उद्धव ठाकरेंचा फडणवीस सरकारवर आरोप; “भाजपाकडून राज्यात भाषिक आणीबाणी…”
उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत भाजपावर भाषिक आणीबाणी लादल्याचा आरोप केला. त्यांनी हिंदी सक्तीला विरोध दर्शवला आणि मराठी भाषेच्या संरक्षणासाठी आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला. ठाकरे म्हणाले की, भाजपाची एकाधिकारशाहीकडे वाटचाल सुरू आहे आणि त्रिभाषा सूत्र मान्य नाही. त्यांनी मराठी माणसांना पक्षीय भेद विसरून आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले.