Maharashtra : महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये पावसानं थैमान घातलं असून नैसर्गिक आपत्तीची परिस्थिती निर्माण झाली आहे. मराठवाड्याच्या ज्या भागांमध्ये अल्प पावसाची समस्या होती, अशा ठिकाणी गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस होत असून पुढील दोन दिवसदेखील पावसाचा जोर कायम राहणार आहे. या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या परिस्थितीची पाहणी करण्यासाठी खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अजित पवार, एकनाथ शिंदे व संपूर्ण मंत्रीमंडळ वेगवेगळ्या ठिकाणी दौऱ्यावर आहेत. पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं असून शेतकऱ्यांकडून नुकसान भरपाईची मागणी केली जात आहे.
Marathi News : महाराष्ट्रातील पावसासंदर्भातल्या सर्व महत्त्वाच्या घडामोडी…
ज्या ज्या वेळी असं संकट येतं, तेव्हा सरकार खंबीर असायला हवं. मी इथे राजकारण करायला आलेलो नाही. पण या सरकारला तुमच्यावर अन्याय करू देणार नाही हे सांगायला मी इथे आलोय. ओमदाद, कैलास, अंबादास दानवे असे सगळेच तुमच्या मदतीला आहेत. मी व्हिडीओ पाहिल्यानंतर कैलास, ओमराजे निंबाळकर यांना फोन केला की तुम्ही पुरात उतरून शेतकऱ्यांना मदत करताय, पण स्वत:चीही काळजी घ्या. तर ते मला म्हणाले की साहेब आमची काळजी करू नका. आम्ही शिवसेनाप्रमुखांच्या शिकवणीत तयार झालेलो आहोत. वाट्टेल ते झालं तरी आम्ही जनतेला वाचवण्याचा प्रयत्न करणार – उद्धव ठाकरे, अध्यक्ष, ठाकरे गट
बळीराजाचा हा आक्रोश सरकारपर्यंत कधी पोहोचणार? pic.twitter.com/I6wzZMnQ6P
— ShivSena – शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray (@ShivSenaUBT_) September 25, 2025
Live-in Relationship Crime: प्रेयसी आणि तिच्या मुलाच्या हत्येचा प्रयत्न… लिव्ह इन पार्टनर’ला अटक
आयुर्वेदाला नवे बळ देणारे आयुष मंत्रालयाचे बहुआयामी उपक्रम!
सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील वाघांना आता‘सेनापती’, ‘सुभेदार’, ‘बाजी’ अशी नावे
भरजरी शालू नेसवलेले काँग्रेसचे मामा पगारे मानसिक धक्क्याने रुग्णालयात दाखल; भाजप पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याच्या हालचाली
राज्य मार्गावर थाटले अनाधिकृत गाळे; शाळेलाही झाला धोका… कुणी केला हा प्रताप ?
प्रभादेवी पुलबाधितांचे पुनर्वसन… म्हाडाकडून एमएमआरडीएला ११९ घरांची यादी सादर
सेन्सेक्स १,००,००० अंशांवर जाणार
अखेर पूर परिस्थितीमुळे विविध परीक्षा पुढे ढकलल्या, एमपीएससीच्या परीक्षा….
वैद्यकीय शिक्षणाच्या एकदम १० हजार जागा वाढविण्याचा केंद्राचा निर्णय धोकादायक!
Devendra Fadnavis on Moving to Delhi: दिल्लीच्या राजकारणात प्रवेश करणार का? देवेंद्र फडणवीसांनी दिलं स्पष्टीकरण…
मी भाजपात काम करतो. इथे कोण मुंबईत राहणार किंवा दिल्लीत राहणार हे कुठलीही व्यक्ती ठरवत नाही. पक्ष ठरवतो. पण मला जितकी भाजपाची कार्यप्रणाली माहिती आहे, त्यानुसार मी सांगू शकतो की किमान ही पाच वर्षं तरी मी महाराष्ट्रात आहे. त्यानंतर पक्षाला जो निर्णय घ्यायचाय तो पक्ष घेऊ शकतो – देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री
मराठा आरक्षणाला विरोध…ओबीसीच्या याचिकांवर तातडीने सुनावणीस उच्च न्यायालयाचा नकार
कोटमगावात महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती यांच्या त्रिगुणात्मक स्वरुपाचे दर्शन
Ratnagiri Crime News: ‘माता न तू वैरिणी’…रत्नागिरीत आईने आपल्या एका वर्षाच्या बाळाला केले ठार
IRCTC Update: रेल्वेचे तिकीट काढताना पहिल्या १५ मिनिटांसाठी आधार प्रमाणीकरण अनिवार्य
Mumbai Coastal Underpass Fire: सागरी मार्गावरील भुयारात वाहनाला लागली आग…तासभर वाहतूक ठप्प
चंद्रपूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू, शाळांना सुट्टी जाहीर
Crime News: नगरमधील दुहेरी हत्याकांड प्रकरणी मुख्य आरोपीला सात वर्षांनी जामीन
Mhada Biometric Survey: उपकरप्राप्त इमारतींचे बायोमेट्रीक सर्वेक्षण दोन दिवसांतच ठप्प; कोणत्या कायद्याद्वारे सर्वेक्षण – मालक, रहिवाशांचा सवाल
राज्यातील दुसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर… कधी होणार परीक्षा, नियोजन काय?
झोपडवासीयांच्या देखभाल शुल्कापोटी आता एक ते तीन लाख रुपये!
राजपत्रित अधिकाऱ्यांचा एक दिवसाचा पगार पूरग्रस्तांसाठी !
Nashik illegal banner collapse: नाशिक महापालिका प्रशासनाची गांधारी…अवैध फलक, कमानींची बजबजपुरी
समृद्धी महामार्गावर १६ भव्य उपहारगृहे उभारण्यासाठी वेग
अतिवृष्टीग्रस्तांच्या मदतीसाठी सांगलीतून मदत पथक
सिंधुदुर्गच्या सागरी हद्दीत घुसून मासेमारी करणाऱ्या कर्नाटकच्या ‘हायस्पीड ट्रॉलिंग’ नौकेवर कारवाई
पत्रकारांच्या छळवणुकीच्या अनेक घटना घडत आहेत; उच्च न्यायालयाची टिप्पणी
Sohrabuddin sheikh encounter case: सोहराबुद्दीन बनावट चकमक खटला: निकालानंतर सहा वर्षांच्या विलंबाने साक्षीदारांना पुन्हा पाचारण करणे शक्य?
देवेंद्र कधी एकटा नव्हताच. लोकांना भास होतो की मी एकटा आहे. माझ्या फायद्याचंच आहे ते की त्यांना वाटावं मी एकटा आहे. मग ते मला कमी लेखतात. त्यानंतर आमचं सैन्य त्यांना आमची ताकद दाखवतात. त्यामुळे मला वाटतं की आता त्यांना कळलं असेल की एकटा देवेंद्र काय करू शकतो – देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री
विकासकांवर नाही, पण फेरीवाल्यांवरील कारवाईत मात्र तत्परता; महापालिकेच्या कृतीवर उच्च न्यायालयाचा संताप
"जळगाव जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे कपाशी, मका व इतर पिकांचे मोठे नुकसान." (छायाचित्र – लोकसत्ता टीम)
Marathi News Live Today: महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा एका क्लिकवर!