Mumbai Maharashtra Breaking Update : मुंब्रा येथील रेल्वे दुर्घटनेनंतर मुंबईसह ठाणे-डोंबिवलीतील नागरिकांमधून रेल्वे प्रशासन व सरकारविरोधात संताप व्यक्त होत आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना देखील रेल्वे प्रशासनाविरोधात आक्रमक झाली असून आज मनसे ठाण्यातील गावदेवी मैदान ते ठाणे रेल्वे स्टेशन असा धडक मोर्चा काढणार आहे. मुंब्र्यातील घटनेनंतर उमटणारे पडसाद व राजकीय प्रतिक्रियांकडे आपलं लक्ष असेल. यासंबंधीच्या बातम्यांचा आढावा आपण या लाईव्ह न्यूज ब्लॉगद्वारे घेणार आहोत. तसेच इतर राजकीय घडामोडींकडेही आपण लक्ष ठेवणार आहोत. जसे की आज दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मेळावे होणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पत्रकार परिषद घेणार आहेत. यासह पंतप्रधान नरेंद्र मोदी विविध देशांच्या दौऱ्यांवर गेलेल्या खासदारांच्या शिष्टमंडळांची आज भेट घेणार आहेत याकडे आपलं लक्ष असेल.
Maharashtra Breaking News Live Today : राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या राजकीय बातम्या.
‘शालार्थ आयडी’ घोटाळ्याचा मुख्य आरोपी कोण?, अहवाल ‘लोकसत्ता’च्या हाती
ना श्रीमंतीचा बडेजाव ना इव्हेंट, हरिपाठाच्या गजरात पार पडले शुभमंगल
…तर प्रवेशोत्सव साजरा न करता शाळा बंद ठेवणार
“प्रदेशाध्यक्षपदाच्या जबाबदारीतून मुक्त करा”, जयंत पाटलांची शरद पवारांकडे मागणी
राष्ट्रवदी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदाच्या जबाबदारीतून मला मुक्त करा”, अशी मागणी जयंत पाटील यांनी शरद पवारांकडे केली आहे. पक्षाच्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित मेळाव्यात पाटील यांनी सर्व नेते, आमदार, खासदार व पदाधिकाऱ्यांसमोर हे वक्तव्य केलं आहे.
गडकरींनी फटकारल्यानंतर ओसीडब्ल्यूला जाग, नागपुरात आणले ‘पुशकॅम’, ‘रोबोकॅम’ तंत्रज्ञान
मुंब्रा रेल्वे दुर्घटने विरोधात ठाणे रेल्वे स्थानकात मनसेचा धडक मोर्चा
नीट पीजी परीक्षा ३ ऑगस्ट रोजी
सुपीक जमिनीवर पाणी अन् मोबदल्यासाठी ‘पाटबंधारे’च्या दारी! प्रकल्पबाधित शेतकऱ्यांना…
रेल्वे वाहतुक सुरु परंतु प्रवाशांचे हाल
महात्मा फुले जनआरोग्य योजनेत उपचार घेणाऱ्या रुग्णाकडे लाचेची मागणी; नाशिकमध्ये नामको रुग्णालयातील महिला डॉक्टरसह तीन जणींविरोधात गुन्हा
“रेल्वे स्थानकांवरील स्टॉल हटवा, अन्यथा…”, मनसेचा ठाण्यात धडक मोर्चा
“रेल्वे स्थानकांवरील स्टॉल हटवा, अन्यथा आम्ही सगळे स्टॉल उद्ध्वस्त करू असा इशारा मनसेने रेल्वे प्रशासनाला दिला आहे. मुंब्रा येथील रेल्वे दुर्घटनेनंतर मनसेने अविनाश जाधव यांच्या नेतृत्वाखाली ठाण्यातील गावदेवी मैदान ते ठाणे रेल्वे स्थानक असा धडक मोर्चा काढला. यावेळी त्यांनी रेल्वे प्रशासनाला रेल्वे स्थानकांवरील वर्तमानपत्र व खाद्यपदार्थांचे स्टॉल हटवण्याची मागणी केली आहे. तसेच गर्दी नियंत्रित करण्यासाठी उचित उपाययोजना राबवण्याची मागणी केली आहे.
शक्तिपीठ महामार्ग रेडी बंदराला जोडावा; फेरसर्वेक्षणाची माजी शिक्षणमंत्री आमदार दीपक केसरकर यांची मागणी
“आपली बाजू खरी असली तरी अन्याय…”, सुप्रिया सुळेंच्या व्हॉट्सअॅप स्टेटसचा अर्थ काय? स्वतः उत्तर देत म्हणाल्या…
मुंबई उपनगरीय रेल्वे अपघातातील मृत्यूदर ३८.०८ टक्के
धरणांमध्ये २५ टक्के जलसाठा
मनसेचा ठाण्यात धडक मोर्चा
मुंब्रा येथील रेल्वे दुर्घटनेविरोधात मनसे आक्रमक झाली असून पक्षाचे ठाण्यातील नेते अविनाश जाधव यांच्या नेतृत्त्वाखाली पक्षाने आज ठाण्यातील गावदेवी मैदान ते ठाणे रेल्वेस्टेशन असा धडक मोर्चा काढला आहे. या मोर्चावेळी मनसेने रेल्वे प्रशासनावरील संताप व्यक्त केला. तसेच मुंबईसाठी स्वतंत्र रेल्वे बोर्डाची स्थापना करण्याची मागणी केली आहे.
ठाणे रेल्वे स्थानक परिसरात पोलिसांचा फौजफाटा
राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यांकडे सर्वांचं लक्ष
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या दोन्ही गटांचे आज मेळावे आयोजित करण्यात आले आहेत. पुण्यातील बालगंधर्व नाट्यगृहात शरद पवार यांच्या गटाचा, तर बालेवाडी येथे अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. शरद पवारांचा गट अजित पवारांच्या राष्ट्रवादीत विलीन होणार असल्याची चर्चा सुरू असतानाच हे मेळावे पार पडत असल्यामुळे सर्वांचं या मेळाव्यांकडे लक्ष लागलं आहे. आज दोन्ही पक्ष त्यांचा २६ वा वर्धापन दिन साजरा करत आहेत.
नेरुळ रेल्वेस्थानकाजवळ सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्यामुळे वाशी ते पनवेल रेल्वेसेवा ठप्प आहे. या मार्गावरील अप आणि डाऊन दिशेने धावणाऱ्या गाड्या बंद आहेत. तसेच यामुळे हार्बर रेल्वेसह ट्रान्स हार्बर रेल्वे मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. या सगळ्यामुळे प्रवशांना मनःस्ताप सहन करावा लागत आहे.