-
(संग्रहित छायाचित्रं)
-
“ज्याप्रकारे भाजपाला लोकांनी सर्मथन दिलं आहे त्याचा मला अतिशय आनंद आहे. आम्ही समर्थन दिलेले सगळे पॅनल ग्रामपंचयातीमध्ये चांगला विजय मिळवत आहेत. विशेष म्हणजे विदर्भ, मराठवाडा. उत्तर महाराष्ट्र, कोकण किंवा पश्चिम महाराष्ट्र असेल… सगळ्या भागात भाजपा एक नंबरचा पक्ष झाला आहे. इतर पक्षांच्या तुलनेत आम्ही खूप पुढे गेलो आहेत. अनेक ग्रामपंचायतींमध्ये आम्ही सर्व जागा जिंकल्या आहोत. लोकांनी प्रचंड प्रतिसाद दिला आहे,” असं देवेंद्र फडणवीस हे निवडणूक निकालावर बोलताना म्हणाले.
-
"ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल पाहता राज्यात महाविकास आघाडीचीच चलती असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. "अनेक ठिकाणी निकाल चांगले लागले आहेत. आघाडीतील पक्षाची ताकद ज्या ज्या ठिकाणी ताकद आहे, तिथे त्यांचा विजय झाला आहे. या निवडणुका खऱ्या अर्थाने कार्यकर्त्यांच्या असतात, त्यांनी त्या लढवल्या आणि जिंकले. या ग्रामपंचायतीच्या निवडणुका या चिन्हावर नसतात. त्यामुळे राष्ट्रवादी चौथ्या क्रमांकावर गेली म्हणणं चुकीचं आहे. सगळीकडे निकाल चांगले लागले आहेत," असंही पवार म्हणाले.
-
"ग्रामपंचायत पातळीवर कोणत्याही राजकीय पक्षाने फार मोठ्या प्रमाणावर लक्ष घातलंय असं अद्याप घडलेलं नाही. नांदेड जिल्हा नेहमीच काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला आहे. त्यामुळे नांदेडमध्ये काँग्रेसच्या बाजूने निकाल लागेल असं मला वाटतं," असं काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी सांगितलं.
-
"महाराष्ट्रात काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना समन्वय ठेवून काम करत आहे. त्यामुळेच हे निकाल लागले आहेत. विधानसभेतही हेच चित्रं दिसेल. विरोधक गेल्या अनेक वर्षांपासून मुंगेरी लाल के हसीन सपने पाहत आहेत. त्यांनी हे स्वप्न पाहणं सोडून द्यावं," असं राज्याचे गृहमंत्री व राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांनी निवडणूक निकालावर बोलताना सांगितलं.
-
"भाजपानेच राज्यात दमदार मुसंडी मारली आहे. राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आहे. मागच्या काळात ज्या निवडणूक झाल्या त्यावेळीही ग्रामपंचायतीत भाजपा एक नंबरचा पक्ष होता. आता तीन पक्ष एकत्र आल्यानंतर पहिल्यांदा ग्रामीण भागातील निवडणुका झाल्या. त्यामुळे जनमत कुणाच्या बाजूने हे दिसलं आहे. आता भाजपाचे सहा हजार उमदेवार निवडून आले असून भाजपाच एक नंबरचा पक्ष झाला आहे," केंद्रीय मंत्री व भाजपाचे माजी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी सांगितलं.
-
"कोकण म्हणजे शिवसेना हे समीकरण केवळ माझ्यामुळे होतं. आता तशी परिस्थिती राहिलेली नाही. यावेळी भाजपाने शिवसेनेची ताकद असलेल्या ग्रामपंचायतींमध्येही मुसंडी मारली आहे. पुढच्या वेळी कोकणात शिवसेना औषधालाही सापडणार नाही," असा दावा भाजपा खासदार नारायण राणे यांनी केला.
-
"राज्यात तीन पक्षाचं कडबोळं सत्तेत आहे. मी पहिल्यापासून सांगतो चारही पक्षांनी स्वबळावर लढावं, मग पाहा आम्हीच नंबर एकवर असू. राज्यातील आघाडी सरकारला झेंडाही नाही आणि अजेंडाही नाही. ग्रामपंचायतीत निवडून आलो म्हणजे जिंकलो असं होत नाही. त्या ग्रामपंचायतीवर सरपंच निवडून आला तरच ग्रामपंचायत हातात आली असं म्हणता येतं. ग्रामपंचायतीचं चित्रं स्पष्ट होईल. त्यावेळी आमचीच संख्या जास्त असेल," असं विश्लेषण भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ग्रामपंचायत निवडणुकीचं केलं.
-
“मला वाटतं जनतेचा विश्वास ठामपणे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यासह संपूर्ण महाविकास आघाडीवर आहे. ही नेते मंडळी चांगलं काम पाहत आहेत. यांनी चांगल्या पद्धतीने करोनाची परिस्थिती सांभाळली असून अजूनही सांभाळत आहोत. आपण हळूहळू सर्वकाही उघडत आहोत. लोकांची काळजी घेऊन कुठेही घाईगडबड न करता जबाबदारीनं काम करत आहोत. त्याचबरोबर पर्यावरण, उद्योग क्षेत्राला आपण पुढे घेऊन चाललो आहोत,”असं युवासेनेचे अध्यक्ष व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे निवडणूक निकालावर बोलताना म्हणाले.
-
“ग्रामपंचायतीमध्ये कोणताही झेंडा किंवा चिन्ह घेऊन लढत नसतो, तिथे कार्यकर्ते असतात. काही ठिकाणी महाविकास आघाडीच्या विचाराचे कार्यकर्ते एकत्र आले आणि चांगली ताकद लावली. त्यातूनच हा विजय झाला आहे. पुढील काही दिवसांत एक नंबर, दोन नंबर कोण या गोष्टी कळतील. आज हे सांगणं योग्य नाही. पण काम करताना सर्वांना सोबत आणि विचारात घेऊनच काम करावं लागेल,” असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे. (संग्रहित छायाचित्र/रोहित पवार/फेसबुक)
ग्रामपंचायत निवडणूक निकालाचा अर्थ काय? नेत्यांचं म्हणणं काय…?
“पुढच्या वेळी कोकणात शिवसेना औषधालाही सापडणार नाही”
Web Title: Maharashtra gram panchayat election results 2021 maha vikas aghadi bjp leaders reaction election results bmh