सर्वपक्षीय बैठकीला AIMIM ला आमंत्रण नाही? असदुद्दीन ओवैसींचा संताप
एआयएमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सर्वपक्षीय बैठकीत फक्त पाच ते दहा खासदार असलेल्या पक्षांनाच आमंत्रण दिल्याबद्दल केंद्र सरकारवर संताप व्यक्त केला आहे. त्यांनी किरेन रिजिजू यांच्याशी संपर्क साधून लहान पक्षांना का आमंत्रण नाही, असा प्रश्न विचारला. ओवैसी म्हणाले की, सर्वपक्षीय बैठक म्हणजे सर्व पक्षांचा सहभाग असावा, आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सर्वांचे म्हणणे ऐकावे.