-
हिंदी चित्रपट सृष्टीत ती एक श्रेष्ठ अन् लोकप्रिय अभिनेत्री म्हणून गाजली. तिचा उल्लेख मलिका-ए-जज्बात म्हणजे भावनांची सम्राज्ञी असा व्हायचा. तिचा आवाज, तिचे डोळे, तिची देहबोली.. ती भूषवीत असलेल्या पात्राच्या अंतकरणातील सुखदुखाचे अनुवाद करायचे. तिचं नाव मीना कुमारी. आज त्यांची जयंती आहे.
-
खऱ्या प्रेमासाठी आसुसलेल्या या संवेदनशील स्त्रीला अतृप्तता, तृषार्तता अन् संयोग वियोगाचा शापच मिळाला असावा. मात्र जीवनाच्या या नकारात्मक पैलूंच्या अनुभूतीतूनच त्या घडल्या.
-
मीनाकुमारींचं मूळ नाव माहजबी बानो होतं. त्यांचा जन्म १ ऑगस्ट १९३२ ला मुंबईमध्ये झाला.
-
मीना कुमारींचे वडील अली बक्ष हे चित्रपटात छोटय़ा भूमिका करत असत. ते उर्दू काव्यही करत. मीनाकुमारींची आई प्रभादेवी या त्यांच्या दुसरी पत्नी (लग्नानंतरची इकबाल बानो) त्या एक नर्तकी होत्या अन् टागोर परिवारातील होत्या.
-
अली बक्ष यांची सांपत्तिक स्थिती हलाखीची होती. त्यांना दोन मुली पहिल्या पत्नीपासून होत्या. कुटुंब पोसण्याएवढी मिळकत नसल्याने मीना यांना सातव्या वर्षांपासून बालकलाकार म्हणून चित्रपटात काम करावे लागले. त्यामुळे त्यांचे शालेय शिक्षण झालेच नाही. कुटुंबाचा आर्थिक भार एवढय़ा लहान वयातच त्यांच्यावर पडला.
-
१९५२ साली मीनाकुमारींची प्रमुख भूमिका असलेला ‘बैजूबावरा’ हा चित्रपट गाजला अन् त्या मशहूर झाल्या. त्याच वर्षी त्यांनी कमाल अमरोही या त्यांच्याहून वयाने १५ वर्षांनी मोठा असलेल्या शायर दिग्दर्शकाशी लग्न केलं.
-
पण वैचारिक मतभेदांमुळे १९६४ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. मीनाकुमारी या धक्क्यातून सावरल्या नाहीत आणि त्या ती गंभीर आजारी झाल्या.
-
मीना कुमारी मदिरेच्या पूर्णत: आहारी गेल्या होत्या.
-
मीना यांच्या दुखद जीवनाला अनुरूप अशाच भूमिका त्यांना मिळत गेल्या अन् त्या भूमिका त्या वास्तवात जगत राहिल्या.
-
‘मीना’ या फारसी शब्दाचा अर्थ मदिरेची सुरई अथवा पेला अन् मीना कुमारी म्हणजे मद्य किंवा साकी (जी मद्यप्यांना मद्य देते ती.) मद्याने भरलेली सुरई रिती होते अन् मद्य देणारी साकी ऊर्फ मदिराक्षी मात्र मद्यापासून वंचित असते. त्याच प्रमाणे मीनाकुमारी यांच्या जीवनाच्या मद्यालयात सदैव वंचित अन् रिती राहिली.
-
'पाकिजा' हे कमाल अमरोहींचे सुंदर स्वप्न होते. हा चित्रपट बनण्यास चौदा वर्षांचा कालावधी लागला. या दरम्यान मीना यांनी कमाल अमरोहींशी १९६४ साली निकाह केला. आपल्या दीर्घ आजारातही तिने हा चित्रपट पूर्ण केला. त्याच काळात भारत-पाक युद्धास सुरुवात झाली. आणि चित्रपट सुपर फ्लॉप ठरला.
-
'पाकिजा' प्रदर्शित झाल्यानंतर केवळ आठ महिन्यानंतर मीनाकुमारी यांची दु:खद बातमी सर्वदूर पोहोचली. त्यांच्या मृत्यूनंतर 'पाकिजा' ला नव्याने प्रदर्शित करण्यात आले. त्यांच्या मृत्यूने मात्र मृतवत 'पाकिजा' मध्ये प्राण ओतले आणि या चित्रपटाने देशात अनेक आठवडे हाऊसफुल्ल ठरून नवनवीन रेकॉर्ड नोंदविले. चित्रपटाचे निर्माते, दिग्दर्शक कमाल अमरोही एकदम धनाढ्य झाले.
-
-
-
-
-
‘मलिका-ए-जज्बात’ मीना कुमारी
Web Title: 83rd birth anniversary of tragedy queen meena kumari