पिंपरी: भाजपच्या हुकूमशाही कारभाराला देशातील जनता कंटाळली असून त्यांचा हा कारभार जास्त दिवस चालणार नाही, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा विद्या चव्हाण यांनी केली आहे. तीन सदस्यीय प्रभागरचना झालेली असताना जाणीवपूर्वक चार सदस्यीय प्रभाग करून संभ्रमावस्था निर्माण केली जात आहे . मात्र, राष्ट्रवादीला फरक पडणार नाही, असेही त्या म्हणाल्या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शहर महिला राष्ट्रवादीच्या वतीने मोशीत आयोजित आढावा बैठकीत त्या बोलत होत्या. महिला शहराध्यक्षा कविता आल्हाट, माजी महापौर मोहिनी लांडे, शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्यासह डॉ.आशा मिरगे, वैशाली नागवडे, उज्वला शेवाळे, शितल हगवणे, रूपाली दाभाडे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: People bored bjp authoritarian rule administration vidya chavan ncp pune print news ysh
First published on: 08-08-2022 at 17:31 IST