Mumbai Weather Forecast Today : राज्यात पावसाचे थैमान चालू असून मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्र आणि कोकणात काही ठिकाणी अतिवृष्टी झाली आहे. मुंबई, नवी मुंबई व पनवेल भागातही मुसळधार पावसाने मोठं नुकसान झालं आहे. पनवेलमधील जनजीव विस्कळीत झालं आहे. पावसाने मराठवाडा व मध्य महाराष्ट्रात पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. दरम्यान, पुढील दोन दिवस राज्यात सर्वदूर मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. दरम्यान, रविवारपासून कोसळणाऱ्या या पावसामुळे चार जणांचा बळी गेला असून, मराठवाड्याला सर्वाधिक फटका बसला आहे.
Maharashtra News Live Updates : राज्याच्या कानाकोपऱ्यातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एकाच क्लिकवर.
Mumbai Local Train: लोकलमध्ये अनधिकृत जाहिरातीबाजी सुरू; जाहिरातींच्या फलकांमुळे लोकलचे डबे विद्रुप
प्रत्येक विभागात कबुतरखाना सुरू करावा; मंगलप्रभात लोढा यांनी व्यक्त केली अपेक्षा
New MBBS Seats: वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी देशात ६८५० नवीन जागा; महाराष्ट्रात तीन नवीन महाविद्यालयांसह ६८० जागा वाढल्या
शहापूर : चार जणांकडून एकाची हत्या
गोंदिया ते इंदूर-बंगळुरू विमानसेवा सुरू, पहिल्याच दिवशी ४४ प्रवाशांनी घेतले उड्डाण
स्थानिक स्वराज संस्था निवडणुकीपूर्वी अतिवृष्टीची मदत, अजित पवार यांचे संकेत
४५० चौरस फुटांची घरे द्या…हाजी नुरानी इमारतीतील बाधितांची एमएमआरडीएकडे मागणी
नागपूर : हरवलेल्यांचा आधार बनली नागपूर महामेट्रो
राजापुरात तीन बिबट्यांचा दुचाकी स्वारावर हल्ला
Ajit Pawar: “तिकिट मागायला मला दिल्लीला जावे लागत नाही”, अजित पवार यांचा टोला नक्की कोणाला
मिरा भाईंदरकरांची क्लस्टर मधून सुटका? स्वतंत्र इमारती पुनर्विकासाला परवानगी
लोढांना कबुतरखाने सुरू करण्यासाठी नेमलेले नाही; राष्ट्रीय उद्यानातील कबुतरखान्याची कायदेशीर चौकशी करावी…
“घोडबंदरचा सेवा रस्ता विलीनीकरण काम तत्काळ थांबवा, नाहीतर ठाणेकरांच्या उद्रेकाला…”, राजन विचारेंचा मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे इशारा
शिवसेनेत (शिंदे) खदखद; विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या उमेदवाराला विभागप्रमुखपद
Avinash Jadhav : ठाण्यातील वाहतूक कोंडीच्या प्रश्नावर मनसेचा येत्या शनिवारी लाँग मार्च
Chit Fund Scam: चिटफ़ंड घोटाळा – ३६ जणांची १ कोटी ४८ लाख ५० हजार रुपयांची फसवणूक; सहा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल
मुंबई विद्यापीठाच्या उत्कृष्ट महाविद्यालय पुरस्कारांसह आदर्श शिक्षक, प्राचार्य पुरस्कारांचे वितरण
इस्रायलचे पाहूणे ठाण्यातील या शाळेच्या पडले प्रेमात; चर्चेतून दोन देशाच्या संस्कृतीची देवाणघेवाण
आक्सा समुद्री पदपथ बेकायदेशीर; दोन महिन्यांत समुद्री पदपथ हटविण्याचे राष्ट्रीय हरित लवादाचे आदेश
पटापट मद्य प्राशन करण्यावरून झाले भांडण; चाकूचा वार करून हत्येचा प्रयत्न; संशयित दोघांना अटक
सेंट झेविअर्स महाविद्यालयात स्मार्ट बाक; वायफायसह वायरलेस चार्जिंगची सोय
पालकमंत्री उदय सामंत यांचा अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद रत्नागिरी शाखेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा
बुलढाणा : जांभूळधाबा परिसरात १७५ मिमी पाऊस, ११ मंडळात अतिवृष्टी
डोंबिवली एमआयडीसी निवासी विभागात माकडाचा संचार
शासकीय भूखंडावरील तीन हजारपैकी फक्त ६८ संस्थांना आतापर्यंत मालकी हक्क! दर महाग असल्याची टीका
अहमदनगरचे झाले ‘अहिल्यानगर’ रेल्वेस्थानक; रेल्वे प्रशासनाची अधिकृत घोषणा
गावोगावात शाश्वत विकासासाठी ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान
श्वान दंश झालेल्या ६७ रुग्णांना उपचार करून घरी सोडले, वैद्यकीय प्रमुख डॉ. दीपा शुक्ल यांची माहिती
Mumbai Monorail: मोनोरेल अनिश्चित काळासाठी बंद… एमएमआरडीएची घोषणा
Heavy rains in Maharashtra : राज्यात पावसाचा कहर,चौघांचा बळी; मराठवाड्याला सर्वाधिक फटका (लोकसत्ता टिम)
राज्याच्या विविध भागांत गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. कमी दाबाच्या क्षेत्राने त्यात भर घातली आहे. त्यामुळे सध्या राज्यात पावसाला पोषक वातावरण निर्माण झाले आहे. त्याचा पहिला फटका मराठवाड्याला बसला. त्यापाठोपाठ सोलापूर, सांगलीसह मध्य महाराष्ट्रातील इतर जिल्ह्य़ांमध्येही अतिवृष्टी झाली. कोकणातही अनेक ठिकाणी मुसळधार पावसाची नोंद झाली आहे. ठाणे, नवी मुंबईतही जोरदार पाऊस झाला. पुणे शहर आणि परिसरातही रविवारपासून पावसाचा जोर वाढला आहे. सध्या मोसमी पावसाच्या परतीचा प्रवास सुरू आहे, मात्र राज्यात सध्या कमी दाबाच्या क्षेत्राचा परिणाम होत आहे.