Mumbai Maharashtra Breaking Update : राज्यात वैष्णवी हगवणे प्रकरणामुळे या प्ररकणातील आरोपींच्या जबाबाकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे. तर दुसरीकडे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चांना जोर आला आहे. शरद पवार आणि अजित पवार या दोघांची पुन्हा एकदा भेट झाली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांची पुण्यातल्या साखर संकुल या ठिकाणी भेट झाली. तसंच, २०१७ मध्ये एका अधिकाऱ्यावर मासे फेकून मारल्याचा आरोप मंत्री नितेश राणे यांच्यावर करण्यात आला होता. या आरोपातून त्यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. तर, आज सकाळपासून मुंबईसह विविध भागात पुन्हा एकदा पावसाळी वातावरण निर्माण झालंय. त्यामुळे आजही पावसाची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. यासह राज्यातील विविध घडामोडी जाणून घेऊयात.
Latest Maharashtra News Live Today : राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा
अपघातानंतरच्या मृत्यूंमध्ये २५ वर्षांत १५ टक्क्यांनी वाढ
जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकणाऱ्या पाल्याच्या कुटुंबाचा कर माफ; परभणी जिल्ह्यातील देऊळगाव ग्रामपंचायतचा अनोखा निर्णय
नुकसान भरपाई रक्कम मिळवण्यासाठी मंत्रालय स्तरावर पाठपुरावा करू; पालकमंत्री यांनी आढावा बैठकीत दिली ग्वाही
काका-पुतण्यांची बंद दाराआड चर्चा; राष्ट्रवादी पुन्हा एकत्र येणार? अजित पवार म्हणाले, “विचारधारा वेगवेगळी असली तरीही…”
माझ्या मुलाच्या साखरपुड्याला सर्व आले होते. विचारधारा वेगवेगळी असली तरीही कुटुंब म्हणून सुख दुखात आम्ही एकमेकांच्याबरोबर असतोच. आजची बैठक एआय संदर्भातील होती – अजित पवार</p>
अमली पदार्थ विरोधी मोहिमेत महिनाभरात २२ गुन्हे
नाशिक ग्रामीण पोलिसांनी राबवलेल्या अमली पदार्थ विरोधी मोहिमेतंर्गत मे महिन्यात २२ गुन्हे दाखल झाले असून २९ संशयितांना अटक करण्यात आली. या विशेष मोहिमेत आठ लाख ४९ हजार २७९ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ग्रामीण पोलिसांनी अमली पदार्थ विरोधात जिल्हा परिसरात ४० पोलीस ठाण्यातंर्गत विशेष मोहीम राबवली. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अमली पदार्थांची तस्करी, वाहतूक आणि विक्री करणारे तसेच अमली पदार्थाचे सेवन करणाऱ्यांवर कारवाई केली. नाशिक ग्रामीणमध्ये २२ गुन्हे दाखल असून २९ संशयित अटकेत आहेत. त्यांच्याकडून गांजा, कोडीन फॉस्फेट, भांग असे पदार्थ जप्त करण्यात आले. याशिवाय गांजा सेवन करणाऱ्या आठ जणांवरही कारवाई झाली. या कारवाईत आठ लाख ४९,२७९ किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
नाशिकमध्ये पुन्हा एक हत्या; दोन संशयित ताब्यात
मंत्री नितेश राणे यांनी घेतला आढावा
आज मंत्रालयात माननीय मुख्यमंत्री श्री.देवेंद्रजी फडणवीस यांच्या १५० दिवसांच्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने बंदरे विभागाचा आढावा घेतला.
— Nitesh Rane (@NiteshNRane) June 2, 2025
बंदरे विभागाने अधिक लोकाभिमूख होण्यासाठी नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करावा अशा सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
यावेळी परिवहन, बंदरे आणि हवाई… pic.twitter.com/JQJAVYbfzY
“निष्ठावंतांना पक्षात कवडीची किंमत नसते”; मनसे नेत्याची फेसबूक पोस्ट चर्चेत
मनसेचे कोकणातील नेते वैभव खेडेकर यांनी ही पोस्ट केली आहे. त्यांच्या या फोटमुळे आता चर्चेला उधाण आले आहे.
दुचाकीची घोड्याला धडक बसून अपघात; अपघातात दुचाकी स्वराचा मृत्यू, एक जखमी
मुख्यमंत्र्यांनी केली मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलची पाहणी
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्री साईबाबा हार्ट इन्स्टिट्यूट अँड रिसर्च सेंटरच्या मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलच्या उद्घाटन कार्यक्रमादरम्यान हॉस्पिटलची पाहणी केली.
https://twitter.com/CMOMaharashtra/status/1929477880972709967
हेरगिरी करणाऱ्या रविंद्र वर्माला ५ जूनपर्यंत कोठडी
युद्धनौका आणि पाणबुड्यांची पाकिस्तानला पुरवणाऱ्या रविंद्र वर्माला ५ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. आज त्याला दहशतवादी विरोधी पथकाने ठाणे कोर्टात हजर केलं होतं.
Maharashtra: Engineer Ravindra Verma who was arrested for allegedly spying and sharing details on warships and submarines with Pakistan, has been remanded to Police custody till 5th June.
— ANI (@ANI) June 2, 2025
He was presented before Thane Court by ATS today.
Vaishnavi Hagawane Case : “मोठ्या घरची राणी, मात्र बदनाम केलं हगवणे यांनी…”, ‘त्या’ फॉर्च्युनरची सर्वत्र चर्चा; VIDEO तुफान व्हायरल!
विविध प्रकल्पातील प्रकल्प बाधितासमवेत बैठक संपन्न
ठाकरे गट जमिनदोस्त होण्याच्या मार्गावर, गिरीश महाजनांचं वक्तव्य चर्चेत
उद्धव ठाकरे गट जमिनदोस्त होण्याच्या मार्गावर आहे. त्यांच्याकडे येत्या आठ दिवसांत कोण राहिल हे कळेल. संजय राऊतांच्या बडबडीमुळे आणि वागण्यामुळे सर्व परेशान आहेत. संजय राऊत आऊट ऑफ कंट्रल झाले आहेत. पण हा पक्ष संपवण्याकरता संजय राऊत पुरेसे आहेत – गिरीश महाजन
जळगावमध्ये भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात चार वर्षाच्या बालकाचा मृत्यू
राज्यात पावसाची सुट्टी – विदर्भाला “यलो अलर्ट”; शेतकऱ्यांना इशारा…
मधुकर पिचड यांच्यामुळे निळवंडे धरणाच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना पाणी
राहाता : शेततळ्यात बुडून दोघांचा मृत्यू
“हिंदी मुंबईची बोलीभाषा” विधानावर प्रताप सरनाईक यांचं स्पष्टीकरण; म्हणाले, “मीरा भाईंदरमध्ये…”
पूर्वीचे मावशीचे दिवस कमी झाले. ती जागा लाडक्या बहिणींने घेतली आहे. हिंदी लाडकी बहीण झाली आहे. ठाण्यात बहुतांश मराठी भाषिक आहेत, त्यामुळे मला मराठी बोलावं लागतं, पण मीरा भाईंदरमध्ये ८२ टक्के हिंदी भाषिक आहेत, त्यामुळे तिथे जाताना आपसुक हिंदी भाषा येते. पण शेवटी त्या वाक्यांत मराठी भाषा येतेच – प्रताप सरनाईक
ज्या प्रताप सरनाईकांनी पूर्ण ठाण्यात वि. वा शिरवाडकर, विंदा करंदीरकर, कुसुमाग्रज, प्रल्हाद केशव अत्रे, नामदेव ढसाळ, बाबा सरनाईक, पु. ल. देशपांडे यांची नावे रस्त्यांना आणि वास्तूंना दिली आहेत. तरीही हा प्रश्न प्रताप सरनाईकांना विचारला जातोय – प्रताप सरनाईक
सिरोंचा वनविभागाचा प्रताप; रस्ता ट्रॅक्टरने खोदला, सहपालकमंत्र्यांनी केली निलंबनाची शिफारस..
“मुख्यमंत्र्यांनी नाशिक दत्तक घेतलं होतं, पण नाशिकचा अनाथ आश्रम केला”, संजय राऊतांची टीका
Latest Maharashtra News Live Today : राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा