“शिवसेनेच्या फुटीमागे रश्मीवहिनींचा हात होता, उद्धव ठाकरे…”; ‘या’ मंत्र्याचा दावा
२०२२ मध्ये एकनाथ शिंदेंनी शिवसेनेत केलेलं बंड हे सर्वात मोठं ठरलं. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीत काँग्रेसच्या सहभागामुळे शिंदे नाराज होते. शिंदेंना ४० आमदारांची साथ मिळाली. भरत गोगावले यांनी रश्मी ठाकरे यांच्या हस्तक्षेपामुळे शिवसेना फुटल्याचा आरोप केला. नारायण राणे आणि छगन भुजबळ यांना परत आणण्याच्या चर्चाही झाल्या होत्या. गोगावले यांनी एकनाथ शिंदेंवर पूर्ण विश्वास असल्याचं सांगितलं.