“पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाला उत्तर द्यावं”, आंबेडकरांचं विधान!
‘ऑपरेशन सिंदूर’च्या पहिल्या दिवशी भारताची काही लढाऊ विमाने पाकिस्तानने पाडली, असे संरक्षण दलप्रमुख अनिल चौहान यांनी मान्य केले, मात्र तपशील दिले नाहीत. त्यांनी पाकिस्तानचा सहा विमाने पाडल्याचा दावा चुकीचा असल्याचे स्पष्ट केले. काँग्रेसने सरकारवर दिशाभूल केल्याचा आरोप केला असून, प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करत, नेमके नुकसान आणि इतर प्रश्नांची उत्तरे मागितली आहेत.