उत्तम शेती, मध्यम व्यापार व कनिष्ठ नोकरी अशी कधीकाळी आपल्या देशाची मानसिकता होती. त्यावेळी शेतकरी हा खऱ्या अर्थाने बळीराजा होता, पण बदललेल्या आधुनिक जगात शेती करणं कनिष्ठ दर्जाचं मानलं जाऊ लागलं. विकासाच्या नावाखाली शेतीव्यवसायात झालेले बदल हे शेतकऱ्यांसाठी त्रासदायक तर ठरलेच, त्याचबरोबर ते त्यांच्या शिवारासाठी जास्त हानिकारक ठरले. आधुनिक पद्धतीने शेती करताना शिवारांचं होणारं शोषण आणि त्यामुळे सुपीक जमिनीचं रूप बदलून नापीक, क्षारपड जमीन होण्याचा जो प्रवास आहे, तो प्रवास त्या शिवारासाठी जसा वेदनादायी ठरला, तसाच तो शिवाराच्या शेतकरी मालकासाठीही वेदनादायी झाला. असं शिवाराचं आणि त्यासाठी कष्ट करणाऱ्या शेतकऱ्याचं दु:ख विजय जाधव यांनी आपल्या ‘शिवार’ या कादंबरीत मांडलेलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा : आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले : गोष्ट सांगण्याची कला…

मराठीतील सर्व लोकरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Review of shivar novel written by vijay dhondiram jadhav css