मुंबई : राज्यात गेली सव्वा वर्ष सत्तेवर असलेले घटनाबाह्य सरकार हे प्रत्येक विभागातील भ्रष्टाचाराची मजा घेत आहे. राज्यातील शेतकरी आत्महत्या करीत आहेत. राज्यातील काही भागात दुष्काळजन्य स्थिती आहे. गुन्हेगारी आलेख वाढू लागला आहे. महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण जास्त आहे. अशा विदारक परस्थितीत मुख्यमंत्री, विधानसभा अध्यक्ष, काही मंत्री हे परदेश दौऱ्यात मग्न आहेत. हे परदेश दौरे म्हणजे सहली आहेत, अशी टीका शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत केली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुख्यमंत्री शिंदे जर्मनी, लंडन येथे जाऊन करणार काय होते असा प्रश्न उपस्थित केल्यानंतर तीस मिनिटांत हा दौरा रद्द करावा लागला. राज्यात लोकशाहीची हत्या केली जात असताना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे घाना येथे जाऊन लोकशाहीवर बोलणार होते. घानाला जाऊन त्यांनी देशाची बदनामी करू नये असा प्रश्न उपस्थित केल्यानंतर त्यांनाही हा दौरा रद्द करावा लागला आहे. उद्योग मंत्री उदय सामंत ब्रिटनला ३ ऑक्टोबरला जात आहेत. त्या ठिकाणी त्यांची बैठक होणार असून कोणत्या कंपनीबरोबर बैठक होणार हे स्पष्ट नाही. आम्हीही दौरे केले पण तेथील प्रत्येक बैठकींचा इतिवृत्तात समाज माध्यमांवर मांडलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराज्यांची वाघनखे आणण्यासाठी इग्लडला एक मंत्री जाणार आहेत मात्र ही वाघनखे उसणवारी आणली जाणार आहेत की कायम स्वरूपी परत आणली जाणार आहेत ते सरकारने स्पष्ट करावे. महाराजांच्या वाघनखांविषयी सरकारने खोटे बोलून जनतेच्या भावनांशी खेळू नये, असे इशारा ठाकरे यांनी दिला आहे.
फडणवीस यांच्या दौऱ्याचा खर्च जपान सरकारकडून- शेलार
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शासकीय अतिथी म्हणून निमंत्रित करण्यात आल्याने त्यांच्या दौऱ्याचा संपूर्ण खर्च जपान सरकारने केला. या दौऱ्यात मोठी आर्थिक गुंतवणूक राज्यात आली असून त्याचा तपशील फडणवीस यांच्या समाजमाध्यमांवर उपलब्ध असल्याचे प्रत्युत्तर मुंबई भाजप अध्यक्ष अॅड. आशिष शेलार
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Govt engaging in foreign tours on public money aditya thackeray allegation ysh