Maharashtra Monsoon Session 2025 Highlights: महाराष्ट्र विधिमंडळ पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत विधानभवनात सत्ताधारी आणि विरोधक विविध मुद्द्यांवर एकमेकांसमोर उभे ठाकल्याचं पाहायला मिळत आहे. दुसरीकडे सभागृहाबाहेर राज ठाकरे व उद्धव ठाकरे यांच्या संभाव्य युतीची जोरदार चर्चा होत आहे. आगामी पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष आपापली ताकद आजमावून पाहात असताना जुलै महिन्याच्या सुरुवातीपासून पावसानंही राज्यभर जोरदार हजेरी लावल्याचं दिसत आहे.
Latest Maharashtra News Live Today: महाराष्ट्र विधिमंडळ अधिवेशनातील सर्व महत्त्वाच्या घडामोडी वाचा एकाच ठिकाणी…
Marathi-Hindi Controversy: “मुंबई महानगरपालिकेत…”, राज ठाकरेंवर मराठी-हिंदी वादावरून निशिकांत दुबेंची पुन्हा टीका; शेअर केली ‘विकिलीक्स’ नोंद
CJI BR Gavai: “मलाही अधिकारी घाबरतात…”, अजित पवारांकडे बघत सरन्यायाधीश बी. आर. गवई काय म्हणाले? सभागृहात पिकला हशा
विधीमंडळाच्या पायऱ्यांवरून आदित्य ठाकरेंची मर्सिडीजवरून घोषणा, नीलम गोऱ्हेंचा एक कटाक्ष अन्…
“पोलीस मराठी आंदोलकांना पकडत असताना गुजराती-मारवाडी आम्हाला चिडवत होते”, मोर्चेकरी महिलेने मांडली व्यथा
मीरा भाईंदरमध्ये मराठी अस्मितेसाठी आंदोलन चालू असताना पोलिसांनी मराठी आंदोलकांची धरपकड चालू केली होती. बालाजी हॉटेलच्या परिसरात जमलेल्या मराठी आंदोलकांना पोलिसांनी जबरदस्तींने वाहनांमध्ये कोंबून दुसरीकडे नेलं. यामध्ये मोठ्या प्रमाणावर महिला होत्या. आंदोलनादरम्यान काही महिलांनी एबीपी माझाशी बातचीत केली. यावेळी एक महिला आंदोलक म्हणाली, आमच्याच राज्यात अमराठी लोकांना आंदोलन करुन दिले जाते मग आमच्या मोर्चाला परवानगी का नाकारली? पोलीस मराठी आंदोलकांना पकडत होते तेव्हा रस्त्याच्या कडेला काही गुजराती आणि मारवाडी लोक उभे होते. ते पोलिसांना सांगत होते की, ‘यांना असंच पळवा, यांना एकत्र येऊन देऊ नका. आम्ही मीरा भाईंदरमध्ये यांचं काही चालू देणार नाही’. पोलीसही त्यांचं ऐकून घेत होते. आमच्याच राज्यात आम्हाला बोलायची परवानगी नाही का?
भाजपा आमदार सुरेश धस यांच्या मुलाच्या कारची दुचाकीला धडक, एक जण जागीच ठार
भारतीय जनता पार्टीचे आमदार सुरेश धस यांच्या मुलाच्या कारने एका दुचाकीला धडक दिली असून दुचाकीस्वार नितीन शेळके हे जागीच ठार झाले आहेत. सोमवारी (७ जुलै) रात्री ११ च्या सुमारास हा अपघात झाल्याचं पोलिसांनी सांगितलं. सागर धस हे आष्टी येथून पुण्याला जात असताना सुपा पोलीस ठाण्याच्या हद्दीत त्यांच्या कारने नितीन शेळके यांच्या दुचाकीला मागून धडक दिली.
रघुवीर घाटात सतत दरडी कोसळू लागल्याने महामार्ग बनला धोकादायक, रत्नागिरी व सातारा जिल्ह्यांचा संपर्क तुटण्याची भीती
“मराठी मोर्चावरून शिंदे-फडणवीसांमध्ये वाद?” मनसेचं सूचक वक्तव्य; म्हणाले, आंदोलन उग्र झाल्यामुळे…
लातूरमध्ये मदत निधीवरुन दोन आमदारांमध्ये श्रेयवादाची लढाई
…आणि मराठी अस्मितेसाठी मोर्चा निघाला, बालाजी हॉटेल ते मिरारोड स्थानकपर्यंत आंदोलकांचा मोर्चा पूर्ण
Mira-Bhayander Morcha: असंच आमच्या विरोधात जात जा… अविनाश जाधवांचा पोलिसांना खोचक सल्ला
मी सर्व पोलिसांचे मनापासून आभार मानतो की त्यांच्यामुळे ताकद एकत्र झाली. असेच आमच्या विरोधात जात जा, सरकारचं ऐकत जा आणि मराठी माणसाला एकत्र होऊ द्या – अविनाश जाधव, मनसे नेते
प्रताप सरनाईकांबाबत जे काही घडलं ते योग्य नाही. आज सकाळपासून ते मराठी माणसाबाबत बोलत होते. ते मराठी माणूस म्हणून मोर्चात येत होते. त्यामुळे जर एखादा मराठी माणूस आपल्यासोबत येत असेल तर त्याला आपण प्रेमाने आपल्यात घेतलं पाहिजे. आता मराठी माणसांनी एकत्र येणं गरजेचं आहे. आता आम्हाला आपापसांत वाद घालायचा नाहीये. जर इथल्या सगळ्या संघटना, सगळे पक्ष एकत्र आले, तर त्यांनाही इथे सामावून घ्यायला पाहिजे – अविनाश जाधव, मनसे नेते
यापुढे महाराष्ट्रात मराठी माणसाबाबत कुठेही असं काही घडलं, तर असेच मोर्चे निघतील याची सरकारने दखल घ्यावी. या मोर्चाच्या बाबतीत पोलीस प्रशासनावर गृह खात्याचा दबाव होता. मी सकाळी मला ताब्यात घ्यायला आलेल्या अधिकाऱ्यांना विचारलं की मी मराठीसाठी मोर्चा काढतोय. महाराष्ट्रात अधिवेशन चालू आहे. तुम्हाला याचा त्रास होणार नाही का? ते पोलीस म्हणाले की तुम्हाला इथून नेण्याच्या बाबतीत आमच्यावर खूप दबाव आहे. मी तेव्हा कुठल्या वादात पडलो नाही. मीरा भाईंदर हे महाराष्ट्रात आहे की राजस्थान किंवा गुजरातमध्ये आहे? ते महाराष्ट्रात असेल तर मराठी माणसाला त्याची बाजू मांडण्याचा अधिकार आहे – अविनाश जाधव, मनसे नेते
पुणे : भुयारी मार्गात दुचाकी कोसळून तरुण जखमी, डेक्कन जिमखाना भागात अपघात
Mira-Bhayander Morcha: मीरा रोडमधील मराठी एकीकरण समितीचं आंदोलन संपलं
मंगळवारी सकाळपासून मीरारोडमध्ये मराठी एकीकरण समितीच्या मोर्चामुळे वातावरण तापल्याचं पाहायला मिळालं. अखेर पोलिसांनी मोर्चाला परवानगी दिली. मीरारोड स्टेशन परिसरात दुपारी अडीचच्या सुमारास मोर्चाची सांगता झाली.
मंत्री प्रताप सरनाईकांवर आंदोलनकऱ्यांचा रोष, ‘तुम्ही परत जा’ च्या घोषणा
मुंबईहून सुटणारी एक्स्प्रेस धुळ्यात आता अर्धा तास आधी
रायगडमध्ये शिवसेनेपाठोपाठ भाजपची तटकरेंच्या विरोधात नाराजी
Mira-Bhayander Morcha: महाराष्ट्रात मराठी बोलावंच लागेल – संदीप देशपांडेंचं मोर्चास्थळी विधान
मराठी माणसावर बोट उचलायचा प्रयत्न केला, तर कानाखालीच बसणार. महाराष्ट्रात मराठी बोलावीच लागेल. मराठी माणसांच्या ताकदीपुढे सरकारला झुकावंच लागेल. आम्ही शांततेत मोर्चा काढण्याची परवानगी मागितली. पण पोलीस अडवणूक करत होते. पण अखेर हा मोर्चा निघाला – संदीप देशपांडे</p>
Mira-Bhayander Morcha: मनसेसह ठाकरे गटाचे नेतेही मीरारोड मोर्चाच्या ठिकाणी दाखल
संदीप देशपांडे, नितीन सरदेसाई, राजन विचारे, विनोद घोसाळकर मीरारोड मोर्चाच्या ठिकाणी दाखल झाले आहेत. त्यामुळे या मोर्चाला मनसेसह ठाकरे गटाचाही पाठिंबा असल्याचं यातून स्पष्ट होत आहे.
‘मुंबई एपीएमसी’ नवी मुंबईतूनही हद्दपार?
वाडा तालुक्यातील टायर कारखान्यांचा मुद्दा पावसाळी अधिवेशनात; प्रदूषणकारी कारखाने बंद करण्याची आमदारांची मागणी
डहाणूजवळ बिबट्याच्या हल्ल्यात वासराचा मृत्यू; मानवी वस्तीत बिबट्याचा वाढता वावर
मिरा भाईंदर शहरात तणाव, पोलिसांकडून कडेकोट बंदोबस्त; आंदोलनावर ड्रोनची नजर
मिरा भाईंदरमधील तणावामुळे व्यापाऱ्यांची दुकाने बंद
परभणी जिल्ह्यात भीज पाऊस, खरिपाला संजीवनी
Mira-Bhayander Morcha: सरकार घाबरलं आणि मोर्चाला परवानगी दिली – अभिजीत पानसे
प्रशासनाने, सरकारने हा मोर्चा येऊ नये यासाठी प्रयत्न केला. पोलिसी बळाचा वापर केला. दडपशाही केली. तरीही मराठी माणूस वाकला नाही हे पाहून ते झुकले. मोर्चाला परवानगी दिली गेली. एखादा आमदार मेहता आहे म्हणून काय फक्त मेहता लोकांचाच आहे की काय? सामान्य लोकांचा नाहीये का? एखादा व्यापारी उठून म्हणतो की महाराष्ट्रात हिंदीच बोलणार, त्याला आमच्या लोकांनी प्रसाद दिला. व्यापाऱ्यांच्या मोर्चाला पोलीस संरक्षण देऊन परवानगी दिली जाते. पण मराठी माणसाच्या मोर्चाला परवानगी नाकारली जाते? हा मराठी माणूस तुम्हाला घरी बसवल्याशिवाय राहणार नाही. ते घाबरले म्हणून मोर्चाला परवानगी दिली – अभिजीत पानसे, मनसे नेते
मिरा भाईंदर मध्ये मराठी भाषिकांचा मोर्चा, आंदोलकांची पोलिसांकडून धरपकड सुरू
पिंपरी : महापालिकेच्या विकास आराखड्यातील देवस्थानच्या जमिनींवरील आरक्षणे रद्द करणार, उद्योगमंत्री उदय सामंत यांची ग्वाही
उरण: मच्छीमारांची फसवणूक करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा, जिल्हा न्यायालयाने जामीन फेटाळले
“अमराठी लोकांची दादागिरी…”, शरद पोंक्षे स्पष्टच बोलले; म्हणाले, “मराठी लोकांना बाहेर हाकलणाऱ्या…”
महाराष्ट्र विधिमंडळ अधिवेशनादरम्यान विधानसभेत घडलेला प्रसंग (फोटो – महाराष्ट्र विधानसभा लाईव्ह स्क्रीनग्रॅब)
Latest Maharashtra News Live Today: महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या राजकीय घडामोडींचा आढावा