Maharashtra Political News राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा तापू लागलेला असतानाच ओबीसी समाजही आरक्षणाच्या बाबतीत आक्रमक झाल्याचं चित्र निर्माण झालं आहे. छगन भुजबळ आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. त्यात मनोज जरांगेंच्या सभांना मोठी गर्दी होत असल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्याचा पेच राज्य सरकारसमोर निर्माण झाल्याचं दिसत आहे.
Maharashtra News Live Updates: आरक्षणाचा मुद्दा तापला, राज्य सरकारसमोर मोठा पेच!
रात्री ८ वाजता घरी जाण्यासाठी ती रस्ता ओलांडण्यासाठी आर माॅल येथील पादचारी पूलावर आली. त्याचवेळी एक तरूण तिच्या मागून आला.
भंडारा : विविध शासकीय योजना जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठीचा ‘शासन आपल्या दारी’ हा उपक्रम आज भंडाऱ्यात होत आहे. त्यासाठी गावोगावच्या लोकांना आणण्यासाठी एसटी बस आरक्षित करण्यात आल्याने ग्रामीण व शहरी भागातील नेहमीच्या मार्गावरील फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. याचा सर्वाधिक फटका प्रवाशांना बसला आहे.
मुंबई : महारेरा नोंदणीकृत प्रकल्पांनी दर तीन महिन्यांनी प्रकल्पांबाबतची माहिती अद्ययावत करणे बंधनकारक आहे. या नियमाचे उल्लंघन करणाऱ्या प्रकल्पांविरोधात महारेराने कडक कारवाई सुरू केली आहे. त्यानुसार जानेवारीत नोंदणी झालेल्या प्रकल्पांविरोधात कारवाई सुरू असतानाच आता फेब्रुवारीत नोंदणी झालेल्या ७०० पैकी २४८ प्रकल्पांनी माहिती अद्ययावत न केल्याने त्यांची नोंदणी महारेराने स्थगित केली आहे.
मुंबई : आजपासून मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्यावतीने क्षयरोग आणि कुष्ठरोग शोध अभियान राबविण्यात येणार आहे. या मोहिमेत जनजागृतीसाठी घरोघरी आरोग्य तपासणी करुन क्षयरोग व कुष्ठरोगाच्या रुग्णांचा शोध घेतला जाणार आहे. ही मोहीम ६ डिसेंबरपर्यंत राबवली जाणार आहे.
पुणे: मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावर नवले पुलाजवळ तरुण मृतावस्थेत सापडला. तरुणाच्या डोक्यात दगड घालून खून करण्यात आल्याचे उघडकीस आले असून, खुनामागचे निश्चित कारण समजू शकले नाही.
अकोला येथील एका गुंडाने एका चौदा वर्षांच्या मुलीचे मुंडन करुन तिला सिगारेटचे चटके देत तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी खदान पोलीसांनी त्या नराधमास अटक करुन त्याच्यावर गुन्हे दाखल केले आहेत.एका गावगुंडाची मुलीची विटंबना करुन तिच्यावर अत्याचार करण्यापर्यंत मजल जाते हे अतिशय संतापजनक आहे.कायदा सुव्यवस्था राखण्यात गृहमंत्री सपशेल अपयशी ठरल्याचा हा परिणाम आहे. या गुंडावर फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवून त्याला कठोरात कठोर शिक्षा होणे गरजेचे आहे.शासनाने त्या दृष्टीने आवश्यक पावले उचलून त्या दृष्टीने उचित कार्यवाही करावी – वन लायनर
अकोला येथील एका गुंडाने एका चौदा वर्षांच्या मुलीचे मुंडन करुन तिला सिगारेटचे चटके देत तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी खदान पोलीसांनी त्या नराधमास अटक करुन त्याच्यावर गुन्हे दाखल केले आहेत.एका गावगुंडाची मुलीची विटंबना करुन तिच्यावर अत्याचार…
— Supriya Sule (@supriya_sule) November 20, 2023
समाजाची बाजू मांडताना कोणीही टोकाची भूमिका मांडू नये. गावा-गावात वाद झाले भांडण झाले तर कोण जबाबदार असेल? शाहू फुले आंबेडकरांचा आपला महाराष्ट्र आहे, मी आणि माझा पक्ष शाहू फुले आंबेडकरांच्या विचारांवर चालणारा आहे. मंत्री छगन भुजबळ यांनी सभेत ज्या पद्धतीने टोकाचे विधान केले त्याला माझे समर्थन नाही. सरकारकडून अनेकांना प्रमाणपत्र देऊन झाले आहेत. सत्तेत असताना समस्या सोडवल्या पाहिजे. सत्तेत असून ओबीसी समाजाच्या समस्या सोडवता येत नसतील तर त्यांनी सत्ता सोडली पाहिजे – विजय वडेट्टीवार
समाजाची बाजू मांडताना कोणीही टोकाची भूमिका मांडू नये. गावा-गावात वाद झाले भांडण झाले तर कोण जबाबदार असेल?
— Vijay Wadettiwar (@VijayWadettiwar) November 20, 2023
शाहू फुले आंबेडकरांचा आपला महाराष्ट्र आहे, मी आणि माझा पक्ष शाहू फुले आंबेडकरांच्या विचारांवर चालणारा आहे.
मंत्री छगन भुजबळ यांनी सभेत ज्या पद्धतीने टोकाचे विधान केले… pic.twitter.com/5WNHBobn50
जळगाव: सुरुवातीला शिक्षकांची ५० टक्के रिक्त पदे भरली जातील. आधार पडताळणीसंदर्भात असलेल्या अडचणी दूर झाल्यानंतर ८० टक्के रिक्त पदांची भरती करण्यात येईल, अशी ग्वाही शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी दिली.
पुणे: राज्यातील १४० तालुक्यांत दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. सुमारे २,०६८ महसूल मंडलात दुष्काळी परिस्थिती आहे.
गुरुवारी, २३ नोव्हेंबरपासून राज्यात आग्नेय दिशेने येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्याचा वेग वाढेल. या वाऱ्यांसोबत बाष्पयुक्त वारे राज्यात येतील.
लाचखोरीच्या ७५ गुन्ह्यांमध्ये लाच घेताना विविध सरकारी विभागातील अधिकाऱ्यांसह खासगी व्यक्तीदेखील एसीबीच्या जाळ्यात अडकल्या असून एकूण आरोपींची संख्या १०४ इतकी आहे.
अमरावती : शहरातील ‘मिलन मिठाई’ या प्रतिष्ठानाचे संचालक अशोक होशियारसिंह शर्मा (६२, रा. महेश नगर, बडनेरा रोड) यांनी स्वत:च्या छातीत बंदुकीने गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना रविवारी रात्री उशिरा उघडकीस आली. सविस्तर वाचा…
या प्रकरणी पोलिसांनी अदित्य दिपक रणावरे आणि सागर लक्ष्मण बनसोडे यांना अटक केली आहे.
प्रवासी गाड्या या इगतपुरी ते बडनेरापर्यंतचे ५२६ किलोमीटरचे अंतर प्रतितास १३० किलोमीटरच्या वेगाने धावत आहेत.
नागपूर : राज्यातील शासकीय अकृषी विद्यापीठांच्या प्र-कुलगुरूंच्या निवडीच्या पद्धतीवर आधीच आक्षेप असताना विद्यापीठाच्या महत्त्वाच्या संविधानिक पदावर असलेल्या प्र-कुलगुरू निवडीचे अधिकार कुलगुरू आणि व्यवस्थापन परिषदेच्या हाती देण्यात आल्याने यावर आक्षेप घेतला जात आहे.
मुंबई : वरळी पोलीस वसाहतीतील अभ्यासिकेत गफळास घेऊन २७ वर्षीय पोलीस शिपायाने रविवारी रात्री आत्महत्या केली. सविस्तर वाचा…
एका व्यक्तीमुळे राज्यात जातीय तणाव निर्माण झालेला आहे, असे म्हणत जरांगे यांनी छगन भुजबळ यांच्यावर निशाणा साधला.
गडचिरोली : एटापल्ली तालुक्यातील महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवरील तोडगट्टा येथे गेल्या २५० दिवसांपासून सुरू असलेल्या खाणविरोधी आंदोलनातील महत्त्वाच्या नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. आज सकाळच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. वां
यवतमाळ : सायबर भामट्यांनी व्हिडीओ लाईक्स केल्यास रिवार्डसह बोनस देण्याचे आमिष एका तरुणाला दाखविले. आमिषाच्या लालसेपोटी तरुणाने दहा लाख ९५ हजार रुपयांची गुंतवणूक केली. मात्र, भामट्यांनी त्याची फसवणूक केली. याप्रकरणी अवधूतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला.
नागपूर : जानेवारी २०२४ मध्ये नागपूर शहरात राष्ट्रीय पर्यावरण युवा संसदेचे आयोजन करण्यात आले असून १३० विद्यापीठांचे विद्यार्थी प्रतिनिधी यात सहभागी होणार आहेत.
वर्धा : रात्री मत्स्य साठा असलेल्या केजची पाहणी करण्यास गेलेले मत्स्य विभागाचे अधिकारी युवराज खेमचंद फिरके (रा.ठाणे, ह. मु. नागपूर) यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. त्यांच्या सोबत असलेले याच विभागाचे निरीक्षक सुनील भीमराव ठाकरे, नागपूर, विभागीय व्यवस्थापक बन्सी योगिराम गहाट (रा.औरंगाबाद ह.मू. नागपूर), मयंक विजयसिंह ठाकूर नागपूर, सहाय्यक मत्स्य विकास अधिकारी योगेश मोहनलाल कठाने रा. बल्लारशहा हे सुखरूप बचावले आहे.
कपिल देव यांना विश्वचषक अंतिम सामन्यासाठी आमंत्रित करण्यात आलं नव्हतं – संजय राऊत
India's legendary cricketer Kapil Dev was not invited to World Cup final match. The cricket icon has been insulted brazenly, India has been humiliated…What a big shame ? BCCI, ICC should explain to the world whether they did so under pressure from rulling party of india? They… pic.twitter.com/a3gxLSo89G
— Sanjay Raut (@rautsanjay61) November 20, 2023
राज्याचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा उल्लेख करत मोठं विधान केलं. “डॉ. आंबेडकरांनी मुस्लीम धर्म स्वीकारला असता, तर भारताचे दोन तुकडे झाले असते,” असं मत विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केलं. परभणी येथे रविवारी (१९ नोव्हेंबर) थायलंड येथील सहा फूट उंचीच्या ५० बुद्धरूप मूर्तींचे वितरण आणि वैश्विक धम्मदेशना कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यास वडेट्टीवार बोलत होते.
लोकांच्या भावनांमध्ये आपण सहभागी व्हायला हवं. भारतीय संघ उत्तम खेळला. त्यांच्यात जिंकण्याची जिद्द होती. भाजपाच्या दु:खात मी सहभागी आहे. भाजपा अशा थाटात होता की वर्ल्डकप तेच जिंकणार आहेत. तसं झालं असतं तर देशाला आनंदच झाला असता. पण ज्या प्रकारची व्यवस्था निकालानंतर करण्यात आली होती भाजपाकडून, त्यावर दुर्दैवानं पाणी पडलं. विश्वचषक जिंकायलाच हवा होता. पण खेळात हार-जीत होत असते – संजय राऊत
महाराष्ट्र न्यूज लाइव्ह
Maharashtra News Live Updates: मरोज जरांगेंच्या सभांना मराठा समाजाची मोठी गर्दी!