महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे (Congress) महाराष्ट्रातील प्रमुख नेते अशी अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांची ओळख आहे. त्यांचे वडील शंकरराव चव्हाण हे महाराष्ट्राचे दोनवेळा मुख्यमंत्री होते. १९८७ मध्ये अशोक चव्हाण हे पहिल्यांदा नांदेड लोकसभा मतदार संघामधून संसदेत पोहचले. यानंतर १९९२ मध्ये ते विधानपरिषद सदस्य बनले. १९९५ ते १९९९ ते महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे महासचिव होते.
यानंतर २००३ मध्ये ते विलासराव देशमुख यांच्या सरकारमध्ये मंत्री होते. २००८ मध्ये विलासराव देशमुखांनी राजीनामा द्यावा लागल्यानंतर ते मुख्यमंत्री झाले होते. मात्र नंतर आदर्श घोटाळ्यामध्ये नाव आल्याने २०१० त्यांचं मुख्यमंत्रीपद गेलं. त्यानंतर २०१४ मध्ये त्यांनी लोकसभा निवडणूक जिंकली. २०१५ मध्ये महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्षही होते.Read More
प्रस्तावित शक्तिपीठ महामार्गाचा डंका वाजवला जात असताना हा महामार्ग भाजपाचे नवे खासदार अशोक चव्हाण यांच्या प्रभावक्षेत्रातील शेतकर्यांवर जबर घाव घालणारा…
भाजपाचे राज्यसभेचे खासदार अशोक चव्हाण म्हणाले, काँग्रेसकडे नेतृत्वाचा आभाव आहे. राज्यात काँग्रेसला केवळ १७ जागा मिळाल्या आहेत. काँग्रेसची इतकी केविलवाणी…