Mumbai Maharashtra Weather News Highlights: महाराष्ट्रात पुढील तीन दिवस मुसळधार पाऊस बरसेल, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे. ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सातारा व पुण्याला रेड अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. तर, सिंधुदुर्ग, आहिल्यानगर, कोल्हापूर, सोलापूर, सांगली, बीड, लातूर, धाराशिव या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. मुंबईत पुढील २४ तास मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असून सकाळपासून चालू असलेल्या रिमझिम पावसामुळे शहर व उपनगरातील अनेक रस्ते पाण्याखाली गेले आहेत.
दरम्यान, राज्यात दोन दिवस झालेल्या मुसळधार पावसामुळे ठिकठिकाणी रस्ते बंद आहेत. त्यामुळे या तीन दिवसांत होणाऱ्या परीक्षा स्थगित करण्यात याव्या, अशी मागणी आमदार व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली आहे. पावसाचा शेतकऱ्यांनाही मोठा फटका बसला आहे. या पावसामुळे राज्यातील ३५ हजार हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालं आहे. उन्हाळी कांदा, कडधान्ये मातीमोल झाली आहेत. पावसाचा प्रामुख्याने अमरावती, जालना, जळगाव, नाशिक, चंद्रपूर व आहिल्यानगरमधील शेतकऱ्यांना सर्वाधिक फटका बसला आहे.
Mumbai Maharashtra News Live Today : राज्यातील महत्त्वाच्या बातम्या व पावसाचे अपडेट्स एकाच क्लिकवर.
वीज पडून एकाचा मृत्यू; तीन जखमी
वाघाच्या हल्ल्यात दोन ठार; चंद्रपूर जिल्ह्यांत १७ दिवसात ११ जणांचा बळी
महिला आयोगाचा टोल फ्री नंबर बंद; मनसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र
राष्ट्रवादीचे ११ नगरसेवक भाजपामध्ये
कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघातील कर्जतच्या ११ नगरसेवकांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे. यामध्ये राष्ट्रवादी (शरद पवार) ८ नगरसेवक आणि काँग्रेसच्या ३ नगरसेवकांचा समावेश आहे.
विधानसभा निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज का देत नाही?; उच्च न्यायालयाचा निवडणूक आयोगाला सवाल
Mumbai Rain: “महानगरपालिकेची तिजोरी खाली केली, आता राज्य सरकारच्या…”, मुंबईत साचलेल्या पाण्यावरून आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
जिल्ह्यातून २३७ गुन्हेगार तडीपार
शिवाजी नगरात युवकाची हत्या
जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या तक्रारीसाठी नऊ भरारी पथके; कृषीनिविष्ठा तक्रार निवारणासाठी भरारी पथकांचे गठन
“उद्धव ठाकरेंच्या राशीत मदत शब्द आहे का?” मुंबईतील पुरावरून प्रश्न विचारणाऱ्या आदित्य ठाकरेंना नारायण राणेंचा प्रश्न
नारायण राणे म्हणाले, “मुंबईत दरवर्षी इतकाच पाऊस पडतो, पाणी साचतं आणि अर्ध्या-पाऊण तासांत ते पाणी समुद्राला जाऊन मिळतं. मात्र, मुंबई तुंबल्यावर सरकारला व जनतेला मदत करायची सोडून आदित्य ठाकरे टीका करत बसलेत. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदेंना नावाने हाक मारत आहेत. आदित्यला धड मराठी बोलता येत नाही, आम्ही त्याची नक्कल केली तर काय होईल? उद्धव ठाकरेंची नक्कल केलेली चालेल का? पुरात अडकलेल्या, बुडालेल्या किती लोकांना शिवसेना उबाठा पक्षाने मदत केली? मदत शब्द उद्धव ठाकरेंच्या राशीत आहे का?”
कल्याणमध्ये वसार, नांदिवली येथील ४० बेकायदा चाळी भरपावसात जमीनदोस्त
Maharashtra Monsoon Updates : मान्सूनचा प्रवास आजपासून रखडणार! इंग्लंडमधील हवामान तज्ज्ञांनी सांगितले कारण…
पदपथावरील अनधिकृत जाहिरात फलकांवर कारवाईच नाही; मनसेचा कारवाईचा इशारा
ऑपरेशन सिंदूरनंतर समाजमाध्यमावरून देशविरोधी संदेश, पुण्यातील विद्यार्थिनीला तुम्ही गुन्हेगार केले आहे, उच्च न्यायालयाकडून सरकार, महाविद्यालयाची कानउघाडणी
“मुंबईत ज्यांच्या घरांत, दुकानांत पाणी शिरलेलं त्यांना राज्य सरकारने नुकसानभरपाई द्यावी”, आदित्य ठाकरेंची मागणी
शिवसेना (ठाकरे) आमदार आदित्य ठाकरे म्हणाले, “मुंबईत काल (२६ मे) झालेल्या पावसामुळे ठिकठिकाणी पाणी साचलं होतं. अंधेरी, साकीनाका, दादरसह दक्षिण मुंबईत अनेक ठिकाणी पाणी साचलं होतं. मुंबई तुंबली होती. त्यामुळे मुंबईकरांचं मोठं नुकसान झालं आहे. त्यामुळे मी मुंबईकरांच्या वतीने राज्य सरकारकडे मागणी करतो की ज्या मुंबईकरांच्या घरांमध्ये, दुकानांमध्ये पाणी शिरलं होतं त्यांना नुकसान भरपाई द्यावी. मात्र, ही भरपाई राज्य सरकारच्या तिजोरीतून द्यावी. कारण मुंबई महापलिकेची तिजोरी आधीच या लोकांनी (भाजपा व शिंदेंची शिवसेने) लुटली आहे”.
संजय दत्त यांच्या चित्रीकरणाची तरुणांमध्ये चर्चा
Sanjay Shirsat : “आत्महत्येची धमकी देत लग्न केलं, शारीरिक-मानसिक त्रास दिला”; संजय शिरसाट यांच्या मुलावर महिलेचे गंभीर आरोप
करोना रुग्णांची संख्या वाढतेय, पण घाबरण्याचे कारण नाही; तज्ज्ञ डॉक्टरांचा नागरिकांना सल्ला…
एक कोटी खंडणीची मागणी अन्यथा हत्या ; लोरन्स विष्णोई ग्रुप कडून धमकी
VIDEO : “शशांकरावांचं नाव घेते…”, वैष्णवी हगवणेने लग्नात घेतलेला उखाणा व्हायरल
संजय शिरसाटांच्या मुलाकडून महिलेचा शारीरिक व मानसिक छळ? सुषमा अंधारे म्हणाल्या, “बापाच्या सत्तेमुळे उन्मत्तपणा…”
राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांचे पुत्र सिद्धांत शिरसाट यांच्यावर एका विवाहित महिलेने गंभीर आरोप केले आहेत. सिद्धांत यांनी त्यांची फसवणूक केली असून शारीरिक व मानसिक छळ केल्याचा आरोप या महिलेने केला आहे. यावरून आता विरोधक संजय व सिद्धांत शिरसाट यांच्याविरोधात आक्रमक झाले आहेत. शिवसेनेच्या (ठाकरे) उपनेत्या सुषमा अंधारे यांनी मंत्री शिरसाट यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. सुषमा अंधारी म्हणाल्या, बापाच्या सत्तेचा उन्मत्तपणे राज्यातील जनतेला माहिती आहेच. तोच उन्मत्तपणा मुलात आला असेल तर त्यांना रोखणं गरजेचं आहे. हे लोक गोरगरिबांच्या लेकीबाळींचा छळ करत असतील तर त्यांना त्याची किंमत मोजावी लागेल.
सीबीडीतील जनजीवन हळूहळू पूर्वपदावर ; पाणी निचरा झाल्यानंतर व्यापाऱ्यांची दुकानातील व दुकानाबाहेरील स्वच्छता सुरू
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली.
? #मुंबई |
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) May 27, 2025
केंद्रीय गृहमंत्री @AmitShah यांचे आज मुंबई दौऱ्यावर आगमन झाले. याप्रसंगी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले.#Mumbai #EknathShinde #Maharashtra #AmitShah pic.twitter.com/ZumAn0Ac8a
शहरबात : बंदी सुरू होण्यापूर्वीच मासेमारी हंगाम संपले
पहिल्याच पावसात महावितरणची तारांबळ; विक्रमगड व सफाळे ४० तास अंधारात
“आम्ही बाळासाहेब ठाकरे यांचे विचार मानणाऱ्यांच्या हातात शिवसेना दिली”, असं वक्तव्य केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केलं होतं. त्यावर शिवसेनेचे (ठाकरे) खासदार संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. राऊत म्हणाले, “बाळासाहेबांचे विचार काय होते, खरी शिवसेना कोणाची हे ठरवणारे अमित शाह कोण आहेत. ते तर देशावर लादलेले गृहमंत्री आहेत. त्यांनी आम्हाला काही सांगू नये. काल मुंबईत महापूर आला. ही जबाबदारी कोणाची आहे? ही नगरविकास मंत्री एकनाथ शिंदेंची जबाबदारी आहे. महापालिका कोणाच्या ताब्यात आहे? कालची स्थिती पाहून आनंद दिघे (दिवंगत शिवसेना नेते) काल अनेकांच्या स्वप्नात गेले आणि त्यांनी विचारलं एकनाथ कुठे आहे? मुंबई बुडाली, ठाणे शहर बुडालं आणि एकनाथ शिंदे कुठे आहे? एकनाथ शिंदे अमित शाहांचं लांगुलचालन करण्यात व्यस्त आहे. ते महाराष्ट्रद्रोह्यांचं लांगुलचालन करण्यात व्यस्त आहेत.”