Mumbai Maharashtra Breaking News : गेल्या काही दिवसांपासून राज्यावर लहरी हवामानाचं घोंगडं आहे. कधी पाऊस तर कधी कडक उन्हाचा सामना करावा लागत आहे. तर, दुसरीकडे राज्यातील राजकारणातही सातत्याने अनेक घडामोडी घडत आहे. मराठा आणि ओबीसी समाजाच्या आरक्षण मुद्द्यावरून राज्यात वाद पेटला असून यामुळे समाजात दुफळी निर्माण झाली आहे. दोन समाजातील हा वाद मिटावा म्हणून आता शरद पवारांनी लक्ष घालावं, अशी मागणी छगन भुजबळांनी केली. या करता त्यांनी काल शरद पवारांची भेट घेतली होती. तर, आज सकाळीच वारीला जाणाऱ्या बसचा भीषण अपघात झाला आहे. या अपघतात ५ वाकऱ्यांचा जागीच मृत्यू झाला आहे तर अनेकजकणी जखमी झाले आहेत. यासह राज्यातील इतर घडामोडी पाहुयात.
Marathi News Updates : महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी वाचा
सोमवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे उरणला पाणीपुरवठा करणारे रानसई धरण भरून वाहू लागले आहे.
Trainee IAS Pooja Khedkar अकोला : वादग्रस्त प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या अडचणीत चांगलीच वाढ होत आहे. पूजा खेडकर यांची वाशिमच्या महिला पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या चमूने सोमवारी रात्री चौकशी केल्याची माहिती आहे.
बुलढाणा : मागील सात जुलैला खामगाव तालुक्यात झालेल्या अतिवृष्टी आणि ढगफुटी सदृश्य पावसामुळे शेत जमीन आणि पिकांचे अपरिमित नुकसान झाले आहे. त्रिपुरा राज्याच्या दौऱ्यावरून परतलेल्या केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी आज या नुकसानीची पाहणी केली.
संबंधित संस्थेतील कनिष्ठ अधिकाऱ्याविरुद्ध कोरेगाव पार्क पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.
पुण्यातील शिवाजीनगर भागातील मोदी बागेतील शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्या निवासस्थानी सकाळच्या सुमारास सुनेत्रा पवार यांनी या दोघांची जवळपास तासभर भेट घेतली.
गोंदिया : अर्जुनी मोरगाव तालुक्यातील खांबी/पिंपळगाव येथे विज पडल्याने म्हैस जागीच ठार झाली. ही घटना १५ जुलैच्या सायंकाळी ७:३० वाजता सुमारासची आहे. या घटनेत पशुपालक शेतकरी हेमराज नानु मेश्राम यांचे नुकसान झाले आहे.
औरंगाबाद : “आज मी मोठी घोषणा करणार आहे. यासाठी औरंगाबादमधील सुभेदारी शासकीय विश्रामगृहावर दुपारी 4 पत्रकार परिषद घेणार आहे”, अशी माहिती वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड प्रकाश आंबेडकर यांनी ट्विट करत दिली आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही घोषणा असेल का ? राजकारणात मोठी उलथापालथ होणार का ? अशा प्रश्नांना यामुळे उधाण येतं आहे.
I will be making a BIG announcement today.
— Prakash Ambedkar (@Prksh_Ambedkar) July 16, 2024
Press Conference at Subedari Government Guest House in Aurangabad.
See you at 4 PM. https://t.co/a9I8zXYPnH
मुंबईतील शाळा सुरू होऊन महिना झाला आहे. मात्र, अद्यापही मुंबई महानगरपालिकेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्यासाठी प्रतीक्षा करावी लागत आहे.
अनेक शहरांचा विस्तार वाढला, गुन्हेगारीचे प्रमाण वाढले, लोकसंख्याही वाढली, वाहनांची संख्या वाढली, अशावेळी पूर्वीचे मनुष्यबळ निश्चितपणे कमी पडत आहे ही वस्तुस्थिती आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर युवानेते विवेक कोल्हे भविष्यात कोणती वाट पकडणार? याबद्दल उत्सुकता व्यक्त केली जात आहे.
आर्थिक प्रलोभन देत फसवणूक करण्याचे प्रकार नवे नाहीत. तरीही सुशिक्षित म्हटल्या जाणारा मोठा वर्ग त्यास बळी पडत असल्याचे आजही दिसून येते.
ससून सर्वोपचार रुग्णालयात सध्या रक्तटंचाई आहे. रुग्णांच्या नातेवाइकांना बाहेरून रक्त पिशव्या आणाव्या लागत आहेत.
मुंबईत सर्वाधिक ३९७ बलात्काराचे गुन्हे दाखल असून त्यापाठोपाठ ठाणे शहरातत १४८ गुन्हे दाखल आहेत.
गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे माजिवाडा पुलावर बुजवलेले खड्डे उख़डले असून अनेक ठिकाणी खड्ड्यांचे डबके तयार झाले आहेत.
अहमदाबाद येथील जीएसटी आयुक्त चंद्रकांत वळवी यांनी त्यांचे कुटुंब आणि नातेवाइकांच्या नावावर साताऱ्यातील कांदाटी खोऱ्यातील झाडानी (ता. महाबळेश्वर) येथील ६४० एकर जमीन खरेदी केली आहे.
नाशिक-मुंबई महामार्गावर काही ठिकाणी पुलांची कामे सुरू असून तेथील सेवा रस्त्यांवर अधिक खड्डे आहेत. त्यामुळे वाहतूक कोंडी होऊन खोळंबा होतो, ही वस्तूस्थिती आहे.
राज्यातील गावातील समाज-समाजात शत्रूत्व निर्माण व्हायला लागलं आहे. एकमेकांचं डोकं फोडण्यापर्यंत प्रकरण गेलं आहे. माझ्याकडे फोटो येत असतात, मी पोलिसांना कळवत असतो. पण पोलिसांकडून सोडवला जाणारा हा प्रश्न आहे असं मला वाटत नाही. हे शत्रुत्त्व आणि दुफळी वाढली, तर आज हे संपणार नाही. इतर प्रश्न संपतील पण दुश्मनी कायम राहील. त्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, फडणवीस, अजित पवारांनी ठरवलं की सर्वपक्षीय बैठक घेऊया. मी स्वतः सांगितलं होतं की पवारांनी हजर राहणं आवश्यक आहे. त्याप्रमाणे मी वडेट्टीवार यांनाही कागदपत्र दिलं होतं. साहेबांना सांगा तुम्ही आवश्य यायला पाहिजे, असं त्यांना सांगितलं होतं. परंतु, सर्वपक्षीय बैठकीला विरोधी पक्षाचं कोणीही हजर राहीलं नाही. त्यामुळे प्रश्न सुटणार कसा? हा राजकीयपेक्षा सामाजिक प्रश्न आहे. राजकीय प्रश्नाचे परिणाम ते कदाचित ताबडतोब भरून निघतात. सामाजिक प्रश्नाचे गंभीर परिणाम होतात. यात लहान- गरीब माणसं होरपळून निघतात. सर्व पक्ष एकत्र आल्याशिवाय गत्यंतर नाही असं माझं मत आहे – छगन भुजबळ