खाते वाटपाचा अधिकार मुख्यमंत्र्यांचा असून याबाबत कुठलाही वाद नाही. खात्यात बदल करायचा असेल तर चर्चा करून ठरवू, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. ते नागपुरात पत्रकारांशी बोलत होते. फडणवीस म्हणाले, खाते वाटप झाल्यावर संबंधित मंत्री त्यांच्या खात्याला न्याय देण्याचा प्रयत्न करतील. सध्या निम्मेच मंत्रिमंडळ असल्याने सर्वांवर अतिरिक्त खात्याचा भार आहे. मंत्र्याकडील अतिरिक्त खाती पुढच्या मंत्रिमंडळाच्या विस्ताराच्या वेळी त्या-त्या गटातील नवीन मंत्र्यांना मिळतील. खात्यात अदलाबदल करायचे असल्यास आम्ही चर्चा करून ठरवू. विस्तार कधी करायचा हा सर्वस्वी मुख्यमंत्र्यांचा अधिकार आहे आणि योग्य वेळ पाहून ते ठरवतील, असेही फडणवीस म्हणाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शिवसेनेला मुख्यमंत्रीपद देण्याचा करार झालाच नव्हता या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विधानाकडे फडणवीस यांचे लक्ष वेधले असता ते म्हणाले, शिंदे यांच्या विधानात तथ्य आहे. मी पहिल्या दिवसापासून साक्षीदार आहे. सर्व वाटाघाटी मीच केल्या आहेत. आमच्यावर बेईमानीचा आरोप केला जातो. मात्र सर्वात मोठी बेईमानी आमच्यासोबत झाली, अशी टीका त्यांनी केली.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: There is no dispute about department sharing if there is a change we will discuss devendra fadnavis amy
First published on: 14-08-2022 at 19:20 IST