Mumbai Breaking News Update : लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता काही दिवसांनी घोषित होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील राजकीय घडमोडींना वेग आला आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा महाराष्ट्रात दाखल झाली असून कालपासून त्यांच्या सभांचा झंझावात सुरू झाला आहे. राहुल गांधींच्या यात्रेमुळे काँग्रेस आणि मविआमधील पक्षांमध्ये नवचैतन्य निर्माण झालं आहे. १७ मार्च रोजी राहुल गांधी यांच्या उपस्थितीत दादरच्या छत्रपती शिवाजी पार्क मैदानावर मविआची सभा होणार आहे. त्याआधी मनसेकडून राहुल गांधींना इशारा देण्यात आला आहे. महाराष्ट्रात येऊन यावेळी स्वा. सावरकर यांच्याबद्दल बोलाल, तर महाराष्ट्रात फिरू देणार नाही, असा इशारा मनसेच्या वतीने देण्यात आला आहे.
भाजपाची दुसरी यादी जाहीर, महाराष्ट्रातून २० उमेदवारांची घोषणा
भाजपाने आज लोकसभा उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. यामध्ये महाराष्ट्रातील २० उमेदवारांचा समावेश असून नागपूरमधून अखेर नितीन गडकरी यांचे नाव जाहीर करण्यात आले आहे. तर बीडमधून पंकजा मुंडे यांचे नाव जाहीर केले आहे.
दुसऱ्या यादीत भाजपाने चार खासदारांचा पत्ता केला कट
उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातून गोपाळ शेट्टी यांच्याजागी पियूष गोयल यांना तर मुंबई उत्तर पूर्वमधून मनोज कोटक यांच्या जागी मिहिर कोटेचा यांना उमेदवारी देण्यात आली आहे. बीड लोकसभेतून प्रीतम मुंडे यांच्याजागी पंकजा मुंडे, तर जळगावमधून उन्मेष पाटील यांच्याजागी स्मिता वाघ यांना उमेदवारी दिली गेली आहे.
Maharashtra News Today 13 March 2024
मुंबई : विद्यार्थ्यांसह शिक्षकांमधील संशोधनवृत्तीला बळ देण्यासाठी भारतीय विद्यापीठ संघ (एआययु) आणि मुंबई विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने पहिल्यांदाच मुंबई विद्यापीठात आंतरराष्ट्रीय अन्वेषण संशोधन महोत्सवाचे ११ व १२ मार्च रोजी आयोजन करण्यात आले होते. आंतरराष्ट्रीय अन्वेषण संशोधन महोत्सवात मुंबई विद्यापीठाने संशोधनाच्या क्षेत्रात दर्जेदार कामगिरी करीत सर्वसाधारण सुवर्ण पदक प्राप्त करून स्पर्धेवर विजयी मोहर उमटविली. तसेच आरोग्य विज्ञान आणि सामाजिक शास्त्रे या गटात विद्यापीठाने प्रथम क्रमांक तर शेती गटात द्वितीय क्रमांक पटकावला.
जळगाव : जळगावसह यावल येथील तहसीलदारांच्या संयुक्तिक पथकाची एकाच दिवशी, एकाच वेळी शेळगाव बॅरेजजवळ अवैध गौण खनिज उत्खनन करून वाहतूक करणार्यांवर मोठी कारवाई करण्यात आली. पथकाला पाहून वाळूमाफिया अंधाराचा फायदा घेत पळून जाण्यात यशस्वी झाले. घटनास्थळावरून जेसीबीसह वाळूने भरलेले तीन डंपर यावलच्या तहसील कार्यालयात जमा करण्यात आले.
राज्यात शासनामार्फत राबविण्यात आलेल्या मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या अभियानाबात ठाणे जिल्ह्यातील काही शाळांनी नाराजी व्यक्त केली आहे.
भाजपाचे माजी नेते एकनाथ खडसे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आल्यापासून ते पुन्हा एकदा भाजपात जातील, असे दावे अनेकदा करण्यात आले आहेत. भाजपाचे मंत्री गिरीश महाजन हे याबद्दल नेहमीच वाच्यता करत असतात. त्यावर आता एकनाथ खडसे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. मला भाजपामध्ये जेव्हा जायचं असेल तेव्हा शरद पवार यांना सांगून जाईल, असं विधान खडसे यांनी केलं आहे.
पुणे : राज्यभरात उन्हाचा पारा वाढला असताना शहरातही उन्हाचा चटका वाढला आहे. शहराचे सरासरी तापमान ३७.३ अंश सेल्सिअसवर गेले असून, लवळे येथे सर्वाधिक ४०.१ अंश सेल्सिअसची नोंद झाली आहे.
पिंपरी : मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच पिंपरी-चिंचवड शहराच्या विविध भागांतील गृहनिर्माण संस्थांमधून अपुरा आणि कमी दाबाने पाणी पुरवठा होत असल्याच्या तक्रारींमध्ये वाढ झाली आहे.
पिंपरी : महापालिकेच्या वतीने मोशी कचरा भूमीतील बायोमायनिंग प्रकल्पाचा पहिला टप्पा पूर्णत्वास आला आहे. आठ लाख चौरस मीटर जुन्या कचऱ्याच्या बायोमायनिंगचे ७० टक्के काम पूर्ण झाले आहे. दुसऱ्या टप्प्यामध्ये अतिरिक्त १५ लाख चौरस मीटर कचऱ्याचे बायोमायनिंग केले जाणार आहे.
वसई: नालासोपारा नगर परिषदेचे माजी नगरसेवक श्याम पेंढारी यांचे बुधवारी सकाळी मुंबई अहमदाबाद महामार्गावर अपघाती निधन झाले. ते ५८ वर्षांचे होते. बहुजन विकास आघाडीचे कार्यकर्ते असलेले श्याम पेंढारी यांच्या पत्नी जया पेंढारी या देखील वसई विरार महापालिकेच्या माजी नगरसेविका आहेत.
बुलढाण्यात पार पडलेली जिल्हा गुंतवणूक परिषद फलदायी ठरली! या परिषदेत ४५ उद्योजकांसोबत १ हजार १५० कोटी रूपयांचे सामंजस्य करार करण्यात आले आहे.
जळगाव : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला रावेरची जागा मिळण्याचे संकेत असून, माझ्यासह चार जण इच्छुक आहेत. पहिला क्रमांक आपलाच असल्यामुळे भाजपचा उमेदवार कुणीही असला, तरी पूर्ण ताकदीनिशी आम्हीच रावेरची जागा जिंकू, असा दावा पक्षाचे ज्येष्ठ नेते आमदार एकनाथ खडसे यांनी केला.
मुंबई : म्हाडाच्या मुंबई मंडळाने मुंबईतील विविध ठिकाणच्या १७ भूखंडांचा ई लिलाव करण्याचा निर्णय घेतला आहे. शाळा, खेळाचे मैदान, रुग्णालय, मनोरंजन केंद्र अशा विविध वापरासाठी आरक्षित असलेल्या १७ भूखंडाच्या ई- लिलावासाठी बुधवारी निविदा प्रसिद्ध करण्यात येणार आहे. या भूखंडाच्या विक्रीतून मुंबई मंडळाला कोट्यवधी रुपये महसूल मिळण्याची अपेक्षा आहे.
माणसांना पाणी लवकर उपलब्ध होते, पण प्राण्यांना पानवठ्याचा शोध घेत तिथपर्यंत पोहचून मग आपली तहान भागवावी लागते.
भारताच्या दृष्टीला पुढे नेण्यासाठी १३ मार्च २०२४ रोजी गुजरात आणि आसाम राज्यांमध्ये तीन ठिकाणी सेमीकंडक्टर सुविधांची पायाभरणी करणार आहेत.
पोलिसांच्या पथकाने १४ किलो अफूची बोंडे जप्त केली. जप्त करण्यात आलेल्या अफूच्या बोडांची किंमत २८ हजार ७०० रुपये आहे.
राज्याला मिळालेल्या ५४० कोटी रुपयांच्या निधीतून राज्यातील चार विद्यापीठांना प्रत्येकी शंभर कोटी, तर सात विद्यापीठांना प्रत्येकी वीस कोटी रुपये मिळणार आहेत.
अलिबाग आणि आक्षी- साखर दरम्यान असलेल्या खाडीतून होणारी मोठ्या जहाजांची वाहतूक रोखा अशी मागणी अलिबाग मच्छीमार सोसायटीच्या वतीने मेरीटाईम बोर्डाकडे करण्यात आली आहे.
गडचिरोली : जिल्ह्यातील आदिवासी दुर्गम भागातील नागरिकांना आरोग्य सुविधा मिळावी यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेद्रांची निर्मिती करण्यात आली. परंतु या केंद्रांमध्ये वैद्यकीय अधिकाऱ्यांसह कर्मचारी सतत गैरहजर राहत असल्याने येथील आदिवासींना उपचारासाठी वणवण भटकावे लागते. असाच दुर्दैवी प्रसंग एटापल्ली तालुक्यातील जारावंडी गावातील चार वर्षीय अत्याचार पिडीत बालिकेच्या पालकांवर ओढवला. अखेर त्या चिमुकलीला उपचारासाठी नागपूरला न्यावे लागले.
नागपूर : इंस्टाग्रामवरील स्टॉक मॉर्केटमध्ये गुंतवणुकीतून झटपट पैसे कमविण्याच्या जाहिरातीला बळी पडलेल्या एका युवकाची केवळ एका महिन्यात २६ लाख ८५ हजार रुपयांनी फसवणूक केली. सायबर गुन्हेगारांच्या टोळीने त्या युवकाला व्यवस्थितपणे जाळ्यात अडकवून पैसे उकळले.
नाशिक : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, राजकीय नेत्यांच्या दौऱ्यामुळे प्रकाशझोतात आलेल्या पंचवटीतील श्री काळाराम मंदिरात काँग्रेसचे खासदार राहुल गांधी हे भारत जोडो यात्रेदरम्यान भेट देणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार ते त्र्यंबकेश्वर येथील मंदिरात भेट देऊन अभिषेक करणार आहेत. काँग्रेसला रामाचे काही वावडे नाही. यात्रेचा मार्ग वेगळा असल्याने गांधी हे काळाराम मंदिरात जाणार नसल्याचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे.
वसई : कचरा भूमीवर पडून असलेल्या १५ लाख मॅट्रिक टन कचऱ्यावर प्रक्रिया करण्यास पालिकेने सुरुवात केली आहे. तीन महिन्यात पालिकेने सुमारे ४० हजार मॅट्रिक टन इतक्या कचऱ्यावर प्रक्रिया केली आहे. वसई विरार शहरात दिवसेंदिवस निघणाऱ्या कचऱ्याचे प्रमाण वाढू लागले आहे.
नाशिक : नाशिक लोकसभा मतदार संघातून हेमंत गोडसे यांना तिसऱ्यांदा खासदार करायचे आहे. त्यासाठी सर्वांना एकत्रितपणे काम करावे लागेल, असे आवाहन करत शिवसेनेचे नेते खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी नाशिकची जागा शिवसेनेकडे आणि महायुतीचे उमेदवार विद्यमान खासदार गोडसे हेच राहणार असल्याचे एकप्रकारे जाहीर केले. महत्वाची बाब म्हणजे, महायुतीच्या जागा वाटपाची अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाही. तत्पुर्वीच शिवसेना शिंदे गटाने नाशिकच्या जागेवरील उमेदवार जाहीर केला आहे.
महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज लाइव्ह टुडे