Today’s Breaking News Highlights: राज्यात अनेक ठिकाणी दुष्काळ पडला आहे. कित्येक गावांमध्ये पिण्यासाठी पाणी नसल्यामुळे लोकांना पाण्यासाठी वणवण भटकावं लागतंय. अनेक नैसर्गिक संकटांमुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे. परिणामी राज्यातील शेतकरी आत्महत्यांचं प्रमाण वाढलं आहे. मात्र, राज्य सरकारकडून याबाबत कोणीही भाष्य केलेलं नाही. दुसऱ्या बाजूला, राज्याच्या राजकारणात सध्या केवळ मनसे अध्यक्ष राज ठाकरे व शिवसेना (ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची चर्चा आहे. हे दोन्ही भाऊ मराठीच्या मुद्द्यावर एकत्र येण्याची शक्यता आहे. दोन्ही नेत्यांनी यावर अनुकूल वक्तव्ये केली आहेत. याबाबत वेगवेगळ्या राजकीय प्रतिक्रिया येत आहेत. तसेच, राज्य सरकारने महाराष्ट्रातील मराठी माध्यमांच्या प्राथमिक शाळांमधील चिमुकल्या मुलांनी हिंदी भाषा शिकणं सक्तीचं केलं आहे. या निर्णयाला विरोध होत आहे. सर्व बातम्यांचा आढावा आपण या लाइव्ह न्यूज ब्लॉगद्वारे घेणार आहोत.
Mumbai-Pune News Live Today 22 April 2025 : राज्यातील महत्त्वाच्या बातम्या.
सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणी निघालेल्या परभणी ते मुंबई ‘लॉंग मार्च’ वरून आरोप- प्रत्यारोप
Maharashtra News LIVE Updates : ‘उशिरा का होईना पण शहाणपण आलं’, हिंदी भाषेची सक्ती मागे घेतल्यानंतर राज ठाकरेंची प्रतिक्रिया
इयत्ता पहिलीपासून तिसरी भाषा म्हणून हिंदी भाषा सक्तीचा निर्णय महाराष्ट्र सरकारने मागे घेतला आहे. या निर्णयानंतर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एक्सवर पोस्ट टाकून सरकारच्या निर्णयाचे स्वागत केले आहे.
महाराष्ट्र सरकारने इयत्ता पहिली पासून लादलेली हिंदी भाषेची सक्ती फक्त आणि फक्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पुढाकारामुळे आणि पाठपुराव्यामुळेच हटली ! यासाठी तमाम महाराष्ट्रसैनिकांचं आणि महाराष्ट्रातील जनतेचं मनापासून अभिनंदन…
— Raj Thackeray (@RajThackeray) April 22, 2025
सरकारने आधी विचार करून निर्णय घेतला असता तर आज माघार…
सांगलीतील चार माजी आमदारांचा आज राष्ट्रवादीत प्रवेश, भाजपचा विरोध डावलून पक्षप्रवेश
सांगली : जिल्ह्यातील चार माजी आमदार वानखेडे स्टेडियमवरील हॉलमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षात प्रवेश करणार आहेत. यामध्ये शिराळ्याचे शिवाजीराव नाईक, कवठेमहांकाळचे अजितराव घोरपडे, जतचे विलासराव जगताप आणि आटपाडीचे राजेंद्रअण्णा देशमुख यांचा समावेश आहे. या चार माजी आमदारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षात प्रवेशास जतचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी विरोध दर्शवला होता. तसे त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही सांगितले होते. मात्र, आ. पडळकर यांचा विरोध डावलून हा प्रवेश होत आहे.
याबाबत जतचे माजी आमदार जगताप यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खा. सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश होणार असून यावेळी इस्लामपूरचे माजी नगराध्यक्ष निशिकांत भोसले-पाटील हेही उपस्थित राहणार आहेत. चार माजी आमदारांसोबत जिल्हा परिषदेचे माजी सभापती तमणगोंडा रविपाटील यांचाही पक्षप्रवेश यावेळी होणार असून यावेळी पक्षविस्ताराबाबत चर्चा करण्यात येणार आहे.
खासदार विशाल पाटील यांनी भाजपमध्ये येण्यासाठी प्रयत्न, चंद्रकांत पाटील यांच्याकडून कबुली
सांगली : खासदार विशाल पाटील यांनी भाजपमध्ये यावे यासाठी आमचे प्रयत्न सुरूच राहतील, असे प्रतिपादन उच्च व तंत्र शिक्षण तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी माध्यम प्रतिनिधींशी बोलताना केले.
जिल्हाधिकारी कार्यालयात अमली पदार्थ विरोधी कृती समितीची साप्ताहिक आढावा बैठक पार पडल्यानंतर मंत्री पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, खा. पाटील हे अपक्ष खासदार असल्याने त्यांनी भाजपचे सहयोगी सदस्यत्व स्वीकारावे यासाठी आमचे प्रयत्न होते. त्यांचा भाजप प्रवेशाचा विषयच नव्हता. मात्र, त्यांना भाजप प्रवेशाची खुली ऑफर देण्यात आली. सध्या ते अपक्ष आहेत. अभ्यासू आणि हुशार आहेत. यामुळे त्यांनी भाजपमध्ये यावे यासाठी यापुढेही आमचे प्रयत्न सुरूच राहतील.
कुरुंदवाडमध्ये शेतकऱ्यांनी पाटबंधारे अधिकाऱ्यांना कोंडले, नदीची पाणीपातळी खालावल्याने पिके जळू लागली
कोल्हापूर : पंचगंगा नदीपात्रात पाण्याची पातळी कमी झाल्याने शेतातील पिके वाळू लागली आहेत. या पार्श्वभूमीवर संतप्त झालेल्या शिरढोण येथील शेतकऱ्यांनी कुरुंदवाड येथील पाटबंधारे विभागाच्या कार्यालयात धडक देत अधिकाऱ्यांना कोंडले. तणाव निर्माण झाल्याने कुरुंदवाड पोलिसांचा फौज फाटा दाखल झाला होता.
पंचगंगा नदीपात्रात गुरुवारपासून पाणी नसल्यामुळे नदीकाठच्या पिकांना फटका बसत आहे. पाटबंधारे विभागाने वेळेवर पाण्याचे योग्य नियोजन न केल्याने संतप्त शेतकरी कार्यालयात जमले. अधिकाऱ्यांना धारेवर धरत प्रश्नांची सरबत्ती केली. संतप्त शेतकऱ्यांनी काही काळ अधिकाऱ्यांना कोंडून धरले होते.
पाटबंधारे विभागाचे अभियंता शशांक शिंदे तातडीने कुरुंदवाड येथे दाखल झाले. त्यांनी त्वरित रुई व सुर्वे बंधाऱ्यातून जादा पाणी सोडण्याच्या सूचना दिल्या. २३ एप्रिलपर्यंत तेरवाड बंधाऱ्यात किमान ३० फूट पाण्याची पातळी राहील, असे लेखी आश्वासन दिल्यानंतर शेतकरी शांत झाले. शिरढोणचे सरपंच भास्कर कुंभार, दस्तगीर बाणदार, अरुण शिंगे, डॉ. संदीप नागणे, शाहीर बाणदार, अर्जुन बेबडे, अस्लम मुजावर यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.
कोल्हापूर : खराब रस्त्यामुळे धनगरवाड्यातील महिलेचा उपचाराअभावी मृत्यू, चौकशी करणार – पालकमंत्री
कोल्हापूर : करवीर तालुक्यातील एका धनगरवाड्यातील रुग्ण महिलेला खराब रस्त्यामुळे रुग्णालयात आणण्यास विलंब झाला. उपचाराभावी तिचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. यावर स्थानिक नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. तर पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी या प्रकरणाची चौकशी करणार असल्याचे सोमवारी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
कोल्हापूर शहरापासून २२ किमी अंतरावर भेंडोई धनगरवाडा आहे. दीडशे लोकसंख्या असलेल्या या धनगरवाड्याकडे जाणारे रस्ते आजही खराब स्थितीत आहेत. दळणवळणाची सुविधा नसल्याने पायपीट करतच त्यांना शहराकडे यावे लागते.
या गावातील दगडूबाई राजाराम देवणे (वय ५५) ही महिला शेतात काम करताना चक्कर येऊन पडली. तिला गावातील ग्रामस्थांनी खांद्यावरून कोल्हापुरात उपचारासाठी आणण्याचा प्रयत्न केला. दगडधोंड्यातून वाट काढताना त्यांना विलंब झाला. या महिलेला वेळेत उपचार मिळाले नसल्याने मृत्यू झाला. रस्त्याअभावी आणखी किती महिला, रुग्ण नागरिकांचा मृत्यू पहावा लागणार, असा संतप्त सवाल धनगरवाड्यातील लोकांनी उपस्थित केला.
या प्रकरणी बोलताना पालकमंत्री प्रकाश आबिटकर म्हणाले, माझ्या राधानगरी भुदरगड मतदारसंघातही धनगरवाड्यातील रस्त्यांची अवस्था बरी नाही. या सर्व धनगरवाड्यांकडे जाणारे रस्ते तातडीने दुरुस्त केले जातील. उपचाराअभावी एका महिलेचा मृत्यू होणे हे दुर्दैवी आहे. या प्रकरणाची चौकशी करून कारवाई केली जाईल.
परभणीचा पारा ४३ अंशावर, भोवळ आल्याने शेतमजुराचा मृत्यू
हुसेन दलवाई नाशिक पोलिसांच्या ताब्यात…वादग्रस्त धार्मिक स्थळास भेट देण्याचा आग्रह
कोकणात पहिली वारकरी शाळा उभी राहणार, विद्यार्थ्यांना आध्यात्मिक आणि संगीत शिक्षण देण्याचा उद्देश
अखेर मुंबई-अहमदाबाद मार्गांवरील सगनाई देवीचे मंदिर स्थलांतरित, पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त
नाट्यमय घडामोडीनंतर नगराध्यक्ष उषा राऊत यांचा राजीनामा, कर्जतच्या नगराध्यक्ष निवडीकडे लक्ष
काठेगल्लीतील हिंसाचार प्रकरण, प्रशासनाने उद्ध्वस्त केलेल्या दर्ग्याची पाहणी करायला माजी मंत्री व काँग्रेस नेते हुसैन दलवाई यांना पोलिसांनी ताब्यत घेतलं. दलवाई म्हणाले, मी तिथे दंगा करायला गेलो नव्हतो तरी पोलिसांनी मला तिथे जाऊ दिलं नाही. पोलीस दंगेखोरांना, वातावरण बिघडवणाऱ्या सत्ताधाऱ्यांना पाठीशी घालत आहेत अन् आम्हा सामान्यांना तिथे जाण्यापासून रोखत आहेत.
वीरपत्नी रेवा कुलकर्णी यांना बांगलादेशचे कृतज्ञतापत्र प्रदान
“उद्धव ठाकरे कमालीचे सकारात्मक”, संजय राऊतांकडून पुन्हा एकदा मनसेबरोबरच्या युतीचे संकेत
शिवसेनेचे (ठाकरे) खासदार संजय राऊत म्हणाले, राज ठाकरे हे सध्या मुंबईत नाहीत. ते कुठे आहेत त्याची माझ्याकडे माहिती नाही. मात्र, त्यांनी नक्कीच हात पुढे केला आहे आणि उद्धव ठाकरे यांनी त्यांना प्रतिसाद दिला आहे. राजकारणामुळे अशी नाती तुटत नाहीत. पण, मी एक गोष्ट नक्की सांगू शकतो की उद्धव ठाकरे हे कमालीचे सकारात्मक आहेत. आपल्याकडून महाराष्ट्राचं, मराठी माणसाचं नुकसान होऊ नये यासाठी त्यांची भूमिका सकारात्मक आहे.
उल्हास नदी प्रदूषण मुक्तीसाठी सर्वोतपरी प्रयत्न; आयुक्त अभिनव गोयल यांच्याकडून उल्हास नदी, नाले सफाईची पाहणी
माजलगावात आठवड्यातच दुसरा खून, मद्यपींच्या मारहाणीत ढाबामालकाचा मृत्यू
परभणी : तापमानाचा पारा वाढला, परभणी जिल्ह्यात जलसाठे आटू लागले
‘समृद्धी’ च्या मोबदल्यासाठी शेतकरी बैलगाड्यांसह रस्त्यावर उतरले, सेलू तालुक्यातील चिकलठाणा येथे रास्ता रोको आंदोलन
विकिरण तंत्रज्ञानाच्या आधारे महाराष्ट्रात १० टन कांद्याची ‘महाबँक’, ८३६ कोटींतून कोबाल्ट ६० च्या सुविधांसह पाच केंद्रांचा प्रस्ताव
पिंपरी : महापालिकेच्या नव्या संकेतस्थळाचे लोकार्पण; ‘एआय’…
प्रयागराजच्या धर्तीवर भीमा नदी आषाढी यात्रेत स्वच्छ ठेवणार; ‘एआय’ तंत्रज्ञानाचा वापर करणार : जयकुमार गोरे
विमानतळांवर ज्येष्ठ नागरिक, अंपगांसाठी सुविधा नसणे अयोग्य; उच्च न्यायालयाची टिप्पणी
पोप फ्रान्सिस यांना RSS कडून श्रद्धांजली; म्हणाले, “त्यांनी अनेक वर्षे…”
पोप फ्रान्सिस यांचं सोमवारी निधन झालं. त्यांनी त्यांचं संपूर्ण आयुष्य रोम येथील चर्चच्या सेवेसाठी वेचलं. फ्रान्सिस यांच्य निधनानंतर भारतासह जगभरातील अनेक देशांना दुखवटा जाहीर केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींसह जगभरातील असंख्य लोकांनी फ्रान्सिस यांना श्रद्धांजली वाहिली आहे. दरम्यान, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने देखील पोप फ्रान्सिस यांना द्धांजली वाहिली आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांच्या वतीने आरएसएसने एक्सवर एक पोस्ट केली आहे. यामध्ये म्हटलं आहे की “पोप फ्रान्सिस यांच्या निधनाचं वृत्त ऐकून दुःख झाले, आम्ही याबाबत शोकसंवेदना व्यक्त करतो. पोप फ्रान्सिस यांनी अनेक वर्षे कॅथलिकांचे प्रमुख म्हणून काम केले. त्यांच्या आत्म्यास शांती मिळो अशी प्रार्थना आम्ही देवाकडे करतो.
We express our deep condolences over the sad demise of Pope Francis. He served as head of the Catholics for long years. Let’s pray to God to give proper place to the departed soul.
— RSS (@RSSorg) April 22, 2025
Sunil Ambekar
Akhil Bharatiya Prachar Pramukh
Rashtriya Swayamsevak Sangh (RSS) pic.twitter.com/tQ4cNBB4tM
Adani Realty: नवी मुंबईत गुजरातपेक्षा दुप्पट मोठ्या टाउनशिपची अदाणींची योजना, विमानतळ सुरू होताच प्रकल्पाची होणार घोषणा!
संग्राम थोपटेंचा रवींद्र चव्हण व बावनकुळेंच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश
काँग्रेसचे नेते तथा भोर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार संग्राम थोपटे यांनी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी दिली असून त्यांनी आज भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश केला आहे. थोपटे यांनी दोन दिवसांपूर्वी काँग्रेसच्या प्राथमिक सभासदत्वाचा राजीनामा दिला. पाठोपाठ आज त्यांनी भाजपा नेते रवींद्र चव्हाण व महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला आहे.
LIVE |?मुंबई । जाहीर पक्षप्रवेश (22-04-2025)
— Chandrashekhar Bawankule (@cbawankule) April 22, 2025
https://t.co/V2fohZPOMD
माजी आमदार झिशान सिद्दीकी यांना धमकीचा ई-मेल
उद्धव व राज ठाकरेंमधील युतीचा निर्णय २९ एप्रिलनंतरच; मनसे नेते म्हणाले, “पक्षनेतृत्वाने आम्हाला…”
पुण्यात जैन समाजाचा आक्रोश मोर्चा, विलेपार्लेतील मंदिरावरील कारवाईविरोधात आक्रमक
विलेपार्ले पूर्व येथील कांबळीवाडी परिसरातील जैन मंदिरावर करण्यात आलेल्या कारवाईवरून मुंबई महापालिका राजकीय पक्षांच्या रडारवर आहे. तसेच जैन धर्मियांनी नुकताच मुंबईत एक मोठा मोर्चादेखील काढला होता. आता पुण्यातील जैन धर्मियांनी आक्रोश मोर्चा काढला आहे. जैन धर्मियांनी काही वेळापूर्वी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा नेला. शेकडो जैन धर्मीय लोक या आंदोलनात सहभागी झाले होते.