Maharashtra News Updates, 12 August 2024 : आगामी विधानसभेची निवडणूक दोन महिन्यांवर येऊन ठेपली आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी आतापासून जोरदार तयारी सुरू केली आहे. या अनुषंगानेच अजित पवारांनी जनसन्मान यात्रेच्या माध्यमातून प्रचाराचा नारळही फोडल्याचं बोललं जात आहे. सध्या सर्वच नेते, राज्याचा दौरा आणि मतदारसंघाचा आढावा, पदाधिकाऱ्यांच्या बैठका, सभा, मेळावे घेत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. यातच महाराष्ट्रात महायुती आणि महाविकास आघाडीच्या जागावाटपाचा फॉर्म्युला कसा असेल? यावरही खलबतं सुरु आहेत. दुसरीकडे मराठा आरक्षणाच्या मागणीच्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे राज्यभर दौरे करत आहेत. आता त्यांच्या शांतत रॅलीचा दुसरा टप्पा सुरु आहे. तसेच त्यांनी विधानसभा निवडणुकीत उमेदवार उभे करण्याचा इशाराही दिलेला आहे. तसेच आज शरद पवार यांच्या घराबाहेर मराठा आंदोलकांकडून आंदोलन करण्यात येणार आहे. मराठा आरक्षणाबाबत शरद पवार यांनी भूमिका स्पष्ट करण्याची मागणी या आंदोलकांनी केली आहे. दरम्यान, यासह अशा घडामोडी लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून जाणून घ्या.
Marathi News Today, 12 August 2024
कलावंतांची मुस्कटदाबी वाढत जाणे कितपत योग्य असे परखड सवाल ज्येष्ठ अभिनेते, दिग्दर्शक, चित्रकार अमोल पालेकर यांनी रविवारी उपस्थित केले.
भाषणावेळी काही काळ भाषण उभा राहून केल्यावर मध्येच खाली बसून त्यांनी भाषण केले.
“आज काल राजकारणात सुपारीचं राजकारण सुरु आहे. या सुपाऱ्या दिल्लीतून दिल्या जात आहेत. काही दिवसांपूर्वी मातोश्रीच्या बाहेर वक्फ विधेयकाचा मुद्द्यावरून मातोश्री बाहेर काही लोकांनी आंदोलन केले होते. हे लोक देखील असे लोक होते की त्यांना काहींनी सुपारी देऊन पाठवले होते. ते लोक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे होते”, असा आरोप संजय राऊतांनी केला.
“मी नांदेड शहरात काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष म्हणून अनेकदा आलो. २४ फेब्रुवारीला नांदेडला स्वातंत्र्य मिळालं. आता २४ फेब्रुवारी का? हे मी सांगण्याची तुम्हाला आवश्यता नाही. भारतीय जनता पक्षाची दुसऱ्यांची घर फोडण्याची सवय आहे. उद्धव ठाकरेंचं घर फोडलं, शरद पवारांचं घर फोडलं. मात्र, आता नांदेडमध्ये काँग्रेस पक्षात येणाऱ्यांची सख्या वाढली आहे”, असं म्हणत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी अशोक चव्हाण यांच्यावर टीका केली.