Mumbai Weather Forecast Today : राज्यात पावसाचे थैमान चालू असून मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्र आणि कोकणात काही ठिकाणी अतिवृष्टी झाली आहे. मुंबई, नवी मुंबई व पनवेल भागातही मुसळधार पावसाने मोठं नुकसान झालं आहे. पनवेलमधील जनजीव विस्कळीत झालं आहे. पावसाने मराठवाडा व मध्य महाराष्ट्रात पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. दरम्यान, पुढील दोन दिवस राज्यात सर्वदूर मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. दरम्यान, रविवारपासून कोसळणाऱ्या या पावसामुळे चार जणांचा बळी गेला असून, मराठवाड्याला सर्वाधिक फटका बसला आहे.

Live Updates

Maharashtra News Live Updates : राज्याच्या कानाकोपऱ्यातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एकाच क्लिकवर.

10:26 (IST) 16 Sep 2025

“राज्याची अवस्था नेपाळसारखी, तीन महिन्यांत २४ हजार कोटींचं कर्ज घेतलं”; संजय राऊतांचा दावा

शिवसेनेचे (उबाठा) खासदार संजय राऊत म्हणाले, “जे राज्य सरकार अवघ्या तीन महिन्यात राज्य चालवण्यासाठी २४ हजार कोटी रुपयांचं कर्ज घेतं त्या राज्याची अवस्था नेपाळसारखीच झालीय असं म्हणावं लागेल. नेपाळ आणि आपल्या अवस्थेत काहीच फरक नाही. राज्यात प्रचंड बेरोजगारी आहे. विकासकामं ठप्प आहेत. मुख्यमंत्र्यांच्या जवळच्या लोकांना एसआरएची कामं मिळत आहेत. तसेच कबुतरांना दाणे टाकले जात आहेत. याव्यतिरिक्ता इतर कुठलीही कामं चालू नाहीत. आरक्षणाच्या मुद्द्यावर प्रत्येक जात रस्त्यावर आणली जात आहे. जातीजातीत संघर्ष सुरू केला आहे.”

संजय राऊत म्हणाले, “माझं मुख्यमंत्री फडणवीस यांना आव्हान आहे की त्यांनी प्रसारमाध्यमांसमोर यावं आणि शिक्षण, रोजगार क्षेत्रात राज्याने काय प्रगती केली ते सांगावं. राज्यात मोठी लूट चालू आहे. राज्यावर दहा लाख कोटी रुपयांचा डोंगर उभा आहे. अशा स्थितीत आर्थिक शिस्तीच्या गोष्टी करणारे अजित पवार या सगळ्यावर काय बोलतात याकडे लोकांचं लक्ष आहे. स्वतःच्या लोकांना महाराष्ट्र लुटू द्यायचा असं धोरण अजित पवार यांनी अवलंबलं आहे का ते सांगावं.”

10:14 (IST) 16 Sep 2025

सकाळपासून रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पावसाचं प्रमाणं

रत्नागिरी जिल्हा

मंडणगड-0 मिमी

दापोली-१९ मिमी

खेड-20 मिमी

गुहागर-16 मिमी

चिपळूण-11 मिमी

संगमेश्वर- 0 मिमी

लांजा-9 मिमी

राजापूर-31 मिमी

वाकवली-25.6 मिमी

सिंधुदुर्ग जिल्हा

दूधमार्ग-30 मिमी

मालवण-6 मिमी

कुडाळ-63 मिमी

कणकवली-३९ मिमी

वैभववाडी-14 मिमी

मुळदे-57.6 मिमी

रामेश्वर-64.4 मिमी

सावंतवाडी-4 मिमी

देवगड-41 मिमी

10:12 (IST) 16 Sep 2025

तपशीलवार जिल्हानिहाय हवामान अंदाज

10:07 (IST) 16 Sep 2025

नवरात्रोत्सव २०२५ : पालघर एसटी आगाराची भाविकांना देवी दर्शनाची अनोखी भेट

एसटी महामंडळाने प्रथमच पालघरमधून थेट देवीच्या दर्शनासाठी विशेष बस सेवा सुरू केली आहे. …सविस्तर वाचा
09:49 (IST) 16 Sep 2025

संजय गांधी राष्ट्रीय उद्यान व तुंगारेश्वर अभयारण्यातली १.१९ हेक्टर वनजमीन अदानीला

विद्युत वितरण जाळे उभे करण्यासाठी अदानी कंपनीलाच का आणि वन जमीनच का असे प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. …अधिक वाचा
09:42 (IST) 16 Sep 2025

महात्मा फुले जनआरोग्य योजनेची व्याप्ती वाढवली; हृदय, फुफ्फुस, किडनी प्रत्यारोपणासाठी स्वतंत्र निधी उभारणार

हृदय, फुफ्फुस, किडनी प्रत्यारोपणासारख्या पाच लाखापेक्षा जास्त रक्कमेच्या अवयव प्रत्यारोपणाच्या उपचारांसाठी स्वतंत्र निधी उभारण्याचा निर्णय सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला. …अधिक वाचा
09:26 (IST) 16 Sep 2025

बीडमधील सर्व शाळा व महाविद्यालयांना सुट्टी

बीडचे जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन म्हणाले, “बीडमधील आष्टी तालुक्यातील नदीला पूर आला असून सहा गावांना फटका बसला आहे. जिल्ह्यात मागी काही तासांपासून ४० मिमी पावसाची नोंद झाली आहे. पावसाचा अनेक तालुके व गावांना फटका बसला असून आज (१६ सप्टेंबर) सर्व शाळांना व महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे.”

09:19 (IST) 16 Sep 2025

१३ जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी

राज्याच्या १३ जिल्ह्यांतील १६६ मंडळात सोमवारी (१५ सप्टेंबर) अतिवृष्टी झाली. रायगड, पुणे, सातारा, सोलापूर, बीड जिल्हयांत अनेक ठिकाणी अतिवृष्टीची नोंद झाली. तर, खडकवासल्याबरोबरच इतर काही धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला आहे. रायगडमधील अलिबाग, चरी, चौल, नागाव, पनवेल तालुक्यातील पोयंजे, खालापूरमधील चौक, वसांबे, पेण तालुक्यामधील वाशी, महाड तालुक्यातील महाड, बिरवाडी, कारंजवाडी, नाटे, खारवली, तुडील, मांघरुण, माणगाव तालुक्यातील माणगाव, इंदापूर, गोरेगाव, लोणेरे, निझामपूर या मंडळात अतिवृष्टी झाली असून जनजीव विस्कळीत झालं आहे. याचबरोबर सोलापूर, बीड जिल्ह्यांतील काही भागात अतिवृष्टीची नोंद झाली.

09:19 (IST) 16 Sep 2025

Thane illegal constructions : ठाण्यात अनधिकृत बांधकामांवर कारवाई; पालिकेने मागितला SRPFचा बंदोबस्त

या कारवाईत अडथळा आणल्याप्रकरणी पालिकेने दिलेल्या तक्रारीच्या आधारे डायघर पोलिसांनी २४ जणांच्या विरोधात गुन्हे दाखल केले आहेत, अशी माहिती महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने दिली. …सविस्तर वाचा
09:09 (IST) 16 Sep 2025

हडपसर-दिवेघाट मार्गावर ब्लास्टिंग….चार तास वाहतूक बंद

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (एनएचएआय) पालखी सोहळ्यासाठी महत्त्वाचा असलेल्या हडपसर ते दिवेघाटाच्या रुंदीकरणाचे काम हाती घेतले आहे. …वाचा सविस्तर
09:09 (IST) 16 Sep 2025

हडपसर-दिवेघाट मार्गावर ब्लास्टिंग….चार तास वाहतूक बंद

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (एनएचएआय) पालखी सोहळ्यासाठी महत्त्वाचा असलेल्या हडपसर ते दिवेघाटाच्या रुंदीकरणाचे काम हाती घेतले आहे. …वाचा सविस्तर
08:48 (IST) 16 Sep 2025

मंत्री सरनाईक संतापले….दोन अधिकाऱ्यांची तत्काळ बदली अन् समाज माध्यमांसमोर अधिकारी धारेवर

विभाग नियंत्रकांना ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावण्याचे आणि स्वारगेट स्थानकातील वरिष्ठ-कनिष्ठ आगार व्यवस्थापकांची सायंकाळपर्यंत बदली करण्याचे आदेश त्यांनी दिले. …अधिक वाचा
08:44 (IST) 16 Sep 2025

पाऊस आणखी किती दिवस ठाण मांडणार?

हवामान विभागाने राज्यातील सिंधुदुर्ग, सातारा, कोल्हापूर, गडचिरोली आणि चंद्रपूर वगळता इतर सर्व जिल्ह्यांना यलो व ऑरेंज यलर्ट दिला आहे. पुढील दोन दिवस पाऊस राज्यात ठाण मांडून बसणार आहे. पनवेल, नवी मुंबई व मुंबईत आजही मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

08:43 (IST) 16 Sep 2025

रायगड, पुणे व छ. संभाजीनगर जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

हवामान विभागाने रायगड, पुणे व छत्रपती संभाजीनगर या तीन जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिला आहे.

08:43 (IST) 16 Sep 2025

अनेक जिल्ह्यांना यलो अलर्ट

हवामान विभागाने जालना, धुळे, जळगाव, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव, अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, गोंदिया, परभणी, नागपूर, वर्धा, पालघर, रत्नागिरी, सांगली, सोलापूर, आहिल्यादेवी होळकर नगर, लातूर, यवतमाळ या जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट दिला आहे.

Heavy rains in Maharashtra : राज्यात पावसाचा कहर,चौघांचा बळी; मराठवाड्याला सर्वाधिक फटका (लोकसत्ता टिम)

राज्याच्या विविध भागांत गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. कमी दाबाच्या क्षेत्राने त्यात भर घातली आहे. त्यामुळे सध्या राज्यात पावसाला पोषक वातावरण निर्माण झाले आहे. त्याचा पहिला फटका मराठवाड्याला बसला. त्यापाठोपाठ सोलापूर, सांगलीसह मध्य महाराष्ट्रातील इतर जिल्ह्य़ांमध्येही अतिवृष्टी झाली. कोकणातही अनेक ठिकाणी मुसळधार पावसाची नोंद झाली आहे. ठाणे, नवी मुंबईतही जोरदार पाऊस झाला. पुणे शहर आणि परिसरातही रविवारपासून पावसाचा जोर वाढला आहे. सध्या मोसमी पावसाच्या परतीचा प्रवास सुरू आहे, मात्र राज्यात सध्या कमी दाबाच्या क्षेत्राचा परिणाम होत आहे.