Maharashtra News Updates, 29 October 2025 : शेतकरी कर्जमाफीसाठी प्रहार जनशक्ती संघटनेचे प्रमुख बच्चू कडू यांनी मंगळवारी (२८ ऑक्टोबर) संध्याकाळपासून नागपूर हैदराबाद महामार्गावर शेतकऱ्यांसह ठिय्या मांडला आहे. त्यामुळे यवतमाळ नागपूर, चंद्रपूर -नागपूर हे सर्व महामार्ग बंद पडले आहे. महामार्गांवर लांबच लांब वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. या चक्काजाम आंदोलनात भाजपाचे आमदारही अडकल्याचं पाहायला मिळालं. दरम्यान, बच्चू कडू यांनी सरकारला इशारा दिला आहे की दुपारी १२ वाजेपर्यंत “आमच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर आम्ही महाराष्ट्र जाम करणार.” तर, “बच्चू कडू यांच्या आंदोलनावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लक्ष ठेवून आहेत”, असं कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितलं.
नागपुरातील आंदोलनामुळे चार राष्ट्रीय महामार्ग ठप्प असून १४ तासांहून अधिक काळ वाहतूक बंद आहे. यामुळे नागपूर जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झालं आहे. या आंदोलनाच्या सर्व बातम्यांचा आढावा आपण या लाइव्ह न्यूज ब्लॉगद्वारे घेणार आहोत.
दरम्यान, फलटणमधील डॉक्टर तरुणीचा मृत्यू गळफासामुळेच झाल्याचं शवविच्छेदन अहवालातून स्पष्ट झालं आहे. तर, मुलीच्या कुटुबियांनी हत्येचा आरोप केला आहे. पोलीस या प्रकरणी अधिक धागेदोरे मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. या प्रकरणातील सर्व अपडेट्स आपण जाणून घेणार आहोत.
शिवसेनेने (उबाठा) स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची तयारी सुरू केली असून मुंबई महानगरपालिकेत पक्ष नव्या चेहऱ्यांना संधी देणार असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे ज्यांचं वय ६० वर्षांहून अधिक असेल त्यांनी पुन्हा संधी मिळण्याची शक्यता कमी आहे.
मोंथा चक्रीवादळाने आंध्र प्रदेश व ओडिशाच्या समुद्रकिनाऱ्यावर थैमान घातलं आहे. या चक्रीवादळाने आतापर्यंत तिघांचा बळी घेतला आहे. तर, सुरक्षिततेसाठी हजारो लोकांना किनाऱ्यापासून दूर हलवण्यात आलं आहे.
Maharashtra Weather Today Live Updates : राज्यासह देशाच्या कानाकोपऱ्यातील राजकीय व सामाजिक घडामोडींचा आढावा एकाच क्लिकवर.
‘आंदोलन न थांबवता मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार’, बच्चू कडू यांची माहिती, उद्या फडणवीसांची भेट घेऊन चर्चा करणार
सरकारचं शिष्टमंडळ बच्चू कडू यांची भेट घेतली आहे. बच्चू कडू यांच्या मागण्यांबाबत सरकारचं शिष्टमंडळ चर्चा करत आहे. मंत्री पंकज भोयर आणि मंत्री आशिष जैसवाल यांचा यामध्ये समावेश आहे. उद्या बच्चू कडू हे मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेणार आहेत.
बच्चू कडू म्हणाले “ सरकारने न्यायालय विकत घेतले”
रस्त्यावर ठिय्या मांडून बसलेल्या आंदोलकांना न्यायालयाने रस्ता मोकळा करण्यास सांगितल्याने आंदोलक संतप्त झाले आहे. ते आंदोलन करण्यावर ठाम आहे, आम्हाला कारागृहात टाका,असे बच्चू कडू यांनी सांगितले व रात्री ते आंदोलकांसह स्वत:ला अटक करून घेण्यासाठी शहराच्या दिशेने निघाले. दरम्यान सरकारने न्यायालय विकत घेतले आहे,अशी प्रतिक्रिया त्यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केली.
सरकारचं शिष्टमंडळ बच्चू कडू यांच्या भेटीला, शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होणार?
सरकारचं शिष्टमंडळ बच्चू कडू यांची भेट घेतली आहे. बच्चू कडू यांच्या मागण्यांबाबत सरकारचं शिष्टमंडळ चर्चा करत आहे. मंत्री पंकज भोयर आणि मंत्री आशिष जैसवाल यांचा यामध्ये समावेश आहे.
शरद पवारांनी भाकरी फिरवली, राष्ट्रवादीच्या बुलढाणा जिल्हाध्यक्षपदी नरेश शेळके; ऐन ‘स्थानिक’ निवडणुकांच्या तोंडावर…
कल्याण डोंबिवली पालिका वर्धापनदिन कार्यक्रमासाठी कर्मचाऱ्यांना ‘हाजीर हो’ चे आदेश; कर्मचाऱ्यांच्या अनुपस्थितीमुळे रद्द केला होता वर्धापनदिन
“तुमचे दोन मंत्री आले नाही, आम्ही अटक व्हायला चाललो”, बच्चू कडू अटक करून घेण्यासाठी पोलिसांकडे निघाले
वर्धा रोडवर सुरू असलेल्या प्रचंड आंदोलनामुळे निर्माण झालेल्या वाहतूक कोंडीवर नागपूर खंडपीठाने बुधवारी स्वतःहून दखल घेतली आणि तातडीचे आदेश देत माजी आमदार ओमप्रकाश उर्फ बच्छू कडू यांना व त्यांच्या समर्थकांना लगेच रस्ता मोकळा करण्याचे निर्देश दिले. दरम्यान, न्यायायलयाच्या आदेशानंतर बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘आम्ही न्यायालयाचा अवमान करू इच्छित नाही’, असं बच्चू कडू यांनी म्हटलं. तसेच “तुमचे दोन मंत्री आले नाही, आम्ही अटक व्हायला चाललो”, असं म्हणत बच्चू कडू अटक करून घेण्यासाठी पोलिसांकडे निघाले आहेत.
video : पाण्यात उतरायचे तर कसे? वाघिणीचा बछडा घाबरतच पाण्यात उतरला, पण नंतर…
“आम्ही न्यायालयाचा अवमान करू इच्छित नाही, पण…”, हायकोर्टाच्या आदेशानंतर बच्चू कडू यांची प्रतिक्रिया
वर्धा रोडवर सुरू असलेल्या प्रचंड आंदोलनामुळे निर्माण झालेल्या वाहतूक कोंडीवर नागपूर खंडपीठाने बुधवारी स्वतःहून दखल घेतली आणि तातडीचे आदेश देत माजी आमदार ओमप्रकाश उर्फ बच्छू कडू यांना व त्यांच्या समर्थकांना लगेच रस्ता मोकळा करण्याचे निर्देश दिले. दरम्यान, न्यायायलयाच्या आदेशानंतर बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘आम्ही न्यायालयाचा अवमान करू इच्छित नाही’, असं बच्चू कडू यांनी म्हटलं आहे.
वाहतुक कोंडीत वाहने बंद पडण्याचे शुक्लकाष्ठ
नाशिक राज्य परिवहन महामंडळाची खऱ्या अर्थाने दिवाळी….राज्यात तिसऱ्या क्रमांकावर
बच्चू कडू आंदोलनाची हायकोर्टाकडून गंभीर दखल, वर्धा रोडवरील आंदोलकांना तात्काळ हटवण्याचे आदेश…
“भारताच्या सागरी क्षेत्रावर जगाचा विश्वास वाढला”, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मुंबईतील इंडिया मेरीटाईम वीकमध्ये वक्तव्य
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मुंबईतील इंडिया मेरीटाईम वीक २०२५ ला भाषण केले. यावेळी त्यांनी म्हटले की, “हा कार्यक्रम २०१६ मध्ये मुंबईत सुरू झाला होता. मुंबईत सुरू झालेला हा कार्यक्रम आता जागतिक कार्यक्रम बनला आहे. यामध्ये ८५ हून अधिक देश सहभागी होत आहेत. येथे शिपिंग क्षेत्राशी संबंधित अनेक योजना सुरू करण्यात आल्या. शिपिंग क्षेत्रात लाखो कोटी रुपयांचे सामंजस्य करार झाले आहेत. यावरून भारताच्या सागरी क्षेत्रावर जगाचा विश्वास वाढल्याचे दिसून येते.”
नवनीत राणांना ‘गँगरेप’ व ‘ठार मारण्याची’धमकी; स्पीड पोस्टद्वारे आलेल्या पत्राने खळबळ
शेतकरी आंदोलनाचा फटका… पेट्रोल पंप कोरडे होणार? नागपूर जिल्ह्यात…
अंबरनाथच्या शिवमंदिराचे शिल्पवैभवाचे नाट्यगृहात; आनंद दिघे नाट्यगृहात डॉ. कुमुद कानिटकर यांच्या छायाचित्रसंग्रहाचे कायमस्वरूपी प्रदर्शन
नागपूर : गडकरींच्या बर्ड पार्कमध्ये शेतकरी आंदोलकांचा ठिय्या
शेतकरी आंदोलन तापले… ‘एसटी’ची प्रवासी वाहतूक ठप्प… ६०० प्रवासी वाहतुक कोंडीत…
Salher Fort : साल्हेर किल्ल्यावर निधीचा वर्षाव…पुन्हा पाच कोटी रुपये…
अंबरनाथच्या वाढीव पाणीपुरवठा योजनेला दिरंगाईचा फटका; २५८ कोटींच्या योजनेसाठी आवश्यक जागा वन विभागाकडून हस्तांतरित नाहीच
तुम्ही सांगाल तो शब्द प्रमाण…माजी आमदार कुणाल पाटील यांचे कोणाला आश्वासन?
‘एआय’ जनरेटेड व्हिडिओने वाघाला पाजली दारू ! वनविभाग कारवाई करणार का..?
सिंधुदुर्गमध्ये राणे विरुद्ध राणे, नगरपंचायत निवडणुकीत दोन भावांमध्ये संघर्ष; आमदार म्हणाले, “युती होईल असं वाटत नाही”
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत राणे विरुद्ध राणे असा संघर्ष पाहायला मिळणार आहे. कारण भाजपा व शिवसेनेची (शिंदे) युती होणार नसल्याचं आमदार निलेश राणे यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे आमदार निलेश राणे हे शिवसेनेसाठी (शिंदे) व मंत्री नितेश राणे हे भाजपासाठी मोर्चेबांधणी करू लागले आहेत. निलेश राणे म्हणाले, आम्ही महायुतीसाठी आग्रही होतो. परंतु, आगामी निवडणुकीत युती होईल असं वाटत नाही. त्यामुळे आम्ही स्वबळावर आणि पूर्ण ताकदीने लढू. आम्ही कुठेही कमी पडणार नाही. सर्व निवडणुका आम्ही ताकतीने लढणार आणि जिंकणार.
