रेमल चक्रीवादळाचा फटका पश्चिम बंगालसह ईशान्य भारतातील मिझोराम राज्यालाही बसला आहे. मिझोरामच्या आइजोल जिल्ह्यात विविध ठिकाणी झालेल्या भूस्खलनात १५ लोकांचा मृत्यू झाल्याची बातमी समोर येत आहे. तर दरड कोसळून ११ जण त्याखाली फसले गेल्याचे सांगण्यात येत आहे. मिझोरामचे मुख्यमंत्री लालदुहोमा यांनी द इंडियन एक्सप्रेसशी बोलताना सांगितले की, आज सकाळी ११.१५ वाजता मृतांची संख्या निश्चित करण्यात आली. आइजोल जिल्ह्यातील मेलथून आणि इतर भागातून ११ मृतदेह ढिगाऱ्याखालून बाहेर काढले आहेत. इतर मृतदेह शोधण्याचे काम सुरू आहे.

मुख्यमंत्री लालदुहोमा यांनी सांगितले की, बचाव कार्यासाठी आम्ही १५ कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे, तसेच मृतांच्या नातेवाईकांना आजच मदत जाहीर केली जाणार आहे. राज्यात वादळाचा तडाखा आता ओसरत आहे. पण सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्यामुळे माहिती गोळा करणे कठीण जात आहे. राज्य सरारने मृतांच्या कुटुंबियांना चार लाख रुपये सानुग्राह अनुदान मंजूर केले आहे.

Mohadi taluka, bridge, washed away,
बापरे… चक्क पूल वाहून गेला! १८ लाखांचा खर्च अन् १८ आठवड्यांच्या आतच…
urad, soybean, Solapur, rain, Kharif,
सोलापूर : पोषक पाऊसमानामुळे दोन लाख ६७ हजार हेक्टर क्षेत्रात उडीद व सोयाबीनचा पेरा, १७० टक्क्यांवर खरीप पेरण्या
husband, alcohol, wife murder husband,
पती दारू पिऊन द्यायचा त्रास, संतापलेल्या पत्नीने कोंबडी कापण्याची सुरी उचलली आणि…
Mhasrul, Murder, old woman,
नाशिक : म्हसरुळमध्ये वृद्धेची हत्या, संशयित ताब्यात
Investigation closed by ED too Failure to trace the source of income in the offenses against the vicar
‘ईडी’कडूनही तपास बंद? वायकर यांच्या विरोधातील गुन्ह्यांत उत्पन्नाचा स्राोत शोधण्यात अपयश
Buffaloes die on the spot due to lightning in the stream Demand in Assembly for compensation
ओढ्यात विजेच्या झटक्याने म्हशींचा जागीच मृत्यू; नुकसान भरपाईसाठी विधानसभेत मागणी
Seven bridges collapsed in Bihar in 15 days
बिहारमध्ये १५ दिवसांत सात पूल कोसळले; दुर्घटनांच्या सखोल चौकशीची मागणी
bengal public flogging
‘जे झालं ते चांगलंच झालं’, विवाहबाह्य संबंधामुळे भररस्त्यात मारहाण झालेल्या व्यक्तीची प्रतिक्रिया

राज्यातील प्रतिकूल हवामानामुळे, राज्य सरकारने सर्व शाळा, बँका, वित्तीय संस्था, सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम आणि अत्यावश्यक सेवा देणारी सरकारी कार्यालये बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. तसेच खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांनी शक्य असल्यास वर्क फ्रॉम होमचा पर्याय निवडावा, असेही आवाहन सरकारने केले आहे.

‘रेमल’ चक्रीवादळाचे नवे संकट! मान्सूनसह महाराष्ट्रावर काय परिणाम होणार जाणून घ्या

मिझोरामशिवाय ईशान्य भारतातील आसाम, मेघालय या राज्यांनाही वादळाचा तडाखा बसला आहे. आसाममधील हाफलांग आणि सिलचर दरम्यानचा रस्ता वादळामुळे वाहून गेल्यामुळे दळणवळण विस्कळित झाले आहे.

रेमल चक्रीवादळाने पश्चिम बंगालच्या दक्षिण किनारपट्टी भागात थैमान घातले. येथील २४ विभाग, ७९ पालिका प्रभागांतील सुमारे १५ हजार घरांचे ‘रेमल’ चक्रीवादळाने नुकसान झाल्याची माहिती राज्य सरकारच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सोमवारी दिली. या वादळामुळे २ हजार १४० वृक्ष तसेच ३३७ विजेचे खांब कोसळल्याचेही त्यांनी सांगितले. वादळग्रस्त भागात सरकारी कर्मचारी नुकसानीचे पंचनामे करत असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी ‘पीटीआय’ला दिली.