Mumbai Weather Forecast Today : राज्यात पावसाचे थैमान चालू असून मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्र आणि कोकणात काही ठिकाणी अतिवृष्टी झाली आहे. मुंबई, नवी मुंबई व पनवेल भागातही मुसळधार पावसाने मोठं नुकसान झालं आहे. पनवेलमधील जनजीव विस्कळीत झालं आहे. पावसाने मराठवाडा व मध्य महाराष्ट्रात पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. दरम्यान, पुढील दोन दिवस राज्यात सर्वदूर मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. दरम्यान, रविवारपासून कोसळणाऱ्या या पावसामुळे चार जणांचा बळी गेला असून, मराठवाड्याला सर्वाधिक फटका बसला आहे.
Maharashtra News Live Updates : राज्याच्या कानाकोपऱ्यातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एकाच क्लिकवर.
उंबार्ली गाव प्रधानमंत्री फसल पीक विमा योजनेला मुकले! सदोष ऑनलाईन प्रणालीत गावाचे नावच नाही, शेतकऱ्यांमध्ये संताप
AIIMS Mental Health Drive: विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्यासाठी एम्सचा ‘नेव्हर अलोन’ उपक्रम! आत्महत्या कमी करण्यावर भर…
आंबिवली येथील अदानी समुहाच्या अंबुजा सिमेंट प्रकल्पाला नागरिकांचा जोरदार विरोध
Redevelopment stalled: मागासवर्गीय गृहनिर्माण योजनेतील चार हजार इमारतींचा पुनर्विकास रखडला
शिंदेंची शिवसेना विरुद्ध भाजप, उबाठा, मनसेचा सामना; ठाण्यातील शंभर वर्ष जुन्या स्पोर्टींग क्लब कमिटीची निवडणूक
पालघर : मोखाडा हद्दीत मृतदेह सापडण्याचे सत्र सुरूच
कात्रज ते हिंजवडी इलेक्ट्रिक डबलडेकर बसची चाचणी यशस्वी
नागपूर : २३२ हेक्टरवर जागतिक दर्जाचा पर्यावरण पर्यटन प्रकल्प
ठाणे : गावांच्या सर्वांगीण विकासाला चालना देण्यासाठी ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान’
Video : तब्बल सव्वादोनशे अतिक्रमणांवर हातोडा! अजितदादांच्या आदेशानंतर सुरू झालेली चाकणमधील थेट कारवाई सुरुच…
नाशिकमध्ये मानव-बिबट्या संघर्ष तीव्र… वन विभागाचे नर बिबट्यांकडे लक्ष का ?
कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये वीज चोरी करणाऱ्या तीन व्यापाऱ्यांवर गुन्हे
२००८ मालेगाव बॉम्बस्फोट : “तुम्ही खटल्यात साक्षीदार होता का?”, उच्च न्यायालयाची मृतांच्या कुटुंबियांना विचारणा
“…तर ठाणेकरांना एकत्र घेऊन मोठा लाँग मार्च काढू”, वाहतुक कोंडीच्या प्रश्नावर मनसे नेते अविनाश जाधव संतापले
पुण्यात मुसळधार पाऊस, रस्त्यांना नद्यांचे स्वरूप; नागरिकांची तारांबळ, मार्केट यार्ड पाण्याखाली
राज्यात परतीच्या पावसाला सुरुवात झाली असली तरी सध्या राज्यावर कमी दाबाच्या क्षेत्राचा परिणाम जाणवत आहे. पुण्यात आज (१६ सप्टेंबर) पुन्हा एकदा पावसाला सुरुवात झाली आहे. पुण्यासह आज पुण्याजवळील घाट माथ्यावर ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. हवामान विभागाचा अंदाज खरा ठरवत गेल्या दोन-तीन तासांपासून पुण्यात मुसळधार पाऊस चालू असून डेक्कन आणि जंगली महाराज रस्त्यावर पाणी साचलं आहे. तर ,मार्केट यार्ड परिसरात पाणीच पाणी झालं आहे. शेतकऱ्यांचा भाजीपाल्यासह फळ पाण्यात वाहतानाचे चित्र मार्केट यार्ड परिसरात दिसून येत आहे.
१८ वर्षे उपेक्षा; पण निलंगेकरांना कधी ‘वनवास’ वाटला नाही!
निजामाच्या काळात रेल्वे रुळ उखडणाऱ्या रणरागिणी कोण होत्या ?
Ambadas Danve: मराठवाडा मंत्रिमंडळातील निर्णयास सरकारकडून वाटाण्याचा अक्षता, अंबादास दानवे यांचा आरोप
“शिंदे के नाम से जो जुड़े हैं, वो नवी मुंबई जीतकर ही जाएंगे..”, खासदार नरेश म्हस्के यांचे गणेश नाईकांना आव्हान
राधानगरी धरणातून पंचगंगेचे पाणी दुधगंगेत; एक हजार सहाशे कोटींचा खर्च अपेक्षित
कराडला लोकन्यायालयात ६९६ खटल्यात सामंजस्य, ६ कोटी १८ लाख रुपयांच्या तडजोडीतून दावे यशस्वीरित्या निकाली
महाराष्ट्र ॲनिमेशन, गेमिंग धोरण जाहीर, मंत्रिमंडळ बैठकीत घेतले आठ मोठे निर्णय
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज (१६ सप्टेंबर) राज्य सरकारची मंत्रिमंडळ बैठक पार पडली. या बैठकीत आठ महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. यामध्ये नविन ॲनिमेशन आणि गेमिंग धोरणाला मंजुरी देण्यात आली आहे.
राज्य मंत्रिमंडळाने घेतलेले निर्णय
(उद्योग विभाग)
महाराष्ट्र ॲनिमेशन, व्हिज्युअल इफेक्ट्स, गेमिंग, कॉमिक्स आणि एक्सटेंडेड रिॲलिटी धोरण २०२५ जाहीर. सन २०५० पर्यंतचे नियोजन. सुमारे ३ हजार २६८ कोटी रुपयांचा आराखडा
(वस्त्रोद्योग विभाग)
अकोला येथील दि निळकंठ सहकारी सूतगिरणीला “खास बाब” म्हणून शासन अर्थसहाय मिळणार. अर्थसहाय्याच्या ५:४५:५० या गुणोत्तरानुसार निवड
(सामाजिक न्याय व विशेष सहाय्य)
मागासवर्गीय शासकीय वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या दैनंदिन निर्वाह भत्ता तसेच विद्यार्थींनीसाठीच्या स्वच्छता प्रसाधन भत्त्यात सुमारे दुपटीने वाढ. हजारो विद्यार्थ्यी- विद्यार्थिनींना दिलासा
(सहकार व पणन विभाग)
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी भवन योजनेस पुढील दोन वर्षांसाठी मुदतवाढ. राज्यभरात ११६ बाजार समित्यांमध्ये नवीन शेतकरी भवन बांधण्यासाठी, व अस्तित्वातील भवनांच्या दुरूस्तीसाठी असा एकूण १३२ कोटी ४८ लाखांचा खर्च. विविध ठिकाणी ७९ नवीन शेतकरी भवन उभारण्याचे प्रस्ताव.
(सहकार व पणन विभाग)
आधुनिक संत्रा केंद्र उभारण्याच्या योजनेस २ वर्षे मुदतवाढ. नागपूर, काटोल, कळमेश्वर, (जि.नागपूर), मोर्शी (जि.अमरावती ) व संग्रामपूर, (जि.बुलढाणा) येथे आधुनिक संत्रा केंद्र उभारण्यात येत आहेत. मुदतवाढीसह योजनेच्या स्वरुपात अनुषंगिक बदल करण्यास मान्यता
(सार्वजनिक बांधकाम विभाग)
भंडारा ते गडचिरोली दरम्यान ९४ किलोमीटरचा द्रुतगती महामार्ग. प्रवेश नियंत्रित द्रुतगती महामार्ग प्रकल्प महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून उभारण्यात येणार. प्रकल्पाच्या आखणीस व भूसंपादनास मान्यता. भुसंपादनासह अनुषंगिक ९३१ कोटी १५ लाख रुपयांच्या खर्चास मान्यता.
(ऊर्जा विभाग)
नवीनकरणीय ऊर्जा प्रकल्प उभारणीसाठी संयुक्त उद्यम कंपनी. महानिर्मिती व मे.सतलज जलविद्युत निगम लि. यांची संयुक्त उद्यम कंपनी स्थापन करण्यास मान्यता. राज्यभरात ५ हजार मेगावॅट क्षमतचे प्रकल्प विकसित करणार
(नियोजन विभाग)
राज्याच्या पायाभूत सुविधा उपसमितीला मंत्रिमंडळ समितीचा दर्जा.राज्यातील पायाभूत प्रकल्पांबाबत यापुढे उपसमिती यापुढे मंत्रिमंडळ समिती म्हणून कामकाज करणार
डोंबिवली, ठाणे परिसरातील ७० महिला शिक्षिका आदर्श शिक्षिका पुरस्काराने सन्मानित
उसाच्या हप्त्यासाठी शेतकरी संघटना आक्रमक; साखर सम्राटांची कोंडी
नववर्षात नागपूरला गॅस पाईपलाईनचे दुहेरी ‘गिफ्ट’, ओडिशाचा धामरा पोर्ट थेट…
नववर्षात नागपूरला गॅस पाईपलाईनचे दुहेरी ‘गिफ्ट’, ओडिशाचा धामरा पोर्ट थेट…
कराड : व्यावसायिक दांडिया-गरब्याला सकल हिंदू समाजाचा विरोध
कल्याणीनगर, कोरेगाव पार्क येथील पब, बार वर महापालिका मारणार ‘हातोडा’!
“शरद पवार यांनी प्रायश्चित्त करायला हवे…”, कोणी टीका केली?
अॅलोपॅथी डॉक्टरांच्या राज्य संघटनेची सूत्र महिलेच्या हाती… निवडणुकीत विजय.. डॉ. मंजुषा गिरी म्हणाल्या…
Heavy rains in Maharashtra : राज्यात पावसाचा कहर,चौघांचा बळी; मराठवाड्याला सर्वाधिक फटका (लोकसत्ता टिम)
राज्याच्या विविध भागांत गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. कमी दाबाच्या क्षेत्राने त्यात भर घातली आहे. त्यामुळे सध्या राज्यात पावसाला पोषक वातावरण निर्माण झाले आहे. त्याचा पहिला फटका मराठवाड्याला बसला. त्यापाठोपाठ सोलापूर, सांगलीसह मध्य महाराष्ट्रातील इतर जिल्ह्य़ांमध्येही अतिवृष्टी झाली. कोकणातही अनेक ठिकाणी मुसळधार पावसाची नोंद झाली आहे. ठाणे, नवी मुंबईतही जोरदार पाऊस झाला. पुणे शहर आणि परिसरातही रविवारपासून पावसाचा जोर वाढला आहे. सध्या मोसमी पावसाच्या परतीचा प्रवास सुरू आहे, मात्र राज्यात सध्या कमी दाबाच्या क्षेत्राचा परिणाम होत आहे.