मे महिन्यात एकूण १५ शुभ मुहूर्त; जाणून घ्या, सर्व तारखा एका क्लिकवर
जर तुम्ही मे महिन्यात लग्न करण्याचा विचार करत असाल तर मे महिन्यात कोणत्या तारखा विवाहासाठी शुभ आहे, तुम्हाला माहितीये का? आज आपण त्याविषयी सविस्तर जाणून घेणार आहोत.
जर तुम्ही मे महिन्यात लग्न करण्याचा विचार करत असाल तर मे महिन्यात कोणत्या तारखा विवाहासाठी शुभ आहे, तुम्हाला माहितीये का? आज आपण त्याविषयी सविस्तर जाणून घेणार आहोत.
लोकप्रिय अभिनेत्री मृणाल कुलकर्णी, ज्यांनी 'सोनपरी'सारख्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या मनावर मोहिनी घातली. गेली ४०-४५ वर्षे मराठी आणि हिंदी मनोरंजन सृष्टीत कार्यरत आहेत. अभिनयाबरोबरच त्यांच्या सौंदर्याचेही चाहते आहेत. मात्र, करिअरच्या सुरुवातीला त्यांनी तब्येतीकडे दुर्लक्ष केलं होतं, असं त्यांनी एका मुलाखतीत सांगितलं. वयाच्या चाळीशीपर्यंत कामामुळे त्यांनी तब्येतीकडे दुर्लक्ष केल्याचं त्यांनी मान्य केलं.
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या एकत्र येण्याच्या चर्चांवर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी विचारले की, युती करताना ताकद पाहिली जाते का? भाजपाचे १३४ आमदार, अजित पवारांचे ४१, शिंदे यांचे ५२ आमदार आहेत. मग ठाकरे यांना काय फायदा होणार? त्यांनी दोन्ही ठाकरे भ्रष्टाचारात गुंतल्याचा आरोप केला आणि उद्धव यांनी भाजपाविरोधात बोलू नये असेही सांगितले.
दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांचा 'कुली' हा बहुप्रतीक्षित चित्रपट १४ ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे. यात रजनीकांत यांच्यासह नागार्जुन, उपेंद्र, सौबिन शाहीर, सत्यराज, श्रृती हासन आणि आमिर खान झळकणार आहेत. लोकेश कनागराज यांनी दिग्दर्शन केलेल्या या चित्रपटाचे बजेट ३५० कोटी आहे. 'कुली'ने सॅटेलाइट डीलमधून ९० कोटी आणि संगीत हक्कांमधून २० कोटी रुपये कमावले आहेत. प्रेक्षकांमध्ये या चित्रपटाबद्दल मोठी उत्सुकता आहे.
अभिनेत्री दिव्या दत्ताने एका मुलाखतीत दिवंगत अभिनेता इरफान खानबरोबर 'Hisss' चित्रपटातील अनुभव सांगितला. इंटिमेट सीनच्या शूटिंगवेळी इरफान घाबरले होते, पण दिग्दर्शक जेनिफर लिंचने मदत केली. आदित्य चोप्राने दिलेल्या सल्ल्यानंतर दिव्याने अनेक चित्रपट नाकारले आणि करिअरची दिशा बदलली. 'हिस्स' मध्ये मल्लिका शेरावत मुख्य भूमिकेत होती, तर दिव्या, इरफान आणि इतर कलाकारांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या.
सर्वोच्च न्यायालयाने बलात्काराच्या आरोपाखालील २५ वर्षीय आरोपीला निर्दोष मुक्तता दिली आहे. न्यायालयाने स्पष्ट केले की सहमतीने झालेल्या शरीरसंबंधांना नातं तुटल्यानंतर बलात्कार म्हणता येणार नाही. मुंबई उच्च न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवले होते, परंतु सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय फिरवला. न्यायालयाने असेही नमूद केले की विवाहाच्या खोट्या आश्वासनावर आधारित हा खटला नाही.
केंद्रीय रेल्वे मंत्री आश्विनी वैष्णव यांनी गुजरातमधील दाहोद येथे उत्पादित ९ हजार हॉर्सपॉवर लोकोमोटिव्ह इंजिनमध्ये रिजनरेटिव्ह ब्रेकिंग क्षमता असल्याचं सांगितलं. रिजनरेटिव्ह ब्रेकिंग प्रणाली ट्रेनची गतिज ऊर्जा कॅप्चर करून विद्युत ऊर्जेमध्ये रुपांतर करते आणि ती वीज परत पॉवर ग्रीडमध्ये पाठवते. वंदे भारत ट्रेनमध्ये ही प्रणाली वापरली जाते, ज्यामुळे ती अधिक ऊर्जा कार्यक्षम आहे.
राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांचा मुलगा सिद्धांत शिरसाट यांच्यावर एका महिलेकडून शारीरिक आणि मानसिक त्रास दिल्याचा आरोप करण्यात आला होता. मात्र, काही तासांतच महिलेने सर्व आरोप मागे घेतले आहेत. तिने हे प्रकरण वैयक्तिक असल्याचे सांगून राजकारण न करण्याचे आवाहन केले आहे. संजय शिरसाट यांचा या प्रकरणाशी काहीही संबंध नसल्याचेही तिने स्पष्ट केले आहे.
सध्या 'हेरा फेरी ३'ची जोरदार चर्चा आहे. परेश रावल यांनी 'बाबुराव आपटे'ची भूमिका सोडल्याने चाहत्यांची निराशा झाली आहे. अक्षय कुमारच्या निर्मित संस्थेने त्यांच्यावर २५ कोटींचा दावा ठोकला आहे. अशातच 'हाउसफुल्ल ५'च्या ट्रेलर लाँचला अक्षय कुमारने परेश रावल यांना मूर्ख म्हणणं चुकीचं असल्याचं सांगितलं. आम्ही खूप चांगले मित्र आहोत आणि ते खूप कमाल अभिनेते आहेत. हे प्रकरण न्यायालयात असल्याने याविषयी अधिक बोलणार नसल्याचंही त्याने यावेळी स्पष्ट केलं.
अभय डागा यांची यशोगाथा: अभय डागा, महाराष्ट्रातील वर्ध्याचे रहिवासी, यांनी अभिनय क्षेत्रात पदार्पण करून 'सिया के राम' मालिकेत शत्रुघ्नची भूमिका साकारली. नंतर त्यांनी मायक्रोसॉफ्टमध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून काम केले. २०२१ मध्ये त्यांनी नोकरी सोडून यूपीएससी परीक्षेची तयारी केली आणि २०२३ मध्ये १८५ रँक मिळवत आयपीएस अधिकारी बनले. त्यांना यूपी कॅडर मिळाले आहे.
हरियाणामधून अटक झालेली यूट्यूबर ज्योती मल्होत्रा पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली आहे. ती पाकिस्तानच्या चार गुप्तचर अधिकाऱ्यांच्या संपर्कात होती आणि तिच्या मोबाइल व लॅपटॉपमधून १२ टीबी डेटा पोलिसांनी जप्त केला आहे. ज्योतीने पाकिस्तानचा दोनदा दौरा केला होता आणि तिच्या यूट्यूब चॅनलवर देशाची गुप्त माहिती पुरवल्याचा आरोप आहे. तिच्या व्हिडीओमध्ये AK 47 घेऊन गार्ड दिसत आहेत.
अमेरिकेत बेकायदा राहणाऱ्या भारतीयांविरोधात कारवाई केल्यानंतर, अमेरिकन प्रशासनाने भारतीय विद्यार्थ्यांना इशारा दिला आहे. अमेरिकन दूतावासाने सोशल मीडिया पोस्टद्वारे विद्यार्थ्यांना त्यांच्या व्हिसाच्या अटींचे पालन करण्यास सांगितले आहे. अभ्यासक्रम सोडल्यास किंवा लेक्चर्सला गैरहजर राहिल्यास व्हिसा रद्द होऊ शकतो आणि भविष्यातील व्हिसासाठी पात्रता गमावू शकता. ट्रम्प प्रशासनाने ४,७०० आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांची परवानगी रद्द केली आहे.
हरियाणाच्या पंचकुला परिसरात एका कारमध्ये मित्तल कुटुंबातील सहा जणांचे मृतदेह आढळले. प्रवीण मित्तल यांना शुद्धीत असताना बाहेर काढले, पण रुग्णालयात नेईपर्यंत त्यांचाही मृत्यू झाला. कारमध्ये सुसाईड नोट सापडली, ज्यात कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या केल्याचे नमूद होते. प्रवीण मित्तल यांनी बँकेकडून घेतलेले कर्ज फेडता न आल्याने आर्थिक संकटात होते. पोलीस तपास सुरू आहे.
यंदाच्या ‘कान्स २०२५’ महोत्सवात भारतीय अभिनेत्री उर्वशी रौतेलाने आपली उपस्थिती दर्शवली. तिच्या रेड कार्पेट लूकची ऐश्वर्या रायच्या २०१८ लूकशी तुलना झाली. उर्वशीने टीकाकारांना उत्तर देत म्हटलं की, ती कोणाचीही नक्कल करत नाही. मी इथे कोणाचीही कॉपी बनण्यासाठी आलेली नाही. तिने ट्रोलर्सना ब्लॉक केलं असून चाहत्यांना अफवांकडे लक्ष न देण्याचं आवाहन केलं आहे.
सलमान खान आणि ऐश्वर्या राय यांचं एकेकाळी अफेअर होतं, पण २००२ मध्ये त्यांचं ब्रेकअप झालं. सलमानला लग्न करायचं होतं, पण ऐश्वर्या करिअरमध्ये स्थिरावू इच्छित होती. सलमानच्या इतर अभिनेत्रींशी असलेल्या संबंधांमुळे ऐश्वर्याचे आई-वडील नाराज होते. एका घटनेनंतर ऐश्वर्याने नातं तोडलं. २००७ मध्ये ऐश्वर्याने अभिषेक बच्चनशी लग्न केलं, तर सलमान अद्याप अविवाहित आहे.
ऑगस्ट २०२३ मध्ये २४ वर्षीय मुलीचं लग्न झालं आणि ती नवऱ्यासह लंडनला गेली. ऑगस्ट २०२४ मध्ये तिला समजलं की नवरा नोकरी करत नाही. नोव्हेंबर २०२४ मध्ये तिचा मृतदेह नवऱ्याच्या कारमध्ये सापडला. तिच्या गळा दाबून हत्या करण्यात आली होती. नवरा मुख्य संशयित असून तो लंडन सोडून भारतात आला. दिल्ली पोलिसांनी हुंड्यासाठी हत्या केल्याचा आरोप केला. मार्च २०२५ मध्ये तिच्या सासू-सासऱ्यांना अटक झाली. पतीविरोधात लुक आऊट नोटीस जारी केली आहे.
प्रसिद्ध गायक किशोर कुमार यांच्या गाण्यांनी ९०च्या काळात अनेकांना वेड लावलं होतं आणि आजही त्यांची क्रेझ कायम आहे. किशोर कुमार हे फक्त गायकच नव्हते तर अभिनेतेसुद्धा होते. त्यांनी चार वेळा लग्न केलं होतं. त्यांच्या मुलाने, अमित कुमार यांनी, वडिलांच्या वैवाहिक आयुष्याबद्दल वक्तव्य केल आहे आणि मधुबालासोबतच्या आठवणींना उजाळा दिला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरात दौऱ्यावर असून त्यांनी गांधीनगर येथे जाहीर सभेत ऑपरेशन सिंदूर आणि भारताच्या लष्करी कारवाईबद्दल माहिती दिली. त्यांनी सरदार पटेल यांच्या सूचनेकडे दुर्लक्ष केल्यामुळे पाकव्याप्त जम्मू-काश्मीर ताब्यात घेण्याची संधी भारताने १९४७ साली गमावल्याचे सांगितले.
मंत्री संजय शिरसाट यांचा मुलगा सिद्धांत शिरसाट याच्यावर विवाहित महिलेशी विवाह करून तिला शारीरिक आणि मानसिक त्रास दिल्याचा आरोप आहे. संबंधित महिलेने पोलीस तक्रार दाखल केली असून सिद्धांतला नोटीस पाठवण्यात आली आहे. महिलेचे वकील अॅड. चंद्रकांत ठोंबरे यांनी सांगितले की, सिद्धांतने तिला आत्महत्येची धमकी देऊन लग्नासाठी दबाव आणला आणि नंतर दुसऱ्या मुलीशी लग्न केले.
गेल्या काही वर्षांत हिंदी गाण्यांचे रिमेक करण्याचा ट्रेंड वाढला आहे. अशातच सलमान खानच्या 'बिवी नंबर १' चित्रपटातील 'चुनरी चुनरी' गाण्याचा रिमेक वरुण धवनच्या आगामी 'जवानी तो इश्क होना है' चित्रपटात आहे. या गाण्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या गाण्याच्या रिमेकबद्दल मूळ गायक अभिजीत भट्टाचार्य यांनी प्रतिक्रिया देत रिमेकमुळे मूळ गाण्याचे महत्त्व कमी होत नसल्याचे सांगितले.
बॉलीवूड अभिनेत्री आलिया भट्ट सध्या कान्स फिल्म फेस्टिव्हलमधील लूकमुळे चर्चेत आहे. तिने पहिल्यांदाच कान्सला हजेरी लावली. 'ब्रुट इंडिया'शी संवाद साधताना तिने फहाद फासिल आणि रोशन मॅथ्यू यांचे कौतुक केले. प्रादेशिक चित्रपटांबद्दलही तिने सकारात्मक मत व्यक्त केले. आलियाने 'गंगूबाई काठियावाडी', 'कलंक', 'गल्ली बॉय', 'राझी' यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. ती लवकरच 'अल्फा' आणि 'लव्ह अँड वॉर' या चित्रपटांत दिसणार आहे.
वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणामुळे महाराष्ट्रात पुन्हा हुंडाबळीची चर्चा सुरू झाली आहे. ५१ तोळे सोनं, चांदी, रोख रक्कम दिल्यानंतरही तिचा सासरच्यांकडून छळ सुरू होता. तिच्या लग्नातील फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत आहेत, ज्यात तिचं नवऱ्यावर असलेलं प्रेम दिसतं. तिचा उखाणाही व्हायरल झाला आहे. तिच्या दिर सुशील हगवणेची पोस्टही चर्चेत आहे, ज्यात सुनेबाबत लिहलं आहे.
अनेक बोल्ड भूमिकांमुळे इम्रान हाश्मी 'सीरियल किसर' म्हणून ओळखला जातो. २०१६ साली प्रदर्शित झालेल्या ‘अजहर’ चित्रपटात नरगिस फाखरीसोबत त्याने मुख्य भूमिका साकारली होती. 'बोल दो ना जरा' गाण्याच्या शूटिंगदरम्यान नरगिसने दिग्दर्शकाने कट म्हटल्यावरही किसिंग सीन थांबवला नव्हता. या मेकिंग व्हिडीओमध्ये नरगिसने खुलासा केला की, हे सीन तिच्या कॉन्ट्रॅक्टमध्ये नव्हते.
लालूप्रसाद यादव यांचे पुत्र तेजप्रताप यादव यांच्या पत्नी ऐश्वर्या यांनी "माझं आयुष्य बरबाद का केलं?" असा सवाल केला आहे. तेजप्रताप यांचा एका महिलेबरोबरचा फोटो व्हायरल झाल्यानंतर हा वाद उफाळला. ऐश्वर्या यांनी तेजप्रताप यांच्यावर मारहाणीचे आरोप केले आहेत. तेजप्रताप यांचे राजकारणातील वाद आणि कौशल्याच्या अभावामुळे त्यांची प्रतिमा कायम वादग्रस्त राहिली आहे.
सोशल मीडियावर चर्चेत असलेले आणि विद्यार्थ्यांचे आवडते 'ऑनलाईन' शिक्षक खान सर यांनी नुकतेच आपल्या वर्गात लग्नाची घोषणा केली. पहलगाम हल्ल्यानंतर निर्माण झालेल्या तणावामुळे छोटेखानी कार्यक्रमात लग्न केले. त्यांच्या आई आणि लहान भावाच्या आग्रहामुळे त्यांनी लग्न केले. विद्यार्थ्यांना आमंत्रित करता न आल्याची खंत व्यक्त करत, ६ जून रोजी विशेष रिसेप्शन आयोजित करण्याचे जाहीर केले.
भारताचा क्रिकेटपटू युजवेंद्र चहल आणि त्याची पत्नी धनश्री वर्मा यांचा घटस्फोट झाला आहे. युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा यांचं २० मार्चला दोघांच्या संमतीने नातं संपुष्टात आलं. घटस्फोटानंतर धनश्रीने तिच्या करिअरवर लक्ष केंद्रित केले आहे. 'टाईम्स ऑफ इंडिया'ला दिलेल्या मुलाखतीत तिने घटस्फोटानंतरच्या सोशल मीडियावरील टीका आणि ट्रोलिंगबद्दल तिचं मत व्यक्त केलं. ती म्हणाली की, नकारात्मकता तिला त्रास देत नाही. माझ्याबद्दलचे कोणतेही गैरसमज स्पष्ट करण्यात आता काही रस नाही.
एआयएमआयएमचे नेते असदुद्दीन ओवेसी यांनी पाकिस्तानच्या ऑपरेशन बुनयान-उन-मारसूसवर टीका केली आहे. त्यांनी पाकिस्तानी नेत्यांना नालायक आणि अक्कल नसलेले म्हटले आहे. ओवेसी यांनी कुवेतमध्ये भारतीयांशी बोलताना पाकिस्तानी पंतप्रधान आणि लष्करप्रमुखांवर टीका केली. त्यांनी २०१९ मध्ये चीनच्या लष्करी ड्रिलचे फोटो भारताविरोधात विजय मिळवल्याचा दावा करत दाखवले होते. ओवेसी यांनी पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानी नेत्यांच्या भूमिकेवरही टीका केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी (२४ मे) राजस्थानमधील बीकानेरपासून सुमारे ३० किमी अंतरावर असलेल्या देशनोक गावातील करणी माता मंदिराला भेट दिली. उंदरांचं मंदिर म्हणून ओळखलं जाणारं हे ऐतिहासिक मंदिर लाखो उंदरांचे (काबा) निवासस्थान मानलं जातं आणि हे उंदीर पवित्र मानले जातात व त्यांचं संरक्षण केलं जातं.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी बाळासाहेब ठाकरे असते तर त्यांनी पंतप्रधान मोदींची गळाभेट घेतली असती, असे विधान केले. यावर शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी संताप व्यक्त केला. त्यांनी शाहांच्या राजीनाम्याची मागणी केली आणि बाळासाहेब ठाकरेंनी मोदी-शाह यांना वाचवल्याचा पश्चाताप झाला असता, असे म्हटले. राऊतांनी शाहांवर गंभीर आरोप करत महाराष्ट्राच्या अपमानाचा निषेध केला.
सात वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेला 'रेड' हा चित्रपट आता ओटीटीवर ट्रेंडिंग आहे. अजय देवगण, इलियाना डिक्रूझ आणि सौरभ शुक्ला यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर १०३.७ कोटींची कमाई केली होती. ४० कोटींच्या बजेटमध्ये तयार झालेल्या या चित्रपटाला आयएमडीबीवर ७.४ रेटिंग मिळाले आहे. 'रेड' सध्या जियो हॉटस्टारच्या टॉप १० यादीत सहाव्या क्रमांकावर आहे.
'हेरा फेरी ३' चित्रपटात परेश रावल यांनी बाबू भैयाची भूमिका साकारण्यास नकार दिल्याने प्रेक्षक निराश झाले आहेत. 'हेरा फेरी' आणि 'फिर हेरा फेरी' या चित्रपटांमध्ये परेश रावल यांनी बाबू भैयाची भूमिका साकारली होती, जी प्रेक्षकांना खूप आवडली होती. बाबूराव गणपतराव आपटे ही भूमिका गुजराती थिएटरमधील संगीतकार रजत ढोलकिया यांच्यावरून प्रेरित होती.