Maharashtra News Live Updates, 23 May : केंद्र सरकारपाठोपाठ राज्यातील महाविकास आघाडी सरकारनेही रविवारी इंधन करकपात करून नागरिकांना दिलासा दिला. राज्य सरकारने पेट्रोलवरील मूल्यवर्धित करात २ रुपये ०८ पैसे, तर डिझेलवरील करात १ रुपया ४४ पैसे कपात केली आहे. तर राज्यसभेच्या उमेदवारीकरिता कोल्हापूरचे छत्रपती संभाजीराजे यांनी शिवसेनेत प्रवेश करावा अशी अट घातली असली तरी शिवसेनेत प्रवेश करण्याची संभाजीराजे अनुकूल नाहीत. महाविकास आघाडी म्हणून पाठिंबा द्यावा, अशी भूमिका त्यांनी मांडली आहे.
दरम्यान, मागील आठवडाभरात राज्यातील दैनंदिन रुग्णसंख्या तीनशेच्याही वर गेली आहे. परिणामी उपचाराधीन रुग्णांची संख्या ही १८०० च्या घरात गेली आहे. बाधितांचे प्रमाणही जवळपास दीड टक्क्यांवर गेले आहे.
अशा अनेक महत्वाच्या घडामोडी राज्य, देश, आंतरराष्ट्रीय स्तरावर तसंच इतर क्षेत्रात घडत आहेत. या सर्व घडामोडी तुम्ही आता एकाच ठिकाणी वाचू शकता.
Maharashtra Latest News Updates : राज्यासह देश आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रत्येक अपडेट!
“ज्याला तोंडाची भाषा कळते त्याला ती भाषा आणि ज्याला हाताची भाषा कळते त्याला हाताची भाषा दाखवावीच लागते. कर्मचाऱ्यांना न्याय बाजारात मिळत नाही, तर तो मनगटाच्या जोरावर मिळवावा लागतो. त्यामुळे लढा उभा करताना, साम, दाम, दंड आणि भेद या नीतीचा वापर करावाच लागेल,” असं मत माजी खासदार आनंदराव अडसूळ यांनी व्यक्त केलं.
केंद्र सरकारपाठोपाठ राज्यातील महाविकास आघाडी सरकारनेही रविवारी इंधन करकपात करून नागरिकांना दिलासा दिला़ राज्य सरकारने पेट्रोलवरील मूल्यवर्धित करात २ रुपये ०८ पैसे, तर डिझेलवरील करात १ रुपया ४४ पैसे कपात केली. मात्र राज्य सरकारने केलेली ही दरकपात म्हणजे सर्वसामान्यांनी थट्टा असल्याची टीका राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलीय. फडणवीस नेमकं काय म्हणालेत जाणून घ्या
डोंबिवली पश्चिमेतील देवी चौकात राहणाऱ्या एका १३ वर्षाच्या तबला वादकाला लुटणाऱ्या रिक्षाचालकाला विष्णुनगर पोलिसांनी अटक केली आहे. रिक्षाचालक सम्राट अनंत मगरे (१९) हा सिद्धार्थनगर झोपडपट्टीत राहतो. त्याने युवा तबला वादकाला लुटल्याची कबुली दिली. त्याच्याकडून चोरीची सोनसाखळी आणि चोरीसाठी वापरलेली रिक्षा विष्णुनगर पोलिसांनी जप्त केली आहे.
महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील ओबीसी आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिलीय. मात्र, दुसरीकडे मध्य प्रदेशचा अहवाल गृहित धरत त्यांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ओबीसी आरक्षणानुसार घेण्यास परवानगी दिली आहे. यानंतर महाराष्ट्रातील राजकारणाचा पारा चढलाय. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नात महाराष्ट्राचे अॅडव्होकेट जनरल यांच्या चुका असल्याचा गंभीर आरोप केलाय.
शिवसेनेने संभाजीराजेंना पक्ष प्रवेश आणि उमेदवारीची ऑफर दिल्याची आणि ही ऑफर संभाजीराजेंनी नाकारल्याची चर्चा आहे. यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रतिक्रिया व्यक्त केलीय.
संभाजीराजेंनी शिवसेनेची ऑफर नाकारल्याची चर्चा, नाना पटोलेंची पहिली प्रतिक्रिया म्हणाले…https://t.co/tJPwlfDS0X#NanaPatole #Congress #SambhajirajeChhatrapati #Shivsena @NANA_PATOLE @YuvrajSambhaji
— LoksattaLive (@LoksattaLive) May 23, 2022
सोलापूरच्या वैरागच्या बाजारातील एक लिंबू विक्रेता शेतकरी सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. या लिंबू विक्रेता शेतकऱ्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय.
“लिंबू १० रुपयाला दोन, घेतंय का कोण? की लावू शरद पवारांना फोन”, सोलापूरच्या शेतकऱ्याचा Video व्हायरलhttps://t.co/IHKrVRvjfC#ViralVideo #Farmer #SharadPawar
— LoksattaLive (@LoksattaLive) May 23, 2022
चंद्रपुरातील ताडोबा – अंधारी व्याघ्र प्रकल्पातील १७ वर्षीय वाघाडोह या वाघाचा सोमवारी सकाळी मृत्यू झाला. दोन दिवसांपूर्वी वाघाडोह वाघाच्या हल्ल्यात सिनाला येथे गुराख्याचा मृत्यु झाला होता. तेव्हापासून वाघाडोह वाघावर ताडोबाच्या अधिकाऱ्यांचे लक्ष होते. त्याची प्रकृती ठीक नव्हती. १७ वर्ष वय असल्याने तो म्हातारा झाला होता. अशातच आज सोमवारी सकाळी त्याचा नैसर्गिक मृत्यू झाला. सविस्तर बातमी
राज्यात करोना नियंत्रणात आहे. लोकांना आग्रह नाही, पण त्यांनी करोनाविरोधात लढणारे प्रतिपिंड (अँटीबॉडी) तपासून तिसऱ्या डोससंदर्भात निर्णय घ्यावा, असं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं आहे. नागपुरातील रवी भवन येथे पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला. राजेश टोपे नागपूर दौऱ्यावर असून डागा आणि मेंटल हॉस्पिटलला भेट देणार आहेत.
एकीकडे शिवसेना आणि संभाजीराजेंदरम्यान चर्चा सुरु असतानाच दुसरीकडे आता शिवसेनेनं दिलेल्या या ऑफरवर राज्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. नाशिकमध्ये पत्रकारांनी या प्रकरणासंदर्भात फडणवीस यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी अगदी मोजक्या शब्दांमध्ये या प्रश्नावर उत्तर दिलं. फडणवीस नेमकं काय म्हणाले जाणून घ्या येथे क्लिक करुन
रिक्षात येऊन बसत असल्याने उल्हासनगरात एका रिक्षाचालकाने कुत्र्याच्या लहान पिलाला लाकडी दांडक्याने बेदम मारहाण करत गंभीर जखमी केले. या मारहाणीत या मादी पिलाचा दुर्दैवी मृत्यू झाला. याप्रकरणी रिक्षाचालक धर्मा कुंठे याच्यावर उल्हासनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकारानंतर प्राणीप्रेमींमधून संपात व्यक्त होत आहे.
धक्कादायक! रिक्षात बसल्याने कुत्र्याच्या पिलाला बेदम मारहाण, मारहाणीत पिलाचा दुर्दैवी मृत्यू; रिक्षाचालकावर गुन्हा दाखल https://t.co/BzyxFlKKXo
— LoksattaLive (@LoksattaLive) May 23, 2022
सहा महिन्यांपूर्वी हडपसर भागातील एका घरात कोणी नसल्याची संधी साधून चोरट्यांनी साडेचौदा लाखांचा ऐवज लंपास केला होता. चोरलेल्या दागिन्यांच्या विक्रीतून चोरट्यांनी महागड्या वस्तू खरेदी करण्यास सुरूवात केली अन् ते पोलिसांच्या जाळ्यात अडकले.
राज्यसभेच्या उमेदवारीकरिता कोल्हापूरचे छत्रपती संभाजीराजे यांनी शिवसेनेत प्रवेश करावा अशी अट घातली असली तरी शिवसेनेत प्रवेश करण्याची संभाजीराजे अनुकूल नाहीत. महाविकास आघाडी म्हणून पाठिंबा द्यावा, अशी भूमिका त्यांनी मांडली आहे. मात्र आता शिवसेनेने अपक्ष उमेदवाराला पाठिंबा देणार नाही असे स्पष्ट केले आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मुंबईत माध्यमांशी बोलताना याबाबत भूमिका स्पष्ट केली. वाचा सविस्तर…
राज्यसभेच्या निवडणुकीत सहाव्या जागेसाठी शिवसेना उमेदवाराला मतदान करण्यात येणार असल्याची भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी शनिवारी (२१ मे) पत्रकारांशी बोलताना जाहीर केली. यावेळेस त्यांनी केलेल्या एका वक्तव्यावरुन निलेश राणेंनी संतप्त प्रतिक्रिया नोंदवलीय. काय आहे हे नेमकं प्रकरण जाणून घ्या येथे क्लिक करुन
“केंद्रीय तपास यंत्रणांतील अधिकाऱ्यांना ‘फतवे’ देण्याचे काम फडणवीस करतात, ही त्यांना आज मजा वाटत आहे,” असंही शिवसेनेनं म्हटलं आहे. शिवसेनेनं फडणवीस यांच्यासंदर्भात कोणते दावे केलेत आणि या प्रकरणासंदर्भात काय म्हटलंय जाणून घ्या
एकीकडे राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी शिवसेना आणि संभाजीराजेंदरम्यान चर्चा सुरु असतानाच दुसरीकडे भाजपा प्रदेश सचिव तसेच माजी खासदार निलेश राणे यांनी ट्विटरवरुन या प्रकरणावर भाष्य करताना संभाजीराजेंना सल्ला दिलाय. निलेश राणे काय म्हणालेत जाणून घ्या येथे क्लिक करुन
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी सिंधुदुर्गमधील देवबाग येथील जाहीर सभेमध्ये राज्य सरकारवर निशाणा साधतानाच केंद्र सरकारच्या कामांचं कौतुक केलं आहे. येथील सभेमध्ये आपल्या भाषणादरम्यान राणेंनी महाविकास आघाडीवर निशाणा साधला. ते नेमकं काय म्हणाले जाणून घ्या येथे क्लिक करुन
राज्यसभेच्या उमेदवारीकरिता कोल्हापूरचे छत्रपती संभाजीराजे यांनी शिवसेनेत प्रवेश करावा अशी अट घालण्यात आली आहे. मात्र शिवसेनेत प्रवेश करण्यासाठी संभाजीराजे अनुकूल नाहीत. महाविकास आघाडी म्हणून पाठिंबा द्यावा, अशी भूमिका त्यांनी मांडली आहे. दरम्यान दुपारी १२ वाजता होणाऱ्या बैठकीआधीच संभाजीराजे कोल्हापूरला रवाना झाले आहेत. त्यामुळे संभाजीराजेंनी शिवसेनेच्या पक्ष प्रवेशासाठी दिलेल्या निमंत्रणाकडे पाठ फिरवल्याची चर्चा रंगली आहे.
संभाजीराजेंनी फेटाळला शिवसेनेचा प्रस्ताव? निमंत्रण फेटाळत कोल्हापूरला रवाना झाल्याने चर्चांना उधाण https://t.co/f7Jd82BtV0 @YuvrajSambhaji #chhatrapatisambhajimaharaj @ShivSena #Shivsena #UddhavThackeray
— LoksattaLive (@LoksattaLive) May 23, 2022
टोमॅटो लागवडीत घट झाल्याने घाऊक बाजारात टोमॅटोची आवक कमी होत आहे. मागणीच्या तुलनेत आवक घटल्याने किरकोळ आणि घाऊक बाजारात गेल्या काही दिवसांपासून टोमॅटोचे दर तेजीत आहेत. येथे वाचा सविस्तर वृत्त
जगभरातील १९४ देशांचा सहभाग असणाऱ्या जागतिक आरोग्य संघटनेच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या जागतिक आरोग्य परिषदेत बोलताना जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख ट्रेड्रोस गेब्रेयसस यांनी दिला इशारा. ते नेमकं काय म्हणाले जाणून घ्या येथे क्लिक करुन…
मागील आठवडाभरात राज्यातील दैनंदिन रुग्णसंख्या तीनशेच्याही वर गेली आहे. परिणामी उपचाराधीन रुग्णांची संख्या ही १८०० च्या घरात गेली आहे. बाधितांचे प्रमाणही जवळपास दीड टक्क्यांवर गेले आहे. वाचा सविस्तर…
मागील काही दिवसापासून कल्याण-डोंबिवलीत वाढलेल्या सामूहिक गुंडगिरी विरोधात कल्याण परिमंडळ ३ चे पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ यांनी कारवाईचे निर्देश दिले आहेत. वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी सराईत गुन्हेगारांविरोधात एमपीडीएअंतर्गत कारवाई केल्यानंतर आता कल्याण कोळसेवाडी पोलिसांनी एका खंडणीच्या गुन्ह्यात अटक केलेल्या आणि सहभागी असलेल्या १२ आरोपींविरोधात मोक्काअंतर्गत कारवाई केली आहे. एकाचवेळी १२ आरोपींवर मोक्का लावण्याची कल्याणातील ही पहिलीच घटना आहे.
उत्तर प्रदेशमध्ये भाजपाचं सरकार आल्यापासून ईदच्या दिवशी रस्त्यावर नमाज पठण करणं बंद झालं असल्याचं मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी म्हटलं आहे. यावेळी त्यांनी राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेच्या मुद्द्यालाही अधोरेखित केलं आणि उत्तर प्रदेशात रामनवमीच्या दिवशी कोणतीही जातीय दंगल झाली नसल्याचं सांगितलं.
अनेक महत्वाच्या घडामोडी राज्यात, देशात, आंतरराष्ट्रीय स्तरावर तसंच इतर क्षेत्रात घडत आहेत. या सर्व घडामोडी तुम्हाला आता एकाच ठिकाणी वाचू शकता.