Premium

राहुल गांधींनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे द्यायला मोदी का घाबरत आहेत? नाना पटोलेंचा सवाल

अदाणींच्या कंपनीत शेल कंपन्यांचे २० हजार कोटी रुपये कुठून आले? फक्त अदानीलाच देशातील आणि परदेशातील कंत्राटे देण्याचे कारण काय? हे प्रश्न राहुल गांधी यांनी विचारले म्हणून राजकीय सूडबुद्धीने भाजपा सरकारने राहुल गांधी यांच्यावर कारवाई केली.

Nana Patole (4)
नाना पटोले (छायाचित्र – लोकसत्ता टीम)

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

देशात आणि राज्यात हुकूमशाही पद्धतीने कारभार सुरू आहे. विरोधी पक्षांच्या सभांना परवानगी देताना जाचक अटी घालून आवाज दडपण्याचा प्रयत्न केला जात आहे. भाजपा केवळ जातींमध्ये आणि धर्मांमध्ये फूट पाडून राजकीय पोळी भाजत आहे. मनुवादी व्यवस्थेने अन्नदात्याला, गरीब माणसाला, छोटे दुकानदार यांना बरबाद करण्याचे काम केले. हेच लोक देशातील लोकशाही आणि संविधान संपवण्याचे काम करत असून, राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करणे याचाच भाग आहे. लोकशाही आणि संविधान वाचविण्यासाठी भाजपाच्या धर्मांध व्यवस्थेला उखडून टाकावे लागेल, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 01-04-2023 at 17:34 IST
Next Story
तटरक्षक दलाने ताब्यात घेतलेली बोट भाईंदरची; बोटीत पाकिस्तांनी नागरिक असल्याची केवळ अफवा