“सेलिब्रिटी पैशासाठी काहीही करतील”, रवीनाने एअर इंडिया विमानातून प्रवास करताच भडकले नेटकरी
१२ जून रोजी अहमदाबादमध्ये एअर इंडियाच्या विमान अपघातात २७४ जणांचा मृत्यू झाला आणि अनेक जखमी झाले. या घटनेनंतर देशभर शोकाकूल वातावरण आहे. अभिनेत्री रवीना टंडनने एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांना धीर देण्यासाठी पोस्ट शेअर केली, ज्यामुळे काहींनी तिचं कौतुक केलं तर काहींनी टीका केली. 'लोकांची घर उद्ध्वस्त झाली आहेत आणि तुम्हाला कसली शक्ती हवी आहे?' तसंच 'हे सेलिब्रिटी पैशांसाठी काहीही करतील, त्यांच्याकडून कधीच कोणती अपेक्षा करू नका' असं म्हणत अनेकांनी तिच्यावर टीका केली आहे.