून शिंदेसेनेच्या आमदाराची अजित पवारांना साथ; म्हणाले, “प्रत्येकवेळी खाटिक समाजावर अन्याय का?”
अवजड वाहनबंदीचा उद्योगांना फटका; उद्योगाच्या पुरवठा साखळीवर परिणाम होत असल्याचे उद्योजकांचे म्हणणे
उत्सवकाळातील रक्तदान शिबिरांवर चाप; अतिरिक्त रक्त संकलित न करण्याचा एसबीटीसीचा रक्तपेढ्यांना इशारा
गडचिरोली : खाणप्रभावीत क्षेत्रासाठी १५० कोटींच्या खनिज निधीचे नियोजन, ४० किमी परिसरातील दुर्गम गावांचा कायपालट होणार…
नव्या पाटीसाठी जादा पैसे? ‘एचएसआरपी’ला मुदतवाढ, की जादा दंड आकारणी, याचा निर्णय राज्य शासनाकडे
“मी काँग्रेसमधून बाहेर पडण्यास हे सर्व कारणीभूत…”, प्रतिभा शिंदेंनी थेट नावे घेतली
पुण्यातील वीजवितरण क्षेत्रात आता थेट टाटांची उडी!
सिंधुदुर्ग:करूळ घाटात दरड कोसळल्याने वाहतूक ठप्प
सावंतवाडी : गेले दोन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे वैभववाडी तालुक्यातील करूळ घाटात दरड कोसळली. ही घटना बुधवारी दुपारच्या सुमारास घडली असून, यामुळे सुमारे दीड तास वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. रस्ते बंद झाल्याने महामार्गाच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या, ज्यामुळे प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागला.
तरेळे-कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गावर करूळ चेकनाका ते भट्टीवाडी स्टॉपदरम्यान रस्त्यावर दरडीचा मोठा भाग कोसळला. या घटनेची माहिती मिळताच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि ठेकेदार आर. बी. वेल्हाळ कंपनी यांच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी जेसीबीच्या साहाय्याने दरड बाजूला करून रस्ता वाहतुकीसाठी खुला केला. त्यामुळे दोन्ही बाजूला अडकलेल्या वाहनांना पुढे जाण्याचा मार्ग मोकळा झाला.
शालार्थ आयडीसाठी आता ई-ऑफिसचा वापर बंधनकारक; शिक्षण आयुक्तांचे निर्देश
सरन्यायाधीश गवई आणि कवाडेंची दिल्लीत भेट; आंबेडकर यांची टीका अन् भेटीची वेळ…
स्मार्ट प्रीपेड मीटरविरोधात संताप… मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात २.७८ लाखाहून अधिक मीटर…
पालघरमधील शेकडो खलाशी पोटासाठी गुजरातकडे रवाना; जीव धोक्यात घालून करतात मासेमारी
नागपूर: सेतूबंधन प्रकल्पाअंतर्गत रेल्वे उड्डाणपुलाचे काम; छत्तीसगडला जाणारी गाडी १७, १८ ऑगस्टला रद्द
‘एचएसआरपी’ मुदत दोन दिवसांवर, अमरावतीत ८३ टक्के वाहनांवर अजूनही जुन्याच नंबरप्लेट
“आम्ही काय खायचं हे सरकार ठरवणार का?”, सुप्रिया सुळेंचा सवाल; स्वातंत्र्य दिनी मांस विक्री बंदीबाबत मांडली भूमिका
राज्यातील काही महापालिकांनी घेतलेल्या एका निर्णयाची सध्या संपूर्ण राज्यात चर्चा रंगली आहे. स्वातंत्र्य दिनी मांस विक्री बंदीचा निर्णय काही महापालिकांनी घेतला आहे. या निर्णयामुळे राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे. सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने आले आहेत. या निर्णयावरून आता खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. आम्ही काय खायचं हे आता सरकार ठरवणार आहे का? असा सवाल सुप्रिया सुळे यांनी विचारला आहे.
‘एचएसआरपी’ नंबर पाटीबाबत मोठी बातमी… राज्यात ३० टक्केच वाहनांना पाट्या लागल्या… १५ ऑगस्टनंतर…
आज डावखुऱ्यांचा दिवस, अशा व्यक्तीची तुम्हाला माहिती आहे का? ते मेंदूच्या उजव्या बाजूचा….
कृष्णा पुलावर संरक्षक जाळी बसवण्यास ४३ लाखांचा खर्च; आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर कार्यवाही
यूपीएससी, एमपीएससी, लष्कर भरती परीक्षा पूर्व प्रशिक्षणासाठी अर्ज प्रक्रियेला सुरुवात
बालाघाट जिल्ह्यातील रामपायली तालुक्यात वैनगंगा नदीत ३ तरुण बुडाले
“…तर आम्ही एकत्र येण्याचा विचार करू”, अजित पवारांबाबत शरद पवारांच्या नेत्याचं मोठं विधान; पण ठेवली ‘ही’ अट
Rohit Pawar On Ajit Pawar and Sharad Pawar NCP : महाराष्ट्राच्या राजकारणात कायमच दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र येण्याच्या चर्चा रंगताना पाहायला मिळतात. या चर्चांचं कारण म्हणजे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील नेत्यांकडून करण्यात येणारे सूचक विधाने. त्यामुळे शरद पवार आणि अजित पवार हे एकत्र येण्याबाबत तर्कवितर्क लावले जातात. तसेच या चर्चांमागचं आणखी एक कारण म्हणजे शरद पवार आणि अजित पवार हे अनेकदा एका व्यासपीठावर आल्याचंही पाहायला मिळालं होतं. एवढंच नाही तर दोघांमध्ये अनेकदा संवादही झाल्याचं पाहायला मिळालेलं आहे. त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र येण्यासंदर्भात काही नेत्यांकडून दावे-प्रतिदावे केले जातात.
भंडारा : बेड्या ठोकलेल्या मनगटांवर बांधली राखी; कारागृहातील रक्षाबंधनाने कैदीही भारावले
धक्कादायक! स्लॅब टाकतांना १४ मजुरांना विजेचा धक्का , अल्पवयीन मजुराचा…
रोहित पवार हे तर बेकायदेशीर… माजी खासदार कडाडले आणि म्हणतात….
भात, मक्याचे क्षेत्र वाढले, तेलबियांचे घटले; जाणून घ्या, देशात खरीप पेरण्याची स्थिती
पोलिसांनी हीच तत्परता कबुतरखान्याच्या आंदोलनाच्या वेळी का दाखवली नाही… मराठी एकीकरण समितीचे १५ ते २० कार्यकर्ते आंदोलनापूर्वीच ताब्यात
आंध्र प्रदेशमधील किनारपट्टीवर कमी दाबाचा पट्टा सक्रिय; मोसमी पावसाचा जोर वाढणार
छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास मांडणारे थर रचले जाणार, मालाडमधील (पूर्व) शिवसागर गोविंदा पथकाकडून देखावा
दादर कबुतरखाना व्हिडीओ (फोटो – dadarmumbaikar / Insta)
दादर येथील कबुतरखान्याबाहेर मराठी एकीकरण समितीने आंदोलनाची हाक दिली आहे. जैन मुनींनी दिलेल्या धमकीला मराठी एकीकरण समितीच्यावतीनं उत्तर देण्यात येणार आहे.