अभिषेक अंगद, रांची
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
राष्ट्रीय नागरिकत्व पडताळणी आणि नोंदणी आसामपुरती नसून संपूर्ण देश त्याच्या कक्षेत आणला जाईल, तसेच ज्यांची नावे त्या यादीत नसतील त्यांना देश सोडावा लागेल, अशी घोषणा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी बुधवारी केली.
एका हिंदी दैनिकाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. आसामातील ज्या १९ लाख लोकांची नावे नागरिकत्व नोंदणीतून वगळली गेली आहेत त्यांना त्यांची बाजू विशेष लवादासमोर मांडण्याची संधी आहे. तसेच ज्यांना वकील परवडणार नाहीत त्यांना मोफत कायदेशीर मदतही दिली जाणार आहे, असेही त्यांनी सांगितले. इतर देशात घुसखोरांना राहू देत नाहीत, मग भारतातच त्यांचे वास्तव्य का, असा सवालही त्यांनी केला. त्यामुळेच नागरिक नोंदणी ही काळाची गरज आहे, असेही ते म्हणाले.
First published on: 19-09-2019 at 01:32 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Government will implement nrc across the country says amit shah zws