Maharashtra Rain Updates : मुंबईसह राज्यात ठिकठिकाणी गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर कायम आहे. अनेक ठिकाणी ढगफुटीसदृश पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. नदी-नाल्यांना आलेल्या पूरांमुळे विदर्भातील काही गावांचा संपर्क तुटला आहे. दरम्यान, हवामान विभागाने मंगळवारी देखील (१९ ऑगस्ट) अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. मुंबईसह ठाणे, पालघर आणि रायगड या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे. दुसऱ्या बाजूला रात्रभर पावसाची रिपरिप चालू असून मुंबईकरांची लाईफलाइन म्हणून ओळखली जाणारी लोकल रेल्वेसेवा खोळंबली आहे.
IMD Weather Forecast Today LIVE News Updates : राज्यातील अनेक जिल्ह्यांना रेड आणि यलो अलर्ट देण्यात आला आहे.
अतिवृष्टीमुळे दुसऱ्या दिवशीही रुग्णालयांतील रुग्णसंख्येत घट; ६० ते ६५ टक्क्यांनी रुग्णांची संख्या कमी
मुसळधारांचा उच्च न्यायालयाच्या कामकाजाला फटका; अवघे दीड तासच कामकाज
गणेशभक्तांसाठी यंदा रेल्वेच्या ३६७ जादा फेऱ्या; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन
मुंबईच्या चेंबूर भक्ती पार्क दरम्यानची मोनोरेल बंद पडली, तब्बल एका तासानंतर प्रवाशांना बाहेर काढलं
Mumbai Monorail : मुंबईसह राज्यभरात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस कोसळत आहे. हवामान विभागाने मंगळवारी अतिमुसळधार पावसाचा इशारा दिलेला होता. मुंबईसह ठाणे, पालघर आणि रायगड या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस झाला आहे. या मुसळधार पावसाचा फटका मुंबईतील रेल्वेसह मोनोरेललाही बसला आहे. मुंबईमधील चेंबूर भक्ती पार्क मार्ग या दरम्यानची मोनोरेल अचानक मध्येच बंद पडल्याची माहिती समोर आली आहे.
राज्यात अनेक भागात पूरस्थिती; पुढील दोन दिवस मुसळधार, रायगड जिल्ह्याला अतिवृष्टीचा इशारा
तांत्रिक कारणाने मोनोरेल मध्येच ठप्प, अडकलेल्या प्रवाशांच्या सुटकेसाठी प्रयत्न सुरु…
पावसाचे पाणी उपसा करणारे ५०० हून अधिक पंप बसवूनही मुंबई जलमय
Maharashtra Heavy Rain Alert : राज्यात पावसामुळे पाच दिवसांत २१ जणांचा मृत्यू; कोल्हापुरात सततच्या पावसामुळे पूरसदृश्य परिस्थिती
राज्य सरकारच्या आकडेवारीनुसार, १५ ते १९ ऑगस्ट दरम्यान महाराष्ट्रात मुसळधार पावसामुळे २१ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच कोल्हापुरात सततच्या पावसामुळे पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांची मुंबई महानगरपालिकेतील आपत्कालीन कक्षास भेट
कल्याण डोंबिवलीतील अतिवृष्टीचा आयुक्तांकडून आपत्कालीन नियंत्रण केंद्रातून आढावा; दिवसभरात ७४ मिमी पावसाची नोंद
व्ही. एन देसाई रुग्णालयाच्या इमारतीच्या छतातून गळती; काही दिवसांपूर्वीच तिसऱ्या मजल्याचे करण्यात आले होते नूतनीकरण
राज्यमहोत्सव म्हणून साजरा होणाऱ्या गणेशोत्सवाच्या बोधचिन्हाचे अनावरण
मुंबईतील रेल्वे सेवा पुन्हा हळू हळू पूर्वपदावर
मुंबईसह राज्यभरात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस कोसळत आहे. हवामान विभागाने मंगळवारी देखील (१९ ऑगस्ट) अतिमुसळधार पावसाचा इशारा दिलेला होता. मुंबईसह ठाणे, पालघर आणि रायगड या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस झाला आहे. या मुसळधार पावसाचा फटका मुंबईतील रेल्वे सेवेलाही बसला. रेल्वे रुळावर पावसाचं पाणी साचल्यामुळे काही ठिकाणी लोकलची सेवा ठप्प झाली होती. मात्र, आता मुंबईतील रेल्वे सेवा पुन्हा हळू हळू पूर्वपदावर येत आहे.
रत्नागिरी-सिंधुदुर्गमधील कार्यकर्ते भाजपमध्ये
मुंबईला पावसाने झोडपले; वाहतूक कोंडी, सखलभाग पाणी, लोकल सेवा ठप्प, मुंबईकरांची त्रेधा
चार दिवसांत मुंबईतील रस्त्यांवर साचलेल्या दीड हजार कोटी लिटर पाण्याचा उपसा; पाच उदंचन केंद्रातील पंप ७६१ तास कार्यरत
“घराघरात पाणी, रस्त्यावर तलाव, नालेसफाईशिवाय…” दिवा जलमय होताच ठाकरे गटाच्या नेत्यांची संतप्त प्रतिक्रिया
रेल्वेचा बोगदा जलमय झाल्याने निळजे-पलावाचा संपर्क तुटला; बोगद्यात वाहन अडकले
मुंबईची दूध-भाजी कोंडी!
मुंबई, ठाण्यातील पावसाच्या परिस्थितीचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून आढावा
तीन दिवसांच्या पावसाने ऑगस्टची सरासरी ओलांडली
प्रतीक्षानगरमधील म्हाडाचे संक्रमण शिबिर पाण्याखाली; रहिवाशांचे तातडीने नव्या गाळ्यात स्थलांतर
रेल्वे रूळ पाण्याखाली
#WATCH मुंबई: माटुंगा रोड पर भारी बारिश के कारण जलभराव हुआ। रेलवे ट्रैक भी पानी में डूबा। pic.twitter.com/6HPu2qEt9b
— ANI_HindiNews (@AHindinews) August 19, 2025
सीएसएमटी-ठाणे लोकलसेवा पूर्णपणे बंद; हार्बर व पश्चिम मार्गावरील गाड्यांचा खोळंबा, रेल्वेस्थानकांवर प्रचंड गर्दी
सीएसएमटी-ठाणे मार्गावरील (मध्य) लोकलसेवा पूर्णपणे बंद झाली आहे. रेल्वे रुळांवर साचलेलं पाणी व सिग्नल यंत्रणेतील अडथळ्यांमुळे मध्य रेल्वे ठप्प आहे. तर हार्बर रेल्वे मार्गावरील अनेक लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. कासवगतीने लोकल सेवा चालू असली तरी रेल्वे स्थानकांवर प्रचंड गर्दी आहे. पश्चिम मार्गावरील गाड्यांचा देखील खोळंबा झाला आहे. वसई ते विरार लोकल सेवा बंद आहे. तर उर्वरित पश्चिम रेल्वे मार्गावर अर्धा ते पाऊण तास उशिराने रेल्वे गाड्या धावत आहेत.