अहमदनगर जिल्हा महाराष्ट्राच्या पश्चिम भागात आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा म्हणून अहमदनगर जिल्हा (Ahmednagar District)ओळखला जातो. अहमदनगर जिल्ह्याच्या उत्तरेस नाशिक व औरंगाबाद, पूर्वेस बीड, दक्षिणेस सोलापूर व उस्मानाबाद आणि पश्चिमेस पुणे व ठाणे हे जिल्हे आहेत. जिल्ह्याच्या पश्चिमेकडील भागात प्रामुख्याने अकोले व संगमनेर तालुक्यांमध्ये सह्याद्रीच्या डोंगररांगा पसरलेल्या आहेत ज्या हरीश्चंद्राच्या डोंगररांगा म्हणून ओळखल्या जातात. महाराष्ट्रातील सर्वांत उंच शिखर कळसूबाई याच डोंगररांगांमध्ये अकोले तालुक्यात आहे. गोदावरी, भीमा, सीना, मुळा व प्रवरा या अहमदनगर जिल्ह्यातील प्रमुख नद्या असून आढळा, घोड, कुकडी या नद्या जिल्ह्यातून वाहतात. या जिल्ह्याच्या नावावरूनच पूर्वीच्या काळात या भागावर असलेल्या निजामशाही व मोगल साम्राज्याचे वर्चस्व लक्षात येते.
महाराष्ट्रामध्ये (Maharashtra) पहिली मानवी वसाहत याच जिल्ह्यात प्रवरा व गोदावरी नद्यांच्या किनाऱ्यावर झाली, असा निष्कर्ष पुण्याच्या डेक्कन कॉलेजने नेवासातील उत्खननानंतर काढला आहे. भारतीय पुरातत्त्व विभागाने श्रीरामपूर (Srirampur) तालुक्यातील दायमाबाद येथे केलेल्या उत्खननातून या जिल्ह्यात सिंधु संस्कृतीचे अस्तित्व सिद्ध झालेले आहे.Read More
विविध राजकीय, धार्मिक नेत्यांचे दौरे वातावरण तापवू लागले आहेत. शहरातील मतदारांचे ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न या माध्यमातून पद्धतशीरपणे सुरू असल्याचे दिसत…
वसेनेच्या शिंदे गटातील नगरसेवकांच्या प्रभागात विकास कामांसाठी विशेष निधी उपलब्ध होऊ लागला आहे. राज्यातील सत्तेत वाटेकरी असलेल्या भाजप नगरसेवकांच्या वाटेला…
भाजप खासदार विखे यांच्याशी राजकीय मैत्रं जपणारे राष्ट्रवादीचे आमदार जगताप हे अलीकडच्या काळात रा. स्व. संघ परिवारातील हिंदूत्ववादी संघटनांच्या कार्यक्रमाला…
प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटीलचा एका कार्यक्रमादरम्यान कपडे बदलत असताचा व्हिडीओ व्हायरल झाला. त्यावर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांना…
थोरातांच्या राजीनाम्यावर राज्यभरातून अनेक राजकीय प्रतिक्रिया येत आहेत. अशातच प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर (देशमुख) यांनी बाळासाहेब थोरात यांच्यावर सूचक…
राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्ह्यात ६ आमदार आहेत. मात्र त्यापैकी कोणीही उपस्थित नव्हते. शिवसेना पुरस्कृत माजीमंत्री आ. शंकरराव गडाख हेही अनुपस्थितीत होते.
सत्यजित तांबे यांच्यावरच पक्षाने अन्याय केल्याची भूमिका घेत त्यांचा निषेध करण्यासाठी काँग्रेसचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळुंखे यांनी पदाचा राजीनामा दिला…
वनविभागाच्या कारवाईमुळे कळसुबाई शिखराच्या पायथ्याशी हातावर पोट असणाऱ्या आणि रोजगाराचा एकमेव पर्याय हाताशी असणाऱ्या स्थानिक आदिवासींवर उपासमारीची वेळ आली आहे.