Maharashtra News Updates, 29 October 2025 : शेतकरी कर्जमाफीसाठी प्रहार जनशक्ती संघटनेचे प्रमुख बच्चू कडू यांनी मंगळवारी (२८ ऑक्टोबर) संध्याकाळपासून नागपूर हैदराबाद महामार्गावर शेतकऱ्यांसह ठिय्या मांडला आहे. त्यामुळे यवतमाळ नागपूर, चंद्रपूर -नागपूर हे सर्व महामार्ग बंद पडले आहे. महामार्गांवर लांबच लांब वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. या चक्काजाम आंदोलनात भाजपाचे आमदारही अडकल्याचं पाहायला मिळालं. दरम्यान, बच्चू कडू यांनी सरकारला इशारा दिला आहे की दुपारी १२ वाजेपर्यंत “आमच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर आम्ही महाराष्ट्र जाम करणार.” तर, “बच्चू कडू यांच्या आंदोलनावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लक्ष ठेवून आहेत”, असं कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितलं.
नागपुरातील आंदोलनामुळे चार राष्ट्रीय महामार्ग ठप्प असून १४ तासांहून अधिक काळ वाहतूक बंद आहे. यामुळे नागपूर जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झालं आहे. या आंदोलनाच्या सर्व बातम्यांचा आढावा आपण या लाइव्ह न्यूज ब्लॉगद्वारे घेणार आहोत.
दरम्यान, फलटणमधील डॉक्टर तरुणीचा मृत्यू गळफासामुळेच झाल्याचं शवविच्छेदन अहवालातून स्पष्ट झालं आहे. तर, मुलीच्या कुटुबियांनी हत्येचा आरोप केला आहे. पोलीस या प्रकरणी अधिक धागेदोरे मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. या प्रकरणातील सर्व अपडेट्स आपण जाणून घेणार आहोत.
शिवसेनेने (उबाठा) स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची तयारी सुरू केली असून मुंबई महानगरपालिकेत पक्ष नव्या चेहऱ्यांना संधी देणार असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे ज्यांचं वय ६० वर्षांहून अधिक असेल त्यांनी पुन्हा संधी मिळण्याची शक्यता कमी आहे.
मोंथा चक्रीवादळाने आंध्र प्रदेश व ओडिशाच्या समुद्रकिनाऱ्यावर थैमान घातलं आहे. या चक्रीवादळाने आतापर्यंत तिघांचा बळी घेतला आहे. तर, सुरक्षिततेसाठी हजारो लोकांना किनाऱ्यापासून दूर हलवण्यात आलं आहे.
Maharashtra Weather Today Live Updates : राज्यासह देशाच्या कानाकोपऱ्यातील राजकीय व सामाजिक घडामोडींचा आढावा एकाच क्लिकवर.
एकनाथ खडसेंच्या बंगल्यातून ‘त्या’ सीडींची चोरी
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते व आमदार एकनाथ खडसे यांच्या जळगावमधील बंगल्यातून सोने-चांदीसह रोख रकमेची चोरी झाल्याची घटना मंगळवारी (२८ ऑक्टोबर) उघडकीस आली होती. दरम्यान, चोरांनी त्यांच्या घरातून सोने-चांदीबरोबर खडसेंच्या काही महत्वाच्या सीडी व कागदपत्र देखील लंपास केले आहेत. स्वतः खडसे यांनी बुधवारी दुपारी प्रसारमाध्यमांना याबाबतची माहिती दिली.
आणखी एक हुंडाबळी; विषप्रयोग करून विवाहितेची हत्या
Bacchu Kadu Farmers Protest Nagpur : Video : राष्ट्रीय महामार्ग दहा तासांपासून ठप्प; दुतर्फा २० किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा….
सुरेश धस यांच्या भोवती पंकजा मुंडेंचे रिंगण ?
Eknath Khadse : जळगावमध्ये खळबळ… एकनाथ खडसेंच्या बंगल्यावरून ‘त्या’ सीडींची चोरी !
एसटीला दिवाळी हंगामात करोडोंचे उत्पन्न
स्वयंपुनर्विकास प्राधिकरणाला ५०० कोटींचा निधी देण्यास वित्त विभागाकडून विरोध!
लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर बाजारात दाखल झालेल्या हापूसला विक्रमी दर; ६ डझनांच्या पेटीला तब्बल २५ हजार रुपये
Farmers Protest Nagpur Traffic Jam : बच्चू कडूंच्या आंदोलनामुळे रुग्णांची फरफट…‘एनसीआय’, ‘एम्स’ आणि इतर रुग्णालयांत…
Video: दादर रेल्वे स्थानकात मद्यधुंद तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न; पोलिसांनी वाचवले प्राण
Vasai Virar Drug Case: महामार्गालगत उभे राहत असलेले अमली पदार्थांचे कारखाने कुठे आहेत ?
नाशिक जिल्ह्यात साईभक्तांच्या मोटारीला अपघात…सुरतचे तीन जण ठार
मोमीनपुरा उड्डाणपुलाचे काम ठप्प; काँग्रेस कार्यकर्त्यांनी अधिकाऱ्यांवर फेकले फुल
Gold-Silver Price : सोने, चांदीत पडझडीनंतर आणखी मोठा बदल… जळगावमध्ये आता किती दर ?
Outsourcing Recruitment : माहिती व जनसंपर्क विभागातील ६८ पदे ‘आऊटसोर्सिंग’ पध्दतीने भरणार…काय आहे शासन निर्णय ?
अवकाळी पावसाने भात पिकाचे मोठे नुकसान; शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई द्या, आमदार किसन कथोरे यांची मागणी
Bacchu Kadu Maha Elgar Protest Nagpur : अंध, अपंग, मूक बधीर शेतकरी आंदोलनात….पोलिसांच्या हस्तक्षेपावर मर्यादा
Bacchu Kadu Farmers Protest Nagpur : नागपुरात बच्चू कडूंच्या समर्थकांचे रेल्वे रोको आंदोलन सुरू
Child Kidnapping : नागरिकांच्या सतर्कतेमुळे बालक अपहरणाचा प्रयत्न फसला; परप्रांतीय कामगार जेरबंद
Bacchu Kadu : बच्चू कडू म्हणाले “उघड्यावरची रात्र आम्हाला नवीन नाही; पण आता भगतसिंगगीरी सुरू होईल!”
शेतकऱ्याचा असाही फंडा, तुरीसोबत गांजाचे मिश्र पीक; पोलिसांच्या कारवाईनंतर…
शेतकऱ्याचा असाही फंडा, तुरीसोबत गांजाचे मिश्र पीक; पोलिसांच्या कारवाईनंतर…
“काही हौसे नवसे गवसे आंदोलनात शिरून…”, मुख्यमंत्री फडणवीसांचा बच्चू कडूंना सावधानतेचा इशारा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “आंदोलकांनी लोकांना त्रास होईल असं काहीही करू नये. अशा प्रकारच्या आंदोलना काही हौसे नवसे गवसे शिरतात. अर्थात ह्या आंदोलनात शेतकरी देखील आहेत. परंतु, अनेक लोक, वेगवेगळ्या प्रवृत्ती आंदोलनात शिरून आंदोलनाला हिंसक वळण कसं देता येईल यासाठी प्रयत्न करतात. त्यामुळे सावध राहणं आवश्यक आहे.”
