Maharashtra Monsoon Session 2025 Updates, 18 July : महाराष्ट्र विधिमंडळ पावसाळी अधिवेशन सुरू असून आज विधीमंडळात कोणत्या मुद्द्यांवर चर्चा होणार याकडे लोकांचं लक्ष लागलं आहे. तसेच गुरुवारी (१७ जुलै) विधीमंडळ परिसरात आमदार गोपीचंद पडळकर व आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या हाणामारीचे राज्यभर पडसाद उमटत आहेत. आज अधिवेशनात याच मुद्द्याभोवती चर्चा होताना दिसत आहे. यासंबंधीच्या बातम्यांच्या आढावा आपण घेणार आहोत. तसेच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका मुलाखतीत महाराष्ट्रात त्रिभाषा सूत्र लागू करणारच अशी ठाम भूमिका घेतली आहे. यावरून रायकीय वर्तुळातील वातावरण पुन्हा तापण्याची शक्यता आहे. यासह सर्व सामाजिक, राजकीय व स्थानिक बातम्यांच्या आढावा आपण या लाइव्ह न्यूज ब्लॉगद्वारे घेणार आहोत.
Maharashtra Breaking News Live Today : महाराष्ट्रातील व देशभरातील महत्त्वाच्या सामाजिक व राजकीय बातम्या वाचा एकाच क्लिकवर.
सोमनाथ सूर्यवंशी मृत्यूप्रकरणी कुणालाही पाठिशी घालण्याचा सरकारचा विचार नाही : फडणवीस
सोमनाथ सूर्यवंशी मृत्यूप्रकरणी रिपोर्ट जेजे रुग्णालयातपाठवले. हृदयविकाराने मृत्यू झाल्याचं समोर आलं. तथापि, सरकार अंतिम निष्कर्षापर्यंत पोहोचलं नाही. नेमलेल्या कमिशनचा रिपोर्ट आल्यानंतरच निर्णय घेतला जाईल. कुणालाही पाठिशी घालण्याचा सरकारचा विचार नाही. न्या. अचलिया समितीचा अहवाल आल्यानंतर निर्णय घेऊ.
महापारेषणच्या पडघा वीज उपक्रेंद्रातील बिघाडामुळे कल्याण, डोंबिवलीत वीज भारनियमन
प्रवीण गायकवाड यांच्यावरील हल्ला प्रकरण
देवेंद्र फडणवीस म्हणाले, प्रवीण गायकवाड तक्रार करायला तयार नव्हते. तरी पोलिसांनी कारवाई केली. नॉनबेलेबल कारवाई केली आहे. त्या आरोपींनी कधीतरी भाजपामध्ये प्रवेश केला होता. राष्ट्रवादी- काँग्रेसच्या बाबतीतही अशीच घटना यापूर्वी घडली आहे. कुणी तरी हल्ला केला म्हणजे संघटनेचा आदेश नसतो. विरोधकांची मनोवृत्ती संकुचित व्हायला लागली आहे. आम्हीही घटनेचा निषेध केला. त्या घटनेलास्टेट स्पॉन्सर्ड टेररिझम म्हणणं चुकीचं आहे. चंद्रकांत पाटलांवर सोलापुरात शाईफेक झाली होती. तेव्हा मकोका मागणी होत होती. परंतु, पाटील म्हणाले मकोका नको.
कालच्या घटनेवर आत्मचिंतन आवश्यक – फडणवीस
कालच्या घटनेवर आत्मचिंतन आवश्यक आहे, असं म्हणत मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितली राज्य सरकारची त्रिसुत्री. गुन्हेगारी पार्श्वभूमीची मंडळी विधानभवन परिसरात येणं योग्य नाही. विनाबिल्ला कुणीही आलं नाही पाहिजे हे माझ्याच लक्षात आलं आहे. टकलेवर ५, तर देशमुखवर ८ गुन्हे दाखल आहेत.
मकोका कारवाई केलेल्या गुंडाचा सहकारनगर पोलीस ठाण्यात गोंधळ; पोलिसांच्या चेहऱ्यावर स्प्रे मारुन तोडफोड
तांत्रिक बिघाडाची माहिती देण्याऐवजी मध्य रेल्वे बिहारचे गुणगान गाण्यात व्यस्त…
कल्याणमध्ये व्दारलीपाडा येथे गुरचरण जमिनीवरील बेकायदा चाळींवर कारवाई; भूमाफियावर ‘एमआरटीपी’चा गुन्हा
“आमदार खुणावतो, गुंड येतात अन्…”, जितेंद्र आव्हाडांनी हाणामारीतील पाच आरोपींची नावं केली जाहीर
मराठा आरक्षणाप्रकरणी आजपासून नव्याने सुनावणी
चित्रपट ओटीटी माध्यमावर प्रदर्शित करण्याचे आश्वासन…अभिनेत्री पूजा बॅनर्जीची दीड कोटींची फसवणूक
गुरुवारी विधानसभेत झालेल्या राड्याप्रकरणी विधानसभा अध्यक्षांनी आमदार गोपीचंद पडळकर व आमदार जितेंद्र आव्हाड यांना सभागृहात खेद व्यक्त करण्यास सांगितलं. मात्र, आव्हाड यांनी यावेळी त्यांना आलेल्या धमकीचा उल्लेख केला. त्यावर सत्ताधारी आमदारांनी आव्हाडांना रोखलं व मूळ विषयावर बोलण्यास सांगितलं. त्यानंतर विरोधी बाकांवरील आमदार म्हणाले, “आव्हाडांना बोलू द्या, त्यांचं बोलणं थांबवू नका.” यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, “काल इथे जे काही झालं त्यामुळे केवळ एका माणसाची प्रतीष्ठा गेली नाही. संपूर्ण सभागृहाच्या प्रतिष्ठेला गालबोट लागलं आहे. हे काही बरं नाही. आज बाहेर एकट्या पडळकर यांना शिव्या पडत नाहीयेत. आपल्या सर्वांनाच शिव्या पडत आहे. लोक म्हणतायत की सगळे आमदार माजलेत.”
तब्बल २५ वर्षांनी म्हाडाचे घर मिळणार… पण मोजावे लागणार ५१-५२ लाख रुपये…
अल्पवयीन मुलीचे व्हिडिओ इन्स्टाग्रामवर वायरल करणाऱ्याला अटक… बहिणीला मारण्याची धमकी देऊन दुष्कृत्य
डोंबिवलीतील तीन तरूणांची रेल्वेत नोकरीचे आमिष दाखवून २३ लाखाची फसवणूक
ॲप आधारित वाहन चालकाची आत्महत्या… संपकऱ्यांचे आमरण उपोषण
शशिकांत शिंदेंनी उपस्थित केला विधान भवनातील लोकप्रतिनिधींच्या सुरक्षेचा मुद्दा
मंत्र्यांनी पास दिला नाही, सभापतींनी पास दिला नाही पण मी आलो असं कार्यकर्त्याने सांगितलं. कसा आलो ते विचारा नका असं त्याने सांगितलं. सभागृहात कोण येतंय माहिती नाही. अतिरेकी आला तरी प्रवेश मिळेल. आरोपी आत येतो, मारहाण करतो. सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध आहे. तरी एका व्यक्तीवर कारवाई झाली नाही. सभापतींनी अधिकार दिला कारवाईचा. तू तरी राहशील नाहीतर मी राहीन असा संदेश जितेंद्र आव्हाड यांना आला आहे. सभागृहाची पत राखावी. बिहारचा उल्लेख करतात. महाराष्ट्राचं काय चाललंय हे सरकारने पाहावं. कायद्याचा धाक असला पाहिजे. लोकप्रतिनिधीला धोका निर्माण झाला आहे. सगळ्या चर्चा बाजूला ठेवा आणि याप्रकरणी कारवाई करा.
शशिकांत शिंदे, (राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गट) विधान परिषदेतून लाइव्ह
राज्यातील अनाथ विद्यार्थ्यांसंदर्भात महाराष्ट्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार आता अनाथ विद्यार्थ्यांना व्यावसायिक अभ्यासक्रमांचं शिक्षण मोफत दिलं जाणार आहे. तसेच त्यांना शैक्षणिक शुल्क व परीक्षा शुल्कात १००% सूट दिली जाणार आहे. महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांनी याबाबतची माहिती दिली आहे.
तटकरे यांनी म्हटलं आहे की “महाराष्ट्रातील अनाथ विद्यार्थ्यांना व्यावसायिक अभ्यासक्रमांचं शिक्षण मोफत देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. राज्यातील असंख्य अनाथ विद्यार्थ्यांना त्यांचे भविष्य घडवण्यासाठी आधार देणारा हा निर्णय घेण्यास मोठे पाठबळ दिल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे मनापासून आभार.”
“याबाबत शासन निर्णय निर्गमित करण्यात आला असून, या निर्णयास अनुसरून राज्यातील शासकीय महाविद्यालये, शासन अनुदानित अशासकीय महाविद्यालये, अंशतः अनुदानित, कायम विनाअनुदानित महाविद्यालयांमध्ये अनाथ बालकांना शैक्षणिक शुल्क व परीक्षा शुल्कात १००% सूट देण्यात येणार आहे. यासाठी सदर लाभार्थी महाराष्ट्राचा रहिवासी असणे आवश्यक असून, कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ८ लाखांपेक्षा कमी असलेले अनाथ विद्यार्थी या शैक्षणिक लाभासाठी पात्र असणार आहेत.”
विधान भवनातील राड्यावरून विधान परिषदेतलं वातावरण तापलं
विधिमंडळाची लोकांमध्ये झालेली प्रतिमा वेदनादायी आहे. वैयक्तिक द्वेष खालच्या पातळीवर उतरला आहे. सदनाच्या बाहेर जे होतं ते आता सदनाच्या आत होतं आहे.
-शशिकांत शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गट
विधीमंडळात गुंडांना आणण्यासाठी कोण पासेस विकतं, पहिल्या गेटमधून येताना कोणाला किती रुपये द्यावे लागतात, दुसऱ्या गेटमध्ये किती द्यावे लागतात याची माहिती आम्ही देऊ.
-अनिल परब, शिवसेना उबाठा
पासची कार्यप्रणाली पीठासीन अधिकाऱ्यांच्या अखत्यारित येते. विधानसभा अध्यक्ष आणि विधानपरिषद सभापती यांच्या परवानगीने पासची प्रक्रिया चालते. पाससंदर्भात पुरावे द्या. चौकशी करण्याची सरकारची तयारी आहे. पुरावे द्या, नावं द्यावी, व्हीडिओ रेकॉर्डिंग द्या- सांगाल त्या यंत्रणेकडून चौकशी करण्याची तयारी- शंभूराज देसाई, मंत्री
जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधातही गुन्हा…पोलिसांच्या वाहनासमोर आव्हाडांचे ठिय्या आंदोलन
तुमच्या इशाऱ्यानंतर कार्यकर्त्यांनी विधीमंडळात राडा केला? गोपीचंद पडळकर म्हणाले, “नितीन देशमुखला…”
खोल समुद्रातील मासेमारीच्या नव्या हंगामाची लगबग; बंदरात मच्छीमारांची बोट दुरुस्ती सुरू
जितेंद्र आव्हाडांविरोधात गुन्हा दाखल, कारण काय?
१७ जुलै रोजी मध्यरात्री जितेंद्र आव्हाड यांनी विधान भवन परिसरात पोलिसांच्या कारसमोर ठिय्या आंदोलन केलं होतं. पोलिसांनी कार अडवल्याप्रकरणी सरकारी कामात अडथळा आणल्याचा ठपका ठेवत आमदार आव्हाड यांच्याविरोधात मरिन लाइन्स पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारने पोलीस आव्हाडांच्या कार्यकर्त्याला पोलीस ठाण्यात घेऊन जात होते. यावरून आव्हाडांनी प्रश्न उपस्थित केला होता की ज्याने मारहाण केली आहे तो मोकाट फिरतोय आणि ज्याला मारहाण झालीय, त्याच्यावर तुम्ही कसला गुन्हा दाखल करताय? मार खाल्लेल्या माणसाला का अटक करताय?
विधिमंडळ हाणामारीप्रकरणी दोघांना अटक…मरिन ड्राईव्ह पोलिसांची कारवाई…
विधान भवनातील हाणामारीचं प्रकरण राज्यपालांच्या कोर्टात
काँग्रेस आमदारांनी विधीमंडळात झालेल्या हाणामारीच्या घटनेचाही उल्लेख राज्यपालांसमोर केला. यावर वडेट्टीवार म्हणाले, कालची घटना ही विधानसभेच्या गौरवाला कलंक, राज्यपालांनी या घटनेकडे गांभीर्याने पाहावे. काल जे काही घडलं ती सत्तेची मस्ती होती. मकोकाच्या कलमाखाली गुन्हा दाखल असलेल्या आरोपीला विधानभवनात प्रवेश मिळतोच कस? असा प्रश्न देखील वडेट्टीवारांनी उपस्थित केला आहे.
राज्यपालांनी जनसुरक्षा विधेयक मंजूर करू नये – वडेट्टीवार
जनसुरक्षा विधेयक मंजूर करू नये, ही मागणी घेऊन काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी काही वेळापूर्वी राज्यपालांची भेट घेतली. यावेळी ते म्हणाले, हे जनसुरक्षा नव्हे सरकारसुरक्षा विधेयक आहे.
पनवेलकरांसाठी अखेर ‘अभय’, मालमत्ता करावर चार टप्प्यांत शास्ती माफी लागू
महारेराच्या आदेशांकडे विकासकाचे दुर्लक्ष; अंधेरीतील इमारतीचे दोषदायित्व दूर करण्यास टाळाटाळ
ठिय्या आंदोलनप्रकरणी जितेंद्र आव्हाडांवर गुन्हा दाखल
१७ जुलै रोजी मध्यरात्री जितेंद्र आव्हाड यांनी पोलिसांच्या कारसमोर ठिय्या आंदोलन केलं. पोलिसांनी कार अडवल्याप्रकरणी सरकारी कामात अडथळा आणल्याचा ठपका ठेवत आमदार आव्हाड यांच्याविरोधात मरिन लाइन्स पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.