जळगाव जिल्ह्यातील भडगाव तालुक्यातील शेतकरी मागील काही वर्षांपासून सततच्या नापिकीमुळे कर्जबाजारी झाले आहेत. एकही हंगाम साथ देत नसल्यामुळे त्यांच्या जीवनमरणाचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. शेतातील कापूस काढण्याची वेळ आली असता ऐनवेळी अतिवृष्टीमुळे पिकाचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे रोहिदास पाटील यांनी आपल्या पाच एकर जमिनीवर लावलेल्या कापसाच्या शेतावर रोटर फिरवला आहे. अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असताना कृषी विभागाच्या कोणत्याही अधिकाऱ्यांनी बांधावर येऊन पाहणी केली नाही. हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सरकारने ठोस मदत करावी, अशी मागणी शेतकरी वर्गाकडून होत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

लोकसत्ताचे इतर व्हिडीओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra farmers issue farmer jalgaon destroyed 5 acre farm due to losses scsg