नागपूर : आमदार बच्चू कडू यांच्या आंदोलनाची सरकार दखल घेणार नसेल तर सरकारला हे महागात पडेल. मतदान मिळाल्यावर मात्र विसर पडणे हे चुकीच आहे. तिन्ही पक्षाच्या जाहीरनाम्यामध्ये कर्जमाफीचा उल्लेख आहे. ८० हजार कोटीचे रस्ते करण्यासाठी पैसे आहे, कंत्राटदाराला मोठे करण्यासाठी पैसा आहे मात्र शेतकऱ्यांसाठी पैसे नाही. मंत्र्यांना बाहेर देशात घेऊन जाण्यासाठी पैसे आहे, आयपॅड घ्यायला पैसे आहे. जनतेच्या मनात सरकारच्या विरोधात वातावरण आहे, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) आमदार रोहित पवार यांनी दिला. ते आज नागपुरात परत्रकारांशी बोलत होते.
बच्चू कडू यांच्या भूमिकेला पाठिंबा देण्यासाठी आलो आहे. काल शरद पवार साहेब सुद्धा त्यांच्याशी बोललेले आहे. सत्तेत येण्यापूर्वी सातबारा कोरा करू म्हणत होते. अतिवृष्टी झाली नुकसान भरपाई मिळाली नाही, कोट बदलता मात्र शेतकऱ्यांचा रेनकोट तुम्हाला बदलता आला नाही. पक्षांतर सुरू आहे, मात्र भावांतर योजना अजून आणलेली नाही. सोयाबीन कपाशीचे भाव वाढत नाही. शेतकऱ्यांचा चार हजार कोटीचा नुकसान झालं. भावांतर योजना आणत नाही आणि आमची चेष्टा करता. शेतकरी हिताच्या निर्णयासाठी पाठिंबा देण्यासाठी आलेलो आहे, असे त्यांनी सांगितले. अजित दादा बोलले, सुनील तटकरे वेळ मिळेल तेव्हा सोयीचे राजकारण करत वक्तव्य करत असतात. महायुतीच्या तिन्ही पक्षाच्या नेत्यांमध्ये पहिलं वाक्य कर्जमाफी होती. आता मात्र विसर पडला.
संजय शिरसाट एखाद्याच प्रोजेक्ट बद्दल बोलू शकत नाही, कॉन्ट्रॅक्टरला मोठे करण्यासाठी हजारो कोटी रुपये खर्च केले जातात. संजय शिरसाट बोलताना लाडक्या बहिणी योजनेला पैसे दिले एवढेच म्हणतात. पैसे कॉन्ट्रॅक्टरच्या खिशात नाही घातले तर गरिबापर्यंत पोहोचले असते. हे सरकार फक्त कंत्राटदारांसाठी चालवले जात आहे. नियोजनाचा अभाव असल्यामुळे राज्य अडचणीत आलेले आहे. आठ लाख लाडक्या बहिणी कमी केल्या हा आकडा २२ लाखापर्यंत जाणार आहे. संजय गांधी किंवा इतर वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून नव्याने उत्पन्नाचा दाखला मागवला आहे हे महाराष्ट्र हिताचे नाही. शिरसाट हे भाजपला टार्गेट करू शकत नाही कारण भाजप मोठा भाऊ आहे. यांच्यातला वाद मिटवताना चार वर्ष निघून जातील.
राष्ट्रवादी मेळावा
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार ही फक्त चर्चाच होतील परवाच्या मेळाव्याचे स्पष्ट झालं. लोकांना विश्वासात घेऊन आपला संघर्ष करावा लागेल. कुटुंब एका बाजूला राजकारण एका बाजूला असतं. पुरोगामी विचाराचा वसा घेऊन शरद पवार यांच्या सोबत आम्ही आहो. विचार तोच ठेवून आहे मात्र आता स्टाईल बदलावी लागणार आहे.. जयंत पाटील, सुप्रियाताई, आव्हाड यांच्या मार्गदर्शनात नवीन ऊर्जा मिळेल.
राष्ट्रवादी जयंत पाटील राजीनामा नवीन चेहरा
जयंत पाटील यांनी हे भावनिक होऊन विधान केलेले आहे. त्यानी देखील राजीनामा दिलेला नाही.।निर्णय घेणारे ते स्वतः आहे, सुप्रियाताई आहे. येता काळात जर निर्णय घेतल्यास, देशाच्या राजकारणात जयंत पाटील गेल्यास प्रदेशाध्यक्ष म्हणून एखाद्या सामान्य कुटुंबातील व्यक्तीचं नाव घेतलं जावे. पार्टीसाठी दहा ते पंधरा वर्षापासून प्रामाणिक करत असेल आणि त्याला पद देऊन, एखादा संघटनात्मक पद घेऊन मी काम करणारा.. मोठे नेते सुद्धा कशा पद्धतीने निर्णय घेऊन खालपर्यंत काम केल्यावर सत्ता परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही.
शरद पवार यांच्या काळात मोठे नेते त्यांच्यासोबत संघर्ष काळात राहिलेले आहे. अनुभवाने ते सर्वे मोठे आहेत पण लढत असताना. धोरणात्मक निर्णय घेणारा धावपळ करू शकतात असा युवा असले पाहिजे. आणि सामान्य कुटुंबातील असला पाहिजे. मोठ्या नेत्यांनी धोरणात्मक मार्गदर्शन करून देश पातळीवर पक्ष वाढवण्यासाठी, देशपातळीवर देण्यासाठी अनुभव आणि युवा रस्त्यावर उतरणारा कार्यकर्ता असला पाहिजे.
पंतप्रधान कौतुक
त्या पदाचं कौतुक तिथे झालेल आहे . त्या ठिकाणी कोणीही असल तरी केलं असतं. विरोधी देशासोबत लढत असताना पंतप्रधान यांना पाठिंबा देणे म्हणजे डिफेन्स एअर फोर्स त्यांना पाठिंबा दिल्यासारखा असतो. आपल्या देशात आपण वाद घातल तर त्याचा फायदा पाकिस्तान सारखा देश देऊ शकतो. अटल बिहारी वाजपेयी यांनी इंदिरा गांधींना सपोर्ट केलं होतं.. शेतकरी कष्टकऱ्याचा जर विषय आला तर उद्या पंतप्रधानाच्या विरोधातही सुप्रियाताई बोलतील.