दादर पश्चिमेकडील पाटीलवाडी ही झोपडपट्टी म्हणून घोषित करावी व झोपु योजनेचा लाभ मिळावा, अशी मागणी २००६ पासून तेथील रहिवासी माझ्याकडे करीत होते. परंतु पालिका प्रशासन दखल घेत नव्हते. त्यांच्या मागणीचा सहानुभूतीपूर्वक विचार व्हावा व योग्य ती कारवाई व्हावी यासाठी २००८ मध्ये पत्र दिले. माझ्या पत्रानंतर तब्बल दोन वर्षांनंतर पालिकेने सदरचा भूभाग झोपडपट्टी म्हणून घोषित केला. त्यामुळे माझ्या प्रतापामुळे चाळीची झोपडपट्टी झाली हा मथळा दिशाभूल व माझी बदनामी करणारा आहे, असा खुलासा माजी मुख्यमंत्री व शिवसेना नेते मनोहर जोशी यांनी केला आहे. ‘मनोहर जोशी यांचा प्रताप – जावयासाठी चाळीची झोपडपट्टी केली!’ या शुक्रवारच्या अंकात प्रसिद्ध झालेल्या बातमीसंदर्भात जोशी यांनी हा खुलासा केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Manohar joshi refuse the allegation over slum declare