फक्त दोन अक्षरं बदलून ४० लाखांचा गंडा घातला, सगळेच हैराण; मालकानं उधारीसाठी…
बिहारच्या नालंदा जिल्ह्यातील लहेरी भागात एका औषधांच्या दुकानात काम करणाऱ्या रवी शंकर कुमारने दुकानाच्या नावात फक्त दोन अक्षरं बदलून मालकाला ४० लाख रुपयांचा गंडा घातला. त्याने "Shri Sai Pharma" चे "Shree Sai Pharma" असे नाव बदलून नवीन बँक खातं उघडलं आणि चेक्स त्या खात्यात जमा केले. पोलिसांनी रवी आणि त्याची पत्नी जुलीला अटक केली असून, सखोल चौकशी सुरू आहे.