Maharashtra News Highlights 20 August 2025 : मुंबई-पुण्यासह राज्यात गेल्या काही दिवसांपासून होत असलेल्या अतिवृष्टीत आतापर्यंत २१ जणांचा मृत्यू झाला असून १० जण जखमी आहेत. सुमारे दीड हजार नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. इतकेच नाही तर पाऊसामुळे सुमारे १४ लाख एकर शेतीचे नुकसान झाले आहे.
अनेक ठिकाणी ढगफुटीसदृश पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. नदी-नाल्यांना आलेल्या पूरांमुळे विदर्भातील काही गावांचा संपर्क तुटला आहे. दरम्यान, मुंबई, ठाणे, पालघरमध्ये बुधवारी (२० ऑगस्ट) दिवसभर अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तर काल मुंबईत दिवसभर पडलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईकरांचे प्रचंड हाल झाले. अनेकजण कार्यालयात पोहोचल्यानंतर सुट्टी जाहीर केल्यामुळे नंतर साचलेल्या पाण्यातून घर गाठावे लागले. रस्ते तसेच रेल्वे वाहतूक ठप्प झाल्यामुळे अनेकजण रेल्वे स्थानकांवर अडकले होते. त्यामुळे स्थानकांवर प्रवाशांची गर्दी झाली होती.
Mumbai Breaking News Live Update : राज्यभरातील पावसासंबंधी अपडेट्स वाचा एका क्लिकवर…
२० लाख १२ हजार एकर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान
राज्यात गेल्या काही दिवसांत झालेल्या पावसामुळे २० लाख १२ हजार एकर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाल्याची माहिती, कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली आहे. त्यांनी पुढे सांगितले की, अतिवृष्टीमुळे राज्यातील १९ जिल्ह्यात २० लाख १२ हजार ७७५ एकर क्षेत्रावरील सोयाबीन, मका, कापूस, उडीद, तूर, मूग यासह अन्य पिकांचं नुकसान झाले आहे.
अतिवृष्टीमुळे शेतीचे नुकसान, शेतकऱ्यांना मदत कधी मिळणार? फडणवीस म्हणाले, “चार दिवसात अशा प्रकारे…”
“कालच हे जाहीर केलं आहे की पंचनामे करून सगळ्यांना मदत केली जाईल. १४ लाख एकरवरील पीके नष्ट झाली आहेत. दोन दिवसांपूर्वी पाऊस पडला, काल-परवा आणि काही मागच्या आठवड्यात पाऊस पडला… चार दिवसात अशा प्रकारे मदत देता येत नाही. त्याची एक पद्धत असते. एनडीआरएफमध्ये अशी मदत देण्याकरिता पहिल्यांदा पंचनामे करावे लागतात, त्यानंतरच मदत देता येते. पंचनाम्याचे आदेश दिले आहेत. ते पूर्ण झाल्यानंतर कमीत कमी वेळात ही मदत देता येईल. सरकारने कोणीही मागणी न करता ही घोषणा केली आहे,” असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
बंद पडलेल्या दोन मोनोरेल गाड्यांतून ११०० हून अधिक प्रवाशांची सुखरूप सुटका; एका गाडीचा दरवाजा तोडून अग्निशमन दलाने प्रवाशांना बाहेर काढले
१९५७, १९६० मध्ये कल्याण शहर महापुरामुळे झाले होते जलमय, कल्याण रेल्वे स्थानक परिसरात फिरत होत्या होड्या
उच्च न्यायालयाला आणखी १४ न्यायमूर्ती मिळणार ? सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायवृंदाची प्रस्तावाला मान्यता
“महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीत जे घडले, तो केवळ निवडणुकीतील गैरप्रकार नव्हता तर…”, जितेंद्र आव्हाड यांची प्रतिक्रिया
नवसपूर्तीसाठी त्याने केला दुथडी वाहणाऱ्या कृष्णेतून तब्बल किलोमीटरचा प्रवास
द म्युनिसिपल को-ऑप बँकेच्या निवडणुकीचे मतदान पुढे ढकलावे, ‘बीएमसी सहकार पॅनल’ची मागणी
जलमय रस्ता, मुसळधार पाऊस आणि शॉर्ट सर्किटमुळे तरुणाचा मृत्यू ; भांडूपमधील दुर्घटना
कल्याण : काळू नदीच्या पुरामुळे टिटवाळा जलमय
गोंदिया जिल्ह्यात ऑगस्ट महिन्यात झालेल्या पावसामुळे धरणांच्या पाणीसाठ्यात प्रचंड वाढ
गोंदिया जिल्ह्याला आज दिनांक 20 ऑगस्ट 2025 रोजी हवामान विभागाच्या वतीने येलो अलर्ट देण्यात आलेला आहे. गोंदिया जिल्ह्यात पाऊस येण्याचा अंदाज देखील हवामान विभागाने व्यक्त केला आहे. तर गोंदिया जिल्ह्यातील 4 महत्त्वाच्या धरणांपैकी इटियाडोह हा धरण ओव्हर फ्लो झाला आहे. तर गोंदिया जिल्ह्यातील इतर धरण देखील तुडुंब भरलेली असून त्यामुळे गोंदिया जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा सिंचनाच्या प्रश्न मिटलेला आहे. इटियाडोह धरण मध्ये 100% पाणीसाठा, शिरपूर धरण मध्ये 83% पाणीसाठा, कालीसराळ मध्ये 83% पाणीसाठा आणि पुजारीटोला धरणात 67 % पाणीसाठा आजच्या घडीला उपलब्ध आहेत. त्यामुळे गोंदिया जिल्ह्यातील पिण्याच्या पाण्यासह शेती सिंचनाचाही प्रश्न मिटला आहे.
मुंबई : विहार तलाव भरल्यामुळे मिठी नदीची पातळी वाढली, सांडवा वळवण्याचे काम पूर्ण होण्यास तीन वर्षे लागणार
मुंबई: पर्युषण पर्वात दोन दिवस कत्तलखाने बंद राहणार, महापालिकेची उच्च न्यायालयात माहिती
बदलापूर: उल्हास नदीची पाणीपातळी घटतेय, पण नदी इशारा पातळीवरच
अतिवृष्टी, पुराच्या नुकसानीचे पंचनामे तातडीने करावेत – मदत व पुनर्वसनमंत्री मकरंद पाटील
वसई लोहमार्ग पोलीस ठाण्याला पुराचा फटका; पोलीस ठाण्यात शिरले पाणी
Ulhas River News: उल्हास नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने डोंबिवली, कल्याणमधील रस्ते जलमय
भंडारदरा धरण भरले, प्रवरा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
पूरग्रस्त भागात स्थलांतर सुरू. औदुंबरच्या दत्तमंदिरात पाणी, सांगली, मिरजेतील स्मशानभूमी पाण्याखाली
राज्यात कुठल्या भागांना ‘रेड अलर्ट’; उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिली माहिती
सकाळी १० च्या पुढील माहितीनुसार, पाच जिल्हे, पालघर, मुंबई, ठाणे, पुणे आणि रायगड येथे हवामान विभागाकडून रेड अलर्ट दाखवण्यात आला आहे. नाशिक, पुणे, कोल्हापूर, सातारा येथील घाटमाथा या भागांना रेड अलर्ट सांगीतला आहे. काही भागातील धरणे १०० टक्के भरलेली असल्याने पाणी सोडावे लागले आहे. ते पाणी सोडल्याने पुणे आणि पिंपरी चिंचवड या शहरांमध्ये मुळा आणि पवणा या नद्याच्या बाजूला पाणी यायला लागलं, त्यामुळे काही लोकांना तेथून स्थलांतरित करण्यात आले आहे. याबाबत सरकार बारकाईने लक्ष ठेवून आहे, असे अजित पवार म्हणाले.
ठाणे : आपत्तीग्रस्तांसाठी सरस्वती शाळेत तात्पुरता निवारा, व्यवस्थापनेचा अनोखा निर्णय
उल्हास नदी काठची कल्याण डोंबिवली पालिकेची पाणी पुरवठा केंद्र जलमय
ठाणे जिल्ह्यात चोवीस तासांत झाला ‘इतका’ पाऊस !
VIDEO: ठाण्यात मुसळधार पाऊस सुरू, तरीही ३० टक्के पाणी कपात; ‘या’ कारणामुळे ठाणेकरांना करावा लागणार पाणी टंचाईचा सामना
माथेरानमध्ये चोवीस तासात ४३८ मिलीमीटर पावसाची नोंद
ओला दुष्काळ जाहीर करा… जळगावात ठाकरे गट शेतकऱ्यांसाठी आक्रमक
अबब… पुणे जिल्ह्यात एकाच ठिकाणी एका दिवसात तब्बल ५७५ मिलिमीटर पाऊस…
बदलापूरच्या ‘त्या’ उद्रेकाची वर्षपूर्ती, चिमुकल्यांवर अत्याचार झाल्यानंतर पेटले होते शहर
मुंबईसह महाराष्ट्रभरात गेल्या १२ तासात किती पाऊस झाला? हवामान विभागाने जारी केली आकडेवारी
राज्यात कालपासून वेगवेगळ्या ठिकाणी मुसळधार पाऊस पडत आहे. यादरम्यान राज्यातील वेगवेगळ्या ठिकाणी गेल्या १२ तासांत झालेल्या पावसाची आकडेवारी भारतीय हवमान विभागाने जारी केली आहे.
काल (१९ ऑगस्ट) सकाळी साडेआठ ते आज (२० ऑगस्ट) सकाळी ८ वाजेपर्यंत झालेल्या पावसाची आकडेवारी जारी करण्यात आली आहे.
माथेरान (रायगड) – ३८९.५ मिमी
महाबळेश्वर (सातारा) – २७८ मिमी
विक्रोळी (मुंबई उपनगर) – २२९ मिमी
आयआयजीएतक्यू न्यू पनवेल (रायगड) – २१७ मिमी
कर्जत (रायगज) – २११.५ मिमी
मुंबई विमानतळ (मुंबई उपनगर) – २०८ मिमी
भायखळा मुंबई (मुंबई शहर) – १९३ मिमी
मुंबई- सांताक्रूझ (मुंबई शहर) – १७६ मिमी
जुहू विमानतळ (मुंबई उपनगर) – १४९.५ मिमी
वांद्रा (मुंबई उपनगर) – १३७ मिमी
चिपळून (रत्नागिरी) १२३.५ मिमी
भांयदर (ठाणे) – १०० मिमी
#Rainfall (mm, >100mm) recorded over different parts of #Maharashtra between 0830 Hrs IST of 19th to 0800 Hrs IST of today, 20th August 2025#MumbaiRain #Mumbai #MumbaiRains #Rain #Rainfall @mybmc @ndmaindia @moesgoi@PIB_India @PIBEarthScience @DDNewslive@airnewsalerts pic.twitter.com/K2K4Zeivd4
— India Meteorological Department (@Indiametdept) August 20, 2025