Maharashtra News Highlights: राज्यात आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला आहे. या अनुषंगाने सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी जोरदार मोर्चे बांधणी सुरू केली आहे. यातच फलटणमधील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणावरून आरोप-प्रत्यारोपाचं राजकारण सुरू आहे. दुसरीकडे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी बच्चू कडू यांनी आंदोलन सुरू केलं होतं. त्यानंतर अखेर राज्य सरकारने २०२६ मध्ये कर्जमाफी करण्याचं आश्वासन दिलं असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदार याद्यांमधील कथित गैरप्रकार आणि मतचोरीविरोधात महाविकास आघाडीचा निवडणूक आयोगाविरोधात १ नोव्हेंबरला मोर्चा होणार आहे. या मोर्चात पुन्हा एकदा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र दिसणार आहेत. याचबरोबर मुंबईमधील पवई या ठिकाणी एका फिल्म स्टुडिओमध्ये गुरुवारी दुपारी रोहित आर्य नावाच्या एका व्यक्तीने १७ मुलांसह दोघांना ओलीस ठेवल्याची धक्कादायक घटना घडली. मात्र, पोलिसांनी अवघ्या ३५ मिनिटांत १७ पीडितांची सुटका केली. या कारवाईत आरोपी रोहित आर्यचा मृत्यू झाला. दरम्यान, यासह राज्यातील राजकीय इतर सर्व घडामोडी आपण लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून जाणून घेऊयात.
Maharashtra Mumbai Weather Today Live Updates : राज्यातील राजकीय इतर सर्व घडामोडी आपण लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून जाणून घेऊयात.
“तुमची अवस्था काय आहे? कोणता झेंडा घेऊ हाती…”, संजय शिरसाट यांचं राज ठाकरेंना प्रत्युत्तर
“शिवसेना प्रमुखांच्या आजूबाजूला बडवे बसलेले आहेत, त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांना घेऊन ठेवलेलं आहे, म्हणून मी शिवसेना सोडली असं वाक्य राज ठाकरे यांचं होतं. मग आज तुम्ही पुन्हा त्यांच्याकडेच जात आहात. तुम्ही त्यांच्याकडे गेले त्याच्याशी आम्हाला काहीही देणंघेणं नाही. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले त्याचा आम्हाला आनंद आहे. मात्र, तुम्हाला माझा प्रश्न आहे की तुमची अवस्था काय आहे? कोणता झेंडा घेऊ हाती? ठाकरे गटाचा? राहुल गांधी यांच्या पक्षाचा की शरद पवारांच्या पक्षाचा? आता तुमच्या स्वत:च्या पक्षाचा झेंडा कधी कोणाच्या हातात जाईल सांगता येत नाही. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करणं टाळा”, असं संजय शिरसाट यांनी म्हटलं आहे.
मतचोरीच्या आरोपांमुळे राज्य निवडणूक आयोगाचा सावध पवित्रा, १५ ऑक्टोबर पर्यंतची अद्ययावत यादी देण्याची केंद्रीय आयोगाकडे मागणी
मतचोरी विरोधात शनिवारी मुंबईत मोर्चा, गर्दी जमविण्यासाठी शरद पवार गटाचे शशिकांत शिंदे यांची सूचना चर्चेत
Bacchu Kadu Farmers Protest Nagpur : “फडणवीसांच्या घोषणेनंतर नागपुरात बच्चू कडूंचा विजय उत्सव”
नियमभंग करणाऱ्यांना ‘आरटीओ’त जाण्याची गरज नाही… परिवहन विभागाचा निर्णय
“विसंगती टिपण्याची दृष्टी महत्त्वाची”, विनोदी लेखनाबाबत दिलीप प्रभावळकर यांचे मत
‘डिजिटल तिकीट’ काढण्यास टाळाटाळ… दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागणार
बोईसर मध्ये सराफा दुकानावर गोळीबार
‘या’ महामार्गावर चिखल, खड्डे, कोंडी कायम… टोल वसुली जोमात, हरित महामार्ग प्रकल्पाला विरोध
‘झोपु’तही आता ॲानलाईन इमारत मंजुरी! वास्तुरचनाकार, विकासकांना सादरीकरण
‘…तरच शेतकऱ्यांना प्राणवायू मिळेल’ – शेतकरी नेते विजय जावंधियांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
नागरिकांच्या विरोध, भूमिपूजन रद्द करण्याची नामुष्की, आमदार शुभेच्छा देवून निघून गेले
पुणे : उपनगरीय वाहतूक कोंडीतून सुटकेसाठी ९०० कोटी रुपयांचा खर्च….काय आहे प्लॅन?
राज ठाकरे यांच्या हत्येसाठी बसमधील प्रवासी ओलीस… कुर्ल्यात १७ वर्षांपूर्वी रंगलेले ओलीस नाट्य
डोंबिवलीत कुंभारखाणपाडा येथे इमारतीवरून पडून वृध्दाचा मृत्यू
Video : वसई भाईंदर रोरो म्हणजे… चक्क बॉलिवूडच्या अभिनेत्याने केले रोरो सेवेचे कौतुक
मुक्त विद्यापीठाचे कौशल्य विकास केंद्र, कुशल मनुष्यबळाचे विदर्भातील हब ठरणार
कल्याणमधील मोहने येथे रुग्णालयाच्या पायरीवर डोके आपटून रहिवाशाचा खून
पुणे : दुचाकी चोरट्याकडून रिव्हॉल्वरसह दहा काडतुसे जप्त
वकिलांवरील हल्ल्याच्या निषेधार्थ सोमवारी राज्यभरातील विधिज्ञ न्यायालयीन कामकाजापासून अलिप्त
शीव रुग्णालयात बोन मॅरो ट्रान्सप्लांट सुविधेचा विस्तार!
पंचवटी एक्स्प्रेसला रोजचा उशीर…नाशिक जिल्ह्यातील रेल्वे प्रवाशांचे म्हणणे काय ?
पत्राचाळीतील २३४३ घरांचा बांधकामाचा प्रस्ताव अखेर पर्यावरण मंजुरीसाठी सादर
Uday Samant : शेतकऱ्यांची कर्जमाफी नेमकी कशा पद्धतीने होणार? उदय सामंतांची महत्वाची माहिती; म्हणाले, “यादी तयार…”
बच्चू कडूंनी बाळासाहेब ठाकरेंना लिहिलेले पत्र चर्चेत..
देशातील पाच हजार धरणांचे मूल्यमापन प्रलंबित… जलशक्ती मंत्रालयाच्या सचिवांचीच कबुली
पुणे : वाहनांच्या सुट्ट्या भागांची सर्वाधिक वाहतूक… लॉजिस्टिक हब म्हणून ओळख
खानापूर किल्ल्याच्या अखेरच्या गणेश बुरुजाचे होणार जतन, नगरपंचायतीकडे देखभालीसाठी हस्तांतर
Video: वाशी येथील जुन्या आरटीओ ऑफिस जवळील स्विगी इन्स्टा मार्ट स्टोअरला आग
पनवेल महापालिकेत पुन्हा भरती प्रक्रिया
रोहित आर्यने ओलीस ठेवलेल्या १७ मुलांना काय सांगितलं होतं? मुलीने सांगितला सुटकेचा थरार! म्हणाली, “आधी आम्हाला…”, (फोटो-संग्रहित छायाचित्र)
