मुस्लीम समाजातील पाच जण रा. स्व. संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांना भेटल्याची बातमी उघड झाल्यानंतर प्रसारमाध्यमांतून, ‘उलटसुलट चर्चा’ म्हणजे काय याचे प्रत्यंतरच येऊ लागले. भागवत यांना भेटणाऱ्यांत प्रस्तुत लेखकाचा समावेश होता, तसेच दिल्लीचे माजी नायब राज्यपाल नजीब जंग, हॉटेल व्यावसायिक सईद शेरवानी, लेफ्टनंट जनरल (निवृत्त) ज़मीरउद्दीन शाह आणि पत्रकार शाहिद सिद्दिकी हे अन्य चौघे होते. भागवत यांना भेटण्यासाठी प्रयत्न करण्याचा निर्णय सर्वस्वी आमचा होता. आम्ही पाचही जण समविचारी, संवादाच्या प्रक्रियेवर विश्वास ठेवणारे आहोत आणि मुस्लीम समाजातील असुरक्षिततेच्या भावनेबद्दल आम्हाला काळजी वाटते, म्हणून आम्ही सरसंघचालकांना भेटलो. या भेटीची बातमी आल्यापासून आम्हा प्रत्येकाला, मुस्लीमच नव्हे तर बिगरमुस्लिमांकडूनही जे संदेश आले, ते संवाद हाच पुढला मार्ग असल्याचे सुचवणारे होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पण काही प्रतिक्रियांमध्ये टीकेचा सूरही होता. उदाहरणार्थ आम्हाला मुस्लिमांचे प्रतिनिधित्व करण्याचा ‘अधिकार’ कोणी दिला असा यापैकी काहींचा सवाल होता. त्याखेरीज काही जणांना आम्ही एका जातीयवादी संघटनेशी ‘संबंध ठेवल्या’मुळे आमची आजवरची धवल प्रतिमा डागाळेल, अशी चिंता होती तर काही जणांच्या मते आम्ही ‘जाळ्यात पकडले गेलो’. मात्र, संवाद हाच पुढे जाण्याचा एकमेव मार्ग आहे यावर कुणीही प्रश्नचिन्ह उपस्थित केलेले नाही, हेही नमूद केले पाहिजे. आम्हाला जे प्रश्न विचारले गेले, त्यांची सरळ उत्तरे देण्यासाठी हा लेखनप्रपंच आहे.

मराठीतील सर्व विशेष लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: We all five meet rss chief as a muslim for what asj
First published on: 30-09-2022 at 10:34 IST