Maharashtra Maratha Reservation Protest Live Updates: राज्यात सध्या सर्वत्र गणेशोत्सवाची धूमधाम सुरू आहे. मुंबई-पुण्यासारख्या शहरांमध्ये गणरायाच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी होत असल्याचे पाहायला मिळत आहे. दुसरीकडे राज्यातील अनेक भागांमध्ये वरुणराजाचीही उपस्थिती पाहायला मिळत आहे. काही भागांना पावसाने झोडपल्याचे चित्र आहे.
याचबरोबर मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील आज मुंबईतील आझाद मैदानावर उपोषण सुरू करणार आहेत. ते नुकतेच मुंबईत दाखल झाले आहेत. मुंबई पोलिसांनी त्यांना मर्यादित लोकांसह उपोषणाला परवानगी दिली आहे. असे असले तरी जरांगे पाटील यांच्याबरोबर मराठा समाजाचे लाखो लोक मुंबईत प्रवेश केला आहे. ऐन गणेशोत्सवाच्या कालावधीत एवढे लोक मुंबईत आल्याने त्यांचे व्यवस्थापन करण्यासाठी मुंबई पोलिसांची कसोटी लागणार आहे.
यासह राज्यातील विविध घडामोडींचा लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून आढावा घेऊया.
Mumbai Breaking News Update : राज्यासह देशभरातील राजकीय व सामाजिक घडामोडींचा आढावा एकाच क्लिकवर.
Manoj Jarange Mumbai Morcha Live: अजित पवार गटाचे आमदार विजयसिंह पंडित मनोज जरांगेंच्या भेटीला
मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईतील आझाद मैदानात उपोषण सुरू केले आहे. यानंतर विरोधी पक्षासह सत्ताधारी पक्षातील आमदार मनोज जरांगे पाटील यांची भेट घेत आहेत. बीडच्या गेवराईचे अजित पवार गटाचे आमदार विजयसिंह पंडित यांनी नुकतीच जरांगे यांची भेट घेतली आहे. तत्पूर्वी अजित पवार गटाचे आमदार प्रकाश सोळंके आणि शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी जरांगे यांची भेट घेतली होती.
“चंद्रावर जाता येते, पण शाळेत कसे जायचे ?” विद्यार्थी बसले उपोषणाला …
नोकरीचा शोध घेताय? तर तुमच्यासाठी विदेशात मोठी संधी! पाच हजार पदे, दीड लाखावर पगार; १२ उत्तीर्ण उमेदवारांनाही….
Manoj Jarange Mumbai Morcha Live: “महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातला मराठी माणूस… “, जरांगे पाटील यांच्या आंदोलनावर ठाकरे गटाची भूमिका
मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आंदोलनाच्या प्रतिक्रियेवर बोलताना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत म्हणाले की, “मुंबई ही महाराष्ट्राची आणि मराठी माणसाची राजधानी आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातला मराठी माणूस आपला न्याय मागण्यासाठी मुंबईत आलेला आहे. मुंबईची कायदा आणि सुव्यवस्था राखणं हे न्यायालयाचे काम नाही. जर कोणी हे न्यायालयाच्या हवाले देत असतील हे सरकारचं काम आहे हे राज्याच्या गृह खात्याचे काम आणि खास करून राज्याच्या मुख्यमंत्र्याचे काम आहे. अप्रत्यक्षपणे कोणीतरी जरांगे पाटलांच्या खांद्यावर बंदूक ठेवून राजकारण करत असेल तर आपण राज्याच्या मुख्यमंत्री आहात जनतेला विश्वासात घेऊन सांगा हे कोण आहे, तुमच्या सरकारमधीले आहेत की विरोधी पक्षातील आहेत.”
भूकरमापकाना एक लाखाचा लॅपटॉप खरेदीसाठी ९ कोटींच्या निधीला मान्यता
ओबीसी विद्यार्थ्यांना वसतिगृह प्रवेश; आधार योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर हे वाचा…
कुंभमेळा प्राधिकरणाव्यतिरिक्त समितीची गरज; आढावा बैठकीत संत, महंत, आखाडा प्रतिनिधी यांची नाराजी
Manoj Jarange Mumbai Morcha Live: आरक्षणावर सरकारने सकारात्मक निर्णय घ्यावा: प्रकाश सोळंके
मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी आझाद मैदानावर उपोषण सुरू केले आहे. यावेळी अजित पवार गटाचे आमदार प्रकाश सोळंके यांनी आझाद मैदानावर मनोज जरांगे यांची भेट घेतली. भेटीनंतर मराठा आरक्षणावर सरकारने सकारात्मक निर्णय घ्यावा असे आमदार सोळंके यांनी म्हटले आहे.
मुख्यमंत्र्यांच्या ‘लाडक्या’ आमदाराचीच गडचिरोलीच्या विकासावर वक्रदृष्टी ?… केवळ एका पत्रामुळे कोटयवधींच्या….
खडकवासल्यात भाजपबहुल समाविष्ट गावांनी ‘राष्ट्रवादी’ची कोंडी
‘शालार्थ’च्या कागदपत्रांसाठी मुदतवाढ… आता कधीपर्यंत सादर करावी लागणार?
Manoj Jarange Patil Azad Maidan: पूर्वमुक्त मार्ग आंदोलकांनी अडवला, हजारो कार्यकर्ते रस्त्यावर उतरले
Manoj Jarange Mumbai Morcha Live: विरोधी पक्षासह सत्ताधारी पक्षाचे आमदारही मनोज जरांगे यांच्या भेटीसाठी आझाद मैदानात
मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईतील आझाद मैदानावर उपोषण सुरू केले आहे. दरम्यान जरांगे पाटील यांनी उपोषण सुरू केल्यानंतर अजित पवार गटाचे आमदार प्रकाश सोळंके आणि शरद पवार गटाचे आमदर संदीप क्षीरसागर त्यांची भेट घेण्यासाठी आले आहेत.
Manoj Jarange Patil Mumbai Morcha Live: “सरकार दगाफटका करण्याचा डाव आखत असेल तर…”; मनोज जरांगेंच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर रोहित पवारांचा सरकारला इशारा
मनोज जरांगे पाटील यांच्या आझाद मैदानावरील उपोषणाच्या पार्श्वभूमीवर आमदार रोहित पवार यांनी सरकारवर गंभीर आरोप केले आहे. एक्सवरील पोस्टमध्ये रोहित पवार म्हणाले की, “आंदोलनस्थळी आंदोलकांना सुविधा उपलब्ध करून द्यायच्या असतात आणि हेच लोकशाहीचे खरे तत्व आहे, परंतु राज्य सरकार आंदोलकांची गैरसोय कशी होईल याचे नियोजन करत असेल तर ते हुकुमशाहीचे लक्षण म्हणावे लागेल.”
त्यांनी पुढे म्हटले की, “मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर खाऊगल्ल्या बंद ठेवण्याचे अलिखित फतवे गृहविभागाने काढल्याचे समोर येत आहे. खाऊगल्ल्यांना बंद ठेवण्यामागे गृहविभगाचा हेतू काय? मोठ्या प्रमाणात गर्दी होणार असेल तर उलट खाऊगल्ल्या सुरु ठेवायला हव्यात. गृहविभागाने आपले अलिखित फतवे मागे घेऊन तत्काळ खाऊगल्ल्या सुरु करण्यासंदर्भात सूचना कराव्यात. तसेच आंदोलकांची मोठ्या प्रमाणात असलेली संख्या बघता आझाद मैदानावर पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे यासारख्या कोणत्याच मुलभूत सुविधा सरकारने उपलब्ध करुन दिलेल्या नाहीत, त्या पुरेशा प्रमाणात उपलब्ध करून द्याव्यात.”
“या-ना त्या मार्गाने दगाफटका करण्याचा डाव सरकार आखत असेल तर सरकार मोठी चूक करत आहे, हे गृहमंत्र्यांनी विसरू नये. गृहमंत्री हुशार आहेत, सरकारकडून दुसऱ्यांदा चूक होऊ देणार नाहीत, ही अपेक्षा!”, असे रोहित पवार आपल्या पोस्टच्या शेवटी म्हणाले आहेत.
मनोज जरांगेंच्या आंदोलनापासून मंत्री, आमदार, खासदार दूरच
Manoj Jarange Patil Azad Maidan Live: मनोज जरांगे पाटील आझाद मैदानात दाखल; समर्थनार्थ लाखो मराठा आंदोलक मुंबईत
मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईतील आझाद मैदानावर उपोषण सुरू केले आहे. मनोज जरांगे यांना पाठिंबा दर्शविण्यासाठी राज्यभरातून लाखो मराठा आंदोलक मुंबईत दाखल झाले आहेत. यामुळे मुंबईत मोठी गर्दी झाली असून, याचा वाहतुकीवर परिणाम झाल्याचे पाहायला मिळत आहे.
दरम्यान, उपोषण सुरू करण्यापूर्वी जरांगे पाटील यांनी उपोषणास परवानगी दिल्याबद्दल कौतुक केले. पण जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाहीत, तोपर्यंत मुंबई सोडणार नसल्याचे जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले आहे. याचबरोबर जरांगे पाटील यांनी मुंबईत राज्यभरातून आलेल्या आंदोलकांना शांततेचे आवाहन करत, दगडफेक किंवा जाळपोळ करू नये, असे म्हटले आहे.
मनोज जरांगे पाटील आझाद मैदान परिसरात पोहोचले, मराठा आंदोलकांची तुफान गर्दी आणि घोषणाबाजी
मनोज जरांगे पाटील आज मराठा आंदोलनासाठी मुंबईत आझाद मैदानात उपोषण करणार आहेत. दरम्यान, जरांगे पाटील यांना पाठिंबा दर्शविण्यासाठी राज्यभरातून लाखो लोक मुंबईत दाखल झाले आहेत. यामुळे याचा मुंबईतील वाहतुकीवर परिणाम झाला आहे. त्यामुळे मुंबई पोलिसांनी मुंबईकरांना फ्री वे चा वापर टाळण्याचे आवाहन केले आहे.
मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा दर्शविण्यासाठी राज्यभरातून मराठा आंदोलक मुंबईत दाखल, सीएसएमटी स्टेशनबाहेरील परिसरात मोठ्या प्रमाणात गर्दीhttps://t.co/2jrmCKw8Ui #Maharashtra #Mumbai #ManojJarangePatil #MarathaReservation pic.twitter.com/1AEgFuXg6Y
— LoksattaLive (@LoksattaLive) August 29, 2025
Manoj Jarange Live Updates: अजित पवार गटाच्या आमदार सना मलिक यांच्याकडून मनोज जरांगे पाटील यांचे स्वागत
मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील आजपासून उपोषण करणार आहेत. यासाठी ते मुंबईत दाखल झाले आहेत. यावेळी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीतील आमदार सना मलिक यांनी जरांगे पाटील यांचे स्वागत केले आहे. त्या म्हणाल्या, “अतिथी देवो भवः ही माझी भूमिका आहे. ते माझ्या मतदारसंघात येत आहेत, त्यामुळे मी त्यांच्या स्वागतासाठी उपस्थित आहे.”
मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्यावे या मागणीसाठी मनोज जरांगे शुक्रवारी सकाळी मुंबईत पोहोचले आहे. आझाद मैदानावर होणाऱ्या त्यांच्या आंदोलनाच्या काही तास आधी मुंबईत प्रवेश करताच समर्थकांनी त्यांचे वाशी येथे स्वागत केले.
VIDEO | Maharashtra: Maratha quota agitation leader Manoj Jarange reached Mumbai Friday morning, hours ahead of his protest at Azad Maidan in the city.
— Press Trust of India (@PTI_News) August 29, 2025
Accompanied by hundreds of vehicles, Jarange, who began his march from his village in Jalna district on Wednesday, was welcomed… pic.twitter.com/zhPkIylHJN
मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील आज मुंबईतील आझाद मैदानात उपोषणास सुरुवात करणार आहेत. दरम्यान, जरांगे पाटील यांना पाठिंबा दर्शविण्यासाठी राज्यभरातून मराठा समाजाचे लाखो लोक मुंबईत दाखल झाले आहेत. यामुळे सीएसएमटी स्टेशनच्या बाहेर गर्दी झाल्याचे पाहायला मिळत आहे. यामुळे वाहतूकही विस्कळीत होत असल्याचे चित्र आहे.
मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील आज मुंबईतील आझाद मैदानात उपोषणास सुरुवात करणार आहेत. दरम्यान, जरांगे पाटील यांना पाठिंबा दर्शविण्यासाठी राज्यभरातून मराठा बांधव मुंबईत दाखल झाले आहेत. यामुळे सीएसएमटी स्टेशनच्या मोठी बाहेर गर्दी झाल्याचे पाहायला… pic.twitter.com/1WMHWDlZ8I
— LoksattaLive (@LoksattaLive) August 29, 2025
मनोज जरांगे मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्यावे या मागणीसाठी आजपासून मुंबईतील आझाद मैदानावर उपोषणाला बसणार आहेत. यावेळी त्यांच्याबरोबर राज्यातून लाखो मराठा बांधव मुंबईत दाखल झाले आहेत. दरम्यान जरांगे यांच्या या उपोषणाला विरोधी पक्षांसह सत्ताधारी आमदार-खासदारांनीही पाठिंबा दिल्याचे पाहायला मिळत आहे.
मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील आज मुंबईतील आझाद मैदानावर उपोषण सुरू करणार आहेत. ते नुकतेच मुंबईत दाखल झाले आहेत.